शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पुणे : व्यावसायिक आत्महत्या प्रकरण; दोघा भागीदारांसह चौघांवर गुन्हा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 06:37 IST

भागीदारांनी केलेल्या घोटाळ्यामुळे आता गुंतवणूकदारांचे पैसे कसे द्यायचे, या विचाराने मानसिक दबावातून व्यावसायिकाने गोळी झाडून घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली होती़ याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघा भागीदारांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़

पुणे : भागीदारांनी केलेल्या घोटाळ्यामुळे आता गुंतवणूकदारांचे पैसे कसे द्यायचे, या विचाराने मानसिक दबावातून व्यावसायिकाने गोळी झाडून घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली होती़ याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघा भागीदारांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़अरविंद लक्ष्मण फाळके (वय ५७, रा़ अमर कॉटेज, भोसलेनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे़ तर शिवाजी जाधव आणि सुनील गोसावी अशी गुन्हा दाखल झालेल्या त्यांच्या भागीदारांची नावे आहेत़आॅगस्ट २०१६ पासून हा प्रकार सुरु होता़ सध्या बँकांची फसवणूक केल्याच्या घोटाळ्यांची सर्वत्र चर्चा आहे़आता त्यामुळे या गुंतवणूकदारांचे पैसे कोठून द्यायचे, याबाबत अरविंद फाळके यांच्यावर प्रचंड मानसिक दबाव निर्माण झाला़ तसेच त्या चौघांनी त्यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती़ यामुळे अरविंद फाळके हे प्रचंड मानसिक दबावात होते़ शुक्रवारी ते सौदामिनी फायनान्सच्या कार्यालयात आले़ त्यांनी घरून आणलेला डबा खाल्ला़ त्यानंतर, ‘मी झोपतो’ असे सांगून ते आपल्या केबिनमध्ये गेले़काही वेळाने साडेतीनच्या सुमारास गोळी झाल्याचा आवाज आला़ तो आवाज ऐकून कार्यालयातील लोक त्यांच्या केबिनमध्ये गेले़तेव्हा फाळके हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते़ त्यांनी आपल्याकडील रिव्हॉल्व्हरमधून छातीत गोळी झाडून घेतली होती़ तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले़ परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता़शिवाजी जाधव व सुनील गोसावी हे त्या वेळी एका लग्नासाठी कर्नाटकला गेले होते़ त्यांना ही बाब समजल्यावर ते फरार झाले आहेत़ अक्षय फाळके यांच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड अधिक तपास करीत आहेत़६ ते ८ कोटी रुपयांचा घोटाळा?याप्रकरणी अक्षय अरविंद फाळके (वय २८, रा़ भोसलेनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद फाळके यांनी शिवाजी जाधव व सुनील गोसावी यांच्याबरोबर २०११ मध्ये सौदामिनी फायनान्स ही कंपनी हडपसर येथील वैशाली हाईट्समध्ये सुरू केली़ त्याबरोबर या दोघांच्या सांगण्यावरून त्यांनी चीट फंडही सुरू केला़ चीट फंड व फायनान्स कंपनीसाठी त्यांनी नातेवाईक व इतरांकडून ठेवी घेतल्या होत्या़ त्यात जाधव, गोसावी व अन्य दोघांनी ६ ते ८ कोटी रुपयांचा घोटाळा करून ते पैसे दोघांनी स्वत:साठी वापरले़

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणेSuicideआत्महत्या