शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

इतिहासकारांना राज्याला रस्ता दाखवावा; औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

By राजू हिंगे | Updated: March 16, 2025 19:17 IST

प्रत्येकाची आस्था वेगळी आहे , सरकारने सर्वांच्या आस्थेचा आदर करावा

पुणे  - औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत इतिहासकारांनी इतिहासाचा अभ्यास करून राज्याला मार्गदर्शन करावे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे योग्य काय आणि अयोग्य काय, हे इतिहासकार ठरवतील. खरा इतिहास समोर आला पाहिजे. प्रत्येकाची आस्था वेगळी असते, त्यामुळे सरकारने सर्वांच्या आस्थेचा आदर करावा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर बैठकीपूर्वी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, “कोणताही राजकीय पक्ष नेहमीच निवडणूक मूडमध्ये असतो. या बैठकीचा अहवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कळविला जाईल. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे आणि शेतमालाला हमीभाव देणे याचा राज्य सरकारला विसर पडला आहे. पारितोषिक विजेते शेतकरी व शिक्षक आत्महत्या करत आहेत, हे दुर्दैवी आहे. सातबारा कोरा करण्याचे काय झाले? हमीभावाचे काय झाले? आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचे पैसे कुठे वळवले गेले आहेत, हेही समोर आले आहे. बजेटमधील पैसे कोणीही आपल्या सोयीनुसार खर्च करू शकत नाही.‘लाडकी बहिण योजना’ लागू केल्यामुळे राज्य सरकारवर आर्थिक ताण आला असल्याचे एका मंत्र्यानेच सांगितले आहे. सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून बहिणींच्या विश्वासावर निवडणूक जिंकली, पण आता त्याच बहिणी त्यांना अडचण वाटू लागल्या आहेत. मात्र, बहिणींनी कोणाच्या घरी मागायला गेले नव्हते. त्यामुळे त्यांना सन्मानाने २,१०० रुपये मिळाले पाहिजेत,” असेही सुळे यांनी सांगितले.

“जय शिवराय” म्हणायला काय प्रॉब्लेम आहे?

“छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. ते रयतेचे राजे होते. ‘जय शिवराय’ म्हणायला काय अडचण आहे? ‘जय शिवराय’ ही समतेची भाषा आहे. यात काहीही चुकीचे नाही,” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

विमानतळाबाबत विश्वासात घेतले नाही

“पुरंदर विमानतळ व्हावे, ही तेथील जनतेची इच्छा आहे. त्यामुळे सरकारने जनतेच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला या प्रकल्पाबाबत कोणतीही माहिती दिली नाही. सरकारने सर्व संबंधित पक्षांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

कृषी खाते भ्रष्टाचाराने बरबटलेले

“राज्याचे कृषी खाते भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. भाजपचे आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि संदीप क्षीरसागर यांनीही वेळोवेळी कृषी खात्यातील भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आम्ही केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली आहे, आणि त्यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. मी लवकरच पुन्हा त्यांना भेटणार आहे. बीडमधील परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारली आहे, याबद्दल मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानते. मात्र, महाराष्ट्र सरकारला योग्य दिशा दाखवावी, अशी आमची त्यांच्याकडे विनंती आहे. साखर उद्योगासह शेतीविषयक मुद्द्यांवरही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ घेतली आहे,” असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांसाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवणार

“माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शेतकरी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या निवडणुकीत आम्ही शेतकऱ्यांसाठी राजकारण बाजूला ठेवणार आहोत. हा पक्षाचा विषय नाही, तर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळेच ही निवडणूक आम्ही शेतकऱ्यांसाठी लढवणार आहोत,” असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

सरकारच्या अपयशावर टीका

“पाण्याचे नियोजन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. जर पाणी कमी-जास्त वाटप होत असेल, तर हे राज्य सरकारच्या अपयशाचे द्योतक आहे. लोकशाहीमध्ये आरोप-प्रत्यारोप होतच राहतात, पण या राज्यात सर्वात जास्त खंडणीखोर कोणत्या पक्षात आहेत, हे सर्वांना माहिती आहे,” असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSupriya Suleसुप्रिया सुळे