शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

सिमेंटच्या जंगलामुळे हरित जुन्नरला लागली दृष्ट; बेकायदा बांधकामांवर अंकुश घालण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 16:16 IST

- अनधिकृत इमारतींमुळे प्रदूषण वाढले, शेती आणि आरोग्यावर परिणाम; नागरिकांकडून शासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी

ओतूर : निसर्गाने मुक्तहस्ते सौंदर्याची उधळण केलेल्या जुन्नर तालुक्याची हरित ओळख आता सिमेंटच्या जंगलाने धुळीस मिळविली आहे. गेल्या १५ ते २० वर्षांत सातत्याने होत असलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे पर्यावरणाची हानी होत असून, या बेकायदा इमारतींवर अंकुश घालण्याची तातडीची गरज असल्याचे सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. वाढते शहरीकरण, रिसॉर्ट संस्कृती आणि प्रदूषणामुळे येथील शेती, संस्कृती आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

जुन्नर तालुका हा निसर्गाच्या कृपेने सुजलाम्-सुफलाम् आहे. येथे सोयाबीन, कांदा, ऊस, टोमॅटो, मिरची, केळी, द्राक्ष अशा विविध पिकांची मुबलक उत्पादने घेतली जातात. स्थानिक शेतकरी या पिकांसाठी अथक परिश्रम घेतात आणि त्यातून चांगले उत्पन्न मिळवितात. मात्र, गेल्या काही वर्षांत या हरित प्रदेशावर सिमेंट काँक्रीटच्या जंगलाचा विळखा पडला आहे. "आमच्या जुन्नरची हरित ओळख आता धोक्यात आली आहे. सिमेंटच्या इमारतींमुळे निसर्गाला दृष्ट लागली आहे," असे एका स्थानिक शेतकऱ्याने 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

शहरीकरणाचे दुष्परिणाम : बैलगाड्यांची जागा मोटारगाड्यांनी घेतली -

लोकसंख्येच्या वाढत्या दबावामुळे आणि शहरीकरणाच्या लाटेमुळे जुन्नरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत. पूर्वी बैलगाड्यांच्या आवाजाने गजबजलेल्या रस्त्यांवर आता मोटारगाड्यांचा धिंगाणा आहे. पारंपरिक सुसंस्कृतीवर रिसॉर्ट संस्कृतीचे आक्रमण झाले असून, त्यामुळे ध्वनी प्रदूषण आणि वायूप्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे. हवेची गुणवत्ता घसरत चालली असून, त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

शासनाची उदासीनता : प्रदूषण नियंत्रणासाठी पावले उचलली नाहीत -

प्रदूषणाचा स्तर सतत वाढत असताना शासनाने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतेही ठोस पावले उचललेले नाहीत. ग्रामीण भागातील तसेच शहरातील वाढत्या बांधकामांवरही कोणतेही नियंत्रण नाही. परिणामी, घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्याचा निचरा करणाऱ्या जमिनींवरही इमारती उभ्या राहिल्या आहेत. "दररोज वाढत जाणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी बांधकाम परवानग्या तात्काळ बंद कराव्यात," अशी मागणी नागरिक करीत आहेत. तसेच, रासायनिक पाणी नदीनाल्यात सोडणाऱ्या औद्योगिक वसाहतींवर निर्बंध घालण्याचीही गरज व्यक्त होत आहे.

 नागरिकांच्या सूचना : वृक्षारोपण आणि उपाययोजना आवश्यक -

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नागरिकांकडून विविध सूचना येत आहेत. "वृक्षारोपणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवावेत आणि त्याची जबाबदारी विविध संस्थांवर सोपवावी," असे एका पर्यावरणप्रेमीने सांगितले. तसेच, प्रदूषण कमी करण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. स्थानिक पातळीवर वनसंवर्धन, जलसंवर्धन आणि बेकायदा बांधकामांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. जुन्नर तालुक्याची हरित ओळख जपण्यासाठी आता वेळीच सजग होणे गरजेचे आहे. अन्यथा, निसर्गाची ही देणगी कायमची हिरावली जाईल. शासन, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन या समस्येवर मात करण्याची हीच वेळ आहे. 'लोकमत'ने या मुद्द्यावर सातत्याने आवाज उठविला असून, येत्या काळातही या समस्येचा पाठपुरावा करणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड