शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पुणे शहर मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापरत आहे, ग्रामीण आमदारांची टीकेची झोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 17:22 IST

पाटबंधारे खात्याच्या या धोरणामुळे पुण्यावर ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईची कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यक्त करत कालवा समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आमदारांनी पुण्याच्या पाण्यावर टीकेची झोड उठवली. 

ठळक मुद्देपाटबंधारे खात्याला लक्ष ठेवण्याची सूचना 

पुणे : धरणातील पाणी साठा मर्यादित आहे. पुणे शहराने यापुढे पाणी वापर कमी करावा, दररोज १३५० एमएलडी (दशलक्षलिटर) पेक्षा जास्त पाणी उचलू नये, पाटबंधारे खात्याने त्यांच्यावर लक्ष ठेवावे,असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. कालवा समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आमदारांनी पुण्याच्या पाण्यावर टीकेची झोड उठवली. पाटबंधारे खात्याच्या या धोरणामुळे पुण्यावर ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईची कुऱ्हाड कोसळण्याची भीती आहे. कालवा समितीच्या बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट , माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच आमदार राहुल कूल, दत्ता भरणे, सुरेश गोरे, भीमराव तापकीर तसेच पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आमदार विजय काळे, मेधा कुलकर्णी, पाटबंधारे खात्याचे कार्यकारी संचालक आर. बी. घोटे, मुख्य अभियंता टी. एन. मुंडे, अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडूरंग शेलार आदी बैठकीला उपस्थित होते.पुणे शहर मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापरत आहे असा मुद्दा ग्रामीण भागातील आमदारांनी उपस्थित केला. शहराला मंजूर पाणी कोटा ११५० दशलक्ष लिटर आहे. तो १३५० करण्यात आला. तरीही शहराकडून रोज १६५० दशलक्ष लिटर पाणी घेतले जात आहे असे पाटबंधारे खात्यानेही बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे शिवतारे यांनी त्याची दखल घेत पुणे शहराने दररोज फक्त १६५० दशलक्ष लिटर पाणी घ्यावे, त्यापेक्षा जास्त घेऊ नये, अन्यथा भविष्यात पाणी टंचाई झाली तर त्याला जबाबदार महापालिकाच असेल असा इशारा दिला. अन्य आमदारांनीही त्याला दुजोरा दिला.धरणात १४ टीएमसी पाणी आहे. त्यातील ७.१ टीएमसी पाणीसाठा हवेली, दौंड, इंदापूर या तालुक्यातील शेतीसाठी राखीव करण्यात आला. त्यातून शेतीला ऐन उन्हाळ्यात दोन आवर्तने दिली जातील. उर्वरित पाणी साठा (६ टीएमसी) पुणे शहरासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यातूनच शहराला आपली गरज भागवावी लागणार आहे. बापट यांनीही पुणे शहरासाठी पाणी पुरेसे असेल तर मंजूर कोट्याशिवाय जादा पाणी घेऊ नये असे सांगितले. धरणातील १ टीएमसी पाणी वाचले तर ५ हजार हेक्टर जमीनीवर सिंचन होते. शेतीचे पाणी थांबवून शहराला पाणी दिले जात असेल तर शहरांनीही पाणी वाचवून शेतीला दिले पाहिजे असे यावेळी शिवतारे म्हणाले. धरणात मर्यादित पाणी साठा असल्यामुळे उपलब्ध पाणी जपूनच वापरले पाहिजे. गरज नसताना जास्त पाणी उचलणे अयोग्य आहे.  थकबाकीसंबधी निर्णय उच्चस्तरावरपाटबंधारे खात्याने महापालिकेला ३५४ कोटी रूपयांची थकबाकी मागितली आहे. महापालिकेला ती मान्य नाही. हा विषय चर्चेला आल्यावर बापट यांनी हा विषय या बैठकीत नको, त्यावर पुढील आठवड्यात महापौर व महापालिकेच्या अन्य पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊ असे सांगितले.

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटAjit Pawarअजित पवारWaterपाणीMukta Tilakमुक्ता टिळक