शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

पुणे डायरी - व्यवस्थापनाचीच आपत्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 01:40 IST

आपत्ती व्यवस्थापन हे शास्त्र आहे याची गंधवार्ताही महापालिकेला दिसत नाही. त्यामुळेच कालवा फुटल्यावर त्यांची भंबेरी उडाली. ४० लाख लोकसंख्येच्या शहरासाठी हे मुळीच भूषणावह नाही.

- राजू इनामदार

कधीकधी एखाद्या गोष्टीची अचानक परीक्षा होत असते. खडकवासला धरणाच्या कालव्याची भिंत २७ सप्टेंबरला अचानक खचली. पाण्याचे लोटच्या लोट वस्तीत घुसले, त्यामुळे घरे कोसळली. गॅस सिलिंडर, फ्रिज यासारख्या जड वस्तू वाहून नेल्या. कपडे व अन्य साहित्य पाण्यावर तरंगू लागले. त्याच वेळी महापालिकेची परीक्षा सुरू झाली. ती प्रशासनाची होती तशीच पदाधिकाऱ्यांचीही होती. या परीक्षेत ना प्रशासन उत्तीर्ण झाले, ना पदाधिकारी! महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष नावाचा एक स्वतंत्र कक्ष आहे. तो कक्षही या परीक्षेस उतरला नाही. एक भलेमोठे पुस्तक दरवर्षी प्रकाशित करण्याशिवाय या कक्षाकडून काहीही होत नाही, या आरोपाला पुष्टी मिळावी अशाच गोष्टी त्यानंतर घडत गेल्या.

कालव्याचे पाणी फुटून रस्त्यावर वाहत होते त्यावेळचे एक छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. त्यात एक महिला पोलीस एका लहान मुलाला पाठीवर घेऊन वाहत्या पाण्यातून वाट काढत चालताना दिसते आहे. त्या महिला पोलिसाच्या धाडसाला खरोखरच सलाम. माणुसकी म्हणून हे चांगलेच आहे, मात्र ते चुकीचे आहे. आपत्ती व्यवस्थापन कसे नसावे याचे नेमके उदाहरण म्हणजे हे छायाचित्र आहे. आपत्ती व्यवस्थापनात प्रत्येक यंत्रणेला एक काम आहे. त्यांनी त्या वेळेस तेच करणे अपेक्षित आहे.पोलिसांनी बघ्यांची गर्दी नियंत्रित करावी, वाहतूक शाखेने वाहतूककोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांनी विजेमुळे शॉर्टसर्किट होऊन दुर्घटना वाढणार नाही हे पाहावे, अग्निशामक दलाच्या जवानांनी रेस्क्यु आॅपरेशन म्हणजे आपत्तीत अडकलेल्यांची सुटका करावी, आपत्तीग्रस्तांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था एकाने करावी, दुसºयाने त्यांच्या निवाºयाचे पाहावे, आपत्तीमुळे कसली रोगराई पसरणार नाही, आपत्तीत जखमी झालेल्यांना स्ट्रेचरवरून नेणे, त्यांना रुग्णालयात दाखल करणे, त्यासाठी रुग्णवाहिका तयार ठेवणे, हे आरोग्य विभागाने करणे, कपडालत्ता, जेवणाचे साहित्य उपलब्ध करून देणे अशी प्रत्येक यंत्रणेची कामे आहेत. आपत्ती काळात त्यांनी ती करावीत असे अपेक्षित आहे.

सिंहगड रस्त्यावर त्यादिवशी जे घडले ते नेमके याच्या उलट घडले. बघ्यांच्या गर्दीला कोणी आवरत नव्हते. वाहने वाटेल तशी, वाटेल तिथे थांबत होती, त्यांना कोण अटकाव करत नव्हते. पोलीस थेट मदत करायला धावत होते. पाणी कसे थांबवावे याच्या विचारात अग्निशामक दलाचे जवान होते. ढासळलेल्या भिंतींचा राडारोडा उचलायला कोणी उपस्थित नव्हते, संसार उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील सदस्य स्वत:च आपापल्या घरांमधील काही ऐवज शिल्लक राहिला आहे किंवा नाही ते चिखल उपसून पाहात होते. रस्त्यांवर तीन-चार फुटांपर्यंत पाणी साचून वाहत होते. ते ओसरले त्या वेळी रस्त्याच्या उताराच्या बाजूस सगळा चिखल जमा झाला होता, तो थेट रस्त्याच्या मध्यापर्यंत आला होता. त्यातून अपघात होत होते. त्याकडे कोणी लक्षही देत नव्हते. काही जण तर वाहन रस्त्यावरच लावून घटनास्थळी धावत होते. सगळ्यात चिंताजनक प्रकार म्हणजे घटनास्थळी कोणीही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. महापालिकेत सर्वसाधारण सभा सुरू होती. ती स्थगित करून घटनास्थळी जावे असे कोणालाही वाटले नाही. काही जणांनी भेटी दिल्या, मात्र त्यामुळे गर्दी वाढण्याशिवाय दुसरे काही झाले नाही. सगळ्या यंत्रणांचे कर्मचारी त्यांना समजत होते त्याप्रमाणे काम करत होते. त्या सगळ्यांना एक दिशा देण्याची, कामाचे नियोजन करण्याची, त्याला गती देण्याची, पाणी ओसरल्यानंतर कराव्या लागणाºया कामाचे भान ठेवण्याची आत्यंतिक गरज तिथे त्या वेळी होती. नेमका त्याचाच अभाव होता. त्यामुळेच पोलीस मदतीसाठी धावत होते तर अग्निशामक दलाचे जवान दिङमूढ होऊन उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापन असेच राहिले तर या शहराचे काही खरे नाही हे सांगण्यासाठी कोणाही भविष्यवेत्त्याची गरज नाही. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका