शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
3
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
4
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
5
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
6
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
7
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
8
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
9
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
10
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
11
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
12
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
13
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
14
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
15
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
16
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
18
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
19
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
20
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

पुणे डायरी - व्यवस्थापनाचीच आपत्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 01:40 IST

आपत्ती व्यवस्थापन हे शास्त्र आहे याची गंधवार्ताही महापालिकेला दिसत नाही. त्यामुळेच कालवा फुटल्यावर त्यांची भंबेरी उडाली. ४० लाख लोकसंख्येच्या शहरासाठी हे मुळीच भूषणावह नाही.

- राजू इनामदार

कधीकधी एखाद्या गोष्टीची अचानक परीक्षा होत असते. खडकवासला धरणाच्या कालव्याची भिंत २७ सप्टेंबरला अचानक खचली. पाण्याचे लोटच्या लोट वस्तीत घुसले, त्यामुळे घरे कोसळली. गॅस सिलिंडर, फ्रिज यासारख्या जड वस्तू वाहून नेल्या. कपडे व अन्य साहित्य पाण्यावर तरंगू लागले. त्याच वेळी महापालिकेची परीक्षा सुरू झाली. ती प्रशासनाची होती तशीच पदाधिकाऱ्यांचीही होती. या परीक्षेत ना प्रशासन उत्तीर्ण झाले, ना पदाधिकारी! महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष नावाचा एक स्वतंत्र कक्ष आहे. तो कक्षही या परीक्षेस उतरला नाही. एक भलेमोठे पुस्तक दरवर्षी प्रकाशित करण्याशिवाय या कक्षाकडून काहीही होत नाही, या आरोपाला पुष्टी मिळावी अशाच गोष्टी त्यानंतर घडत गेल्या.

कालव्याचे पाणी फुटून रस्त्यावर वाहत होते त्यावेळचे एक छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. त्यात एक महिला पोलीस एका लहान मुलाला पाठीवर घेऊन वाहत्या पाण्यातून वाट काढत चालताना दिसते आहे. त्या महिला पोलिसाच्या धाडसाला खरोखरच सलाम. माणुसकी म्हणून हे चांगलेच आहे, मात्र ते चुकीचे आहे. आपत्ती व्यवस्थापन कसे नसावे याचे नेमके उदाहरण म्हणजे हे छायाचित्र आहे. आपत्ती व्यवस्थापनात प्रत्येक यंत्रणेला एक काम आहे. त्यांनी त्या वेळेस तेच करणे अपेक्षित आहे.पोलिसांनी बघ्यांची गर्दी नियंत्रित करावी, वाहतूक शाखेने वाहतूककोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांनी विजेमुळे शॉर्टसर्किट होऊन दुर्घटना वाढणार नाही हे पाहावे, अग्निशामक दलाच्या जवानांनी रेस्क्यु आॅपरेशन म्हणजे आपत्तीत अडकलेल्यांची सुटका करावी, आपत्तीग्रस्तांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था एकाने करावी, दुसºयाने त्यांच्या निवाºयाचे पाहावे, आपत्तीमुळे कसली रोगराई पसरणार नाही, आपत्तीत जखमी झालेल्यांना स्ट्रेचरवरून नेणे, त्यांना रुग्णालयात दाखल करणे, त्यासाठी रुग्णवाहिका तयार ठेवणे, हे आरोग्य विभागाने करणे, कपडालत्ता, जेवणाचे साहित्य उपलब्ध करून देणे अशी प्रत्येक यंत्रणेची कामे आहेत. आपत्ती काळात त्यांनी ती करावीत असे अपेक्षित आहे.

सिंहगड रस्त्यावर त्यादिवशी जे घडले ते नेमके याच्या उलट घडले. बघ्यांच्या गर्दीला कोणी आवरत नव्हते. वाहने वाटेल तशी, वाटेल तिथे थांबत होती, त्यांना कोण अटकाव करत नव्हते. पोलीस थेट मदत करायला धावत होते. पाणी कसे थांबवावे याच्या विचारात अग्निशामक दलाचे जवान होते. ढासळलेल्या भिंतींचा राडारोडा उचलायला कोणी उपस्थित नव्हते, संसार उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील सदस्य स्वत:च आपापल्या घरांमधील काही ऐवज शिल्लक राहिला आहे किंवा नाही ते चिखल उपसून पाहात होते. रस्त्यांवर तीन-चार फुटांपर्यंत पाणी साचून वाहत होते. ते ओसरले त्या वेळी रस्त्याच्या उताराच्या बाजूस सगळा चिखल जमा झाला होता, तो थेट रस्त्याच्या मध्यापर्यंत आला होता. त्यातून अपघात होत होते. त्याकडे कोणी लक्षही देत नव्हते. काही जण तर वाहन रस्त्यावरच लावून घटनास्थळी धावत होते. सगळ्यात चिंताजनक प्रकार म्हणजे घटनास्थळी कोणीही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. महापालिकेत सर्वसाधारण सभा सुरू होती. ती स्थगित करून घटनास्थळी जावे असे कोणालाही वाटले नाही. काही जणांनी भेटी दिल्या, मात्र त्यामुळे गर्दी वाढण्याशिवाय दुसरे काही झाले नाही. सगळ्या यंत्रणांचे कर्मचारी त्यांना समजत होते त्याप्रमाणे काम करत होते. त्या सगळ्यांना एक दिशा देण्याची, कामाचे नियोजन करण्याची, त्याला गती देण्याची, पाणी ओसरल्यानंतर कराव्या लागणाºया कामाचे भान ठेवण्याची आत्यंतिक गरज तिथे त्या वेळी होती. नेमका त्याचाच अभाव होता. त्यामुळेच पोलीस मदतीसाठी धावत होते तर अग्निशामक दलाचे जवान दिङमूढ होऊन उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापन असेच राहिले तर या शहराचे काही खरे नाही हे सांगण्यासाठी कोणाही भविष्यवेत्त्याची गरज नाही. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका