शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

कुस्ती हरण्याची शक्यता वर्तवल्याने आखाडाच रद्द करण्याचा विचार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 13:24 IST

पुणे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांचे २९ मार्चला निधन झाले. त्याला आता २ महिन्यांहून अधिक कालावधी झाला. मात्र, आयोगाने अजून पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही...

- राजू इनामदार

पुणे : कुस्ती हरण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने आखाडाच रद्द करण्याचा विचार सुरू आहे, असे समजते. पुणे लोकसभेची जागा रिक्त झाल्यानंतर दोन महिने झाले तरी आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर होत नसल्याने आता नियमित म्हणजे सन २०२४ मध्ये निवडणूक होईल, असे बोलले जात आहे. त्यामुळेच आखाडा रद्द होण्याची चिन्हे असल्याची चर्चा जोर धरत आहे.

कसबा विधानसभेच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबरला निधन झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने लगेचच महिनाभरात म्हणजे १९ जानेवारीला या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार २७ फेब्रुवारीला निवडणूक झाली, २ मार्चला निकालही लागला. त्यानंतर पुणे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांचे २९ मार्चला निधन झाले. त्याला आता २ महिन्यांहून अधिक कालावधी झाला. मात्र, आयोगाने अजून पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही. त्यामुळे आखाडाच रद्द करण्याच्या शक्यतेला पुष्टी मिळत आहे.

कारणे काय?

- लोकसभेच्या सध्याच्या सभागृहाची मुदत संपण्याला केवळ वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यातही निवडणुकीचा कार्यक्रम लक्षात घेतला तर तसे ९ महिनेच बाकी आहेत. त्यामुळे इतक्या कमी कालावधीसाठी पोटनिवडणूक घेतली जाईल, अशी शक्यता कमी दिसत आहे.

- राजकीय स्थितीचाही सत्ताधाऱ्यांकडून विचार केला जात आहे. कसबा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. ताेही ११ हजार मतांच्या फरकाने झाला. त्यानंतर कर्नाटक विधानसभा निवडणुकीतही ते राज्य भाजपच्या हातातून गेले. यातून जनमत सध्या बरोबर नसल्याची भीती भाजपमध्ये आहे.

- सर्वेक्षण करणाऱ्या भाजपच्या काही खासगी संस्थांनी दिलेल्या अहवालातही तसे नमूद केल्याचे समजते. कोणत्याही निवडणुकीच्या आधी सर्व्हे करण्याची भाजपची सवय आहे. तोही किमान दोन संस्थांकडून केला जातो. तो अहवाल प्रतिकूल आला असल्याचे भाजपमधूनच सांगण्यात येते.

- पोलिसांच्या गुप्त वार्ता शाखेकडूनही सत्ताधारी अहवाल मागवत असतात. त्यातही सध्याची स्थिती जिंकण्यायोग्य नसल्याचे कळवल्याची माहिती मिळाली. या सर्व शक्यतांचा विचार करून पोटनिवडणूक न घेण्याच्या विचाराप्रत भाजपचे वरिष्ठ नेते आले असल्याचे बोलले जात आहे.

पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच रंगत

महाविकास आघाडीत काँग्रेसला जागा असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी या मतदारसंघात आमचे राजकीय वर्चस्व जास्त आहे असे म्हणत या जागेवर दावा केल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच त्यात रंगत आली आहे. काँग्रेसने लगेचच हा दावा खोडून काढला. कसबा विधानसभेतील विजयामुळे महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांंचा आत्मविश्वास वाढला आहे तर भाजपकडून त्यांच्यात फूट कशी पाडता येईल यावर विचार सुरू आहे.

राजकीय स्थिती प्रतिकूल आहे, तसा सर्व्हे किंवा अहवाल आहे या अफवा आहेत. निवडणूक आयोग स्वायत्त आहे. ते स्वतंत्रपणे निर्णय घेतात. सरकारचा त्यात काहीही हस्तक्षेप नसतो. भाजपची संघटनाच इतकी बलवान आहे की, वर्षाच्या ३६५ दिवसांत कधीही निवडणूक झाली तरी आमची तयारी असते. एखादा पराभवाची इतक्या मोठ्या पक्षाला भीती बसेल हे कोणी म्हणत असेल तर म्हणोत; पण त्यात काहीही अर्थ नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार उत्कृष्ट काम करत आहे आणि निवडणूक कधीही झाली तरी आम्ही सज्ज आहोत.

- जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप

आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच ही निवडणूक लढणार आहोत. आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडे आहे. ती पूर्वापार आमचीच आहे. मागील दोन पराभव वगळता त्याआधी अनेक वर्षे पुणे लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचेच वर्चस्व होते. पोटनिवडणूक कधीही झाली तरी आमची तयारी आहे. अलीकडे केंद्र सरकारचा हस्तक्षेप प्रत्येक स्वायत्त संस्थेत होत असतो. त्यामुळे एकूण राजकीय स्थिती पाहता निवडणूक होईल, असे काँग्रेसच काय, सर्वच विरोधी पक्षांना वाटत आहे.

- मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Puneपुणेlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक