शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे डायरी - व्यवस्थापनाचीच आपत्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 01:40 IST

आपत्ती व्यवस्थापन हे शास्त्र आहे याची गंधवार्ताही महापालिकेला दिसत नाही. त्यामुळेच कालवा फुटल्यावर त्यांची भंबेरी उडाली. ४० लाख लोकसंख्येच्या शहरासाठी हे मुळीच भूषणावह नाही.

- राजू इनामदार

कधीकधी एखाद्या गोष्टीची अचानक परीक्षा होत असते. खडकवासला धरणाच्या कालव्याची भिंत २७ सप्टेंबरला अचानक खचली. पाण्याचे लोटच्या लोट वस्तीत घुसले, त्यामुळे घरे कोसळली. गॅस सिलिंडर, फ्रिज यासारख्या जड वस्तू वाहून नेल्या. कपडे व अन्य साहित्य पाण्यावर तरंगू लागले. त्याच वेळी महापालिकेची परीक्षा सुरू झाली. ती प्रशासनाची होती तशीच पदाधिकाऱ्यांचीही होती. या परीक्षेत ना प्रशासन उत्तीर्ण झाले, ना पदाधिकारी! महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष नावाचा एक स्वतंत्र कक्ष आहे. तो कक्षही या परीक्षेस उतरला नाही. एक भलेमोठे पुस्तक दरवर्षी प्रकाशित करण्याशिवाय या कक्षाकडून काहीही होत नाही, या आरोपाला पुष्टी मिळावी अशाच गोष्टी त्यानंतर घडत गेल्या.

कालव्याचे पाणी फुटून रस्त्यावर वाहत होते त्यावेळचे एक छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. त्यात एक महिला पोलीस एका लहान मुलाला पाठीवर घेऊन वाहत्या पाण्यातून वाट काढत चालताना दिसते आहे. त्या महिला पोलिसाच्या धाडसाला खरोखरच सलाम. माणुसकी म्हणून हे चांगलेच आहे, मात्र ते चुकीचे आहे. आपत्ती व्यवस्थापन कसे नसावे याचे नेमके उदाहरण म्हणजे हे छायाचित्र आहे. आपत्ती व्यवस्थापनात प्रत्येक यंत्रणेला एक काम आहे. त्यांनी त्या वेळेस तेच करणे अपेक्षित आहे.पोलिसांनी बघ्यांची गर्दी नियंत्रित करावी, वाहतूक शाखेने वाहतूककोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांनी विजेमुळे शॉर्टसर्किट होऊन दुर्घटना वाढणार नाही हे पाहावे, अग्निशामक दलाच्या जवानांनी रेस्क्यु आॅपरेशन म्हणजे आपत्तीत अडकलेल्यांची सुटका करावी, आपत्तीग्रस्तांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था एकाने करावी, दुसºयाने त्यांच्या निवाºयाचे पाहावे, आपत्तीमुळे कसली रोगराई पसरणार नाही, आपत्तीत जखमी झालेल्यांना स्ट्रेचरवरून नेणे, त्यांना रुग्णालयात दाखल करणे, त्यासाठी रुग्णवाहिका तयार ठेवणे, हे आरोग्य विभागाने करणे, कपडालत्ता, जेवणाचे साहित्य उपलब्ध करून देणे अशी प्रत्येक यंत्रणेची कामे आहेत. आपत्ती काळात त्यांनी ती करावीत असे अपेक्षित आहे.

सिंहगड रस्त्यावर त्यादिवशी जे घडले ते नेमके याच्या उलट घडले. बघ्यांच्या गर्दीला कोणी आवरत नव्हते. वाहने वाटेल तशी, वाटेल तिथे थांबत होती, त्यांना कोण अटकाव करत नव्हते. पोलीस थेट मदत करायला धावत होते. पाणी कसे थांबवावे याच्या विचारात अग्निशामक दलाचे जवान होते. ढासळलेल्या भिंतींचा राडारोडा उचलायला कोणी उपस्थित नव्हते, संसार उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील सदस्य स्वत:च आपापल्या घरांमधील काही ऐवज शिल्लक राहिला आहे किंवा नाही ते चिखल उपसून पाहात होते. रस्त्यांवर तीन-चार फुटांपर्यंत पाणी साचून वाहत होते. ते ओसरले त्या वेळी रस्त्याच्या उताराच्या बाजूस सगळा चिखल जमा झाला होता, तो थेट रस्त्याच्या मध्यापर्यंत आला होता. त्यातून अपघात होत होते. त्याकडे कोणी लक्षही देत नव्हते. काही जण तर वाहन रस्त्यावरच लावून घटनास्थळी धावत होते. सगळ्यात चिंताजनक प्रकार म्हणजे घटनास्थळी कोणीही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. महापालिकेत सर्वसाधारण सभा सुरू होती. ती स्थगित करून घटनास्थळी जावे असे कोणालाही वाटले नाही. काही जणांनी भेटी दिल्या, मात्र त्यामुळे गर्दी वाढण्याशिवाय दुसरे काही झाले नाही. सगळ्या यंत्रणांचे कर्मचारी त्यांना समजत होते त्याप्रमाणे काम करत होते. त्या सगळ्यांना एक दिशा देण्याची, कामाचे नियोजन करण्याची, त्याला गती देण्याची, पाणी ओसरल्यानंतर कराव्या लागणाºया कामाचे भान ठेवण्याची आत्यंतिक गरज तिथे त्या वेळी होती. नेमका त्याचाच अभाव होता. त्यामुळेच पोलीस मदतीसाठी धावत होते तर अग्निशामक दलाचे जवान दिङमूढ होऊन उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापन असेच राहिले तर या शहराचे काही खरे नाही हे सांगण्यासाठी कोणाही भविष्यवेत्त्याची गरज नाही. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका