शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

सिमेंटच्या जंगलामुळे हरित जुन्नरला लागली दृष्ट; बेकायदा बांधकामांवर अंकुश घालण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 16:16 IST

- अनधिकृत इमारतींमुळे प्रदूषण वाढले, शेती आणि आरोग्यावर परिणाम; नागरिकांकडून शासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी

ओतूर : निसर्गाने मुक्तहस्ते सौंदर्याची उधळण केलेल्या जुन्नर तालुक्याची हरित ओळख आता सिमेंटच्या जंगलाने धुळीस मिळविली आहे. गेल्या १५ ते २० वर्षांत सातत्याने होत असलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे पर्यावरणाची हानी होत असून, या बेकायदा इमारतींवर अंकुश घालण्याची तातडीची गरज असल्याचे सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. वाढते शहरीकरण, रिसॉर्ट संस्कृती आणि प्रदूषणामुळे येथील शेती, संस्कृती आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

जुन्नर तालुका हा निसर्गाच्या कृपेने सुजलाम्-सुफलाम् आहे. येथे सोयाबीन, कांदा, ऊस, टोमॅटो, मिरची, केळी, द्राक्ष अशा विविध पिकांची मुबलक उत्पादने घेतली जातात. स्थानिक शेतकरी या पिकांसाठी अथक परिश्रम घेतात आणि त्यातून चांगले उत्पन्न मिळवितात. मात्र, गेल्या काही वर्षांत या हरित प्रदेशावर सिमेंट काँक्रीटच्या जंगलाचा विळखा पडला आहे. "आमच्या जुन्नरची हरित ओळख आता धोक्यात आली आहे. सिमेंटच्या इमारतींमुळे निसर्गाला दृष्ट लागली आहे," असे एका स्थानिक शेतकऱ्याने 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

शहरीकरणाचे दुष्परिणाम : बैलगाड्यांची जागा मोटारगाड्यांनी घेतली -

लोकसंख्येच्या वाढत्या दबावामुळे आणि शहरीकरणाच्या लाटेमुळे जुन्नरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत. पूर्वी बैलगाड्यांच्या आवाजाने गजबजलेल्या रस्त्यांवर आता मोटारगाड्यांचा धिंगाणा आहे. पारंपरिक सुसंस्कृतीवर रिसॉर्ट संस्कृतीचे आक्रमण झाले असून, त्यामुळे ध्वनी प्रदूषण आणि वायूप्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे. हवेची गुणवत्ता घसरत चालली असून, त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

शासनाची उदासीनता : प्रदूषण नियंत्रणासाठी पावले उचलली नाहीत -

प्रदूषणाचा स्तर सतत वाढत असताना शासनाने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतेही ठोस पावले उचललेले नाहीत. ग्रामीण भागातील तसेच शहरातील वाढत्या बांधकामांवरही कोणतेही नियंत्रण नाही. परिणामी, घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्याचा निचरा करणाऱ्या जमिनींवरही इमारती उभ्या राहिल्या आहेत. "दररोज वाढत जाणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी बांधकाम परवानग्या तात्काळ बंद कराव्यात," अशी मागणी नागरिक करीत आहेत. तसेच, रासायनिक पाणी नदीनाल्यात सोडणाऱ्या औद्योगिक वसाहतींवर निर्बंध घालण्याचीही गरज व्यक्त होत आहे.

 नागरिकांच्या सूचना : वृक्षारोपण आणि उपाययोजना आवश्यक -

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नागरिकांकडून विविध सूचना येत आहेत. "वृक्षारोपणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवावेत आणि त्याची जबाबदारी विविध संस्थांवर सोपवावी," असे एका पर्यावरणप्रेमीने सांगितले. तसेच, प्रदूषण कमी करण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. स्थानिक पातळीवर वनसंवर्धन, जलसंवर्धन आणि बेकायदा बांधकामांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. जुन्नर तालुक्याची हरित ओळख जपण्यासाठी आता वेळीच सजग होणे गरजेचे आहे. अन्यथा, निसर्गाची ही देणगी कायमची हिरावली जाईल. शासन, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन या समस्येवर मात करण्याची हीच वेळ आहे. 'लोकमत'ने या मुद्द्यावर सातत्याने आवाज उठविला असून, येत्या काळातही या समस्येचा पाठपुरावा करणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड