शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राहण्यासाठी उत्तम शहराचा दर्जा म्हणजे मूर्ख बनविण्याचा प्रकार; सर्वसामान्यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 20:46 IST

पुणे शहराला देशातील राहण्यासाठी सर्वाेत्कृष्ट शहराचा दर्जा देणे म्हणजे नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रकार असल्याचे मत सर्वसामान्यांनी सजग नागरिक मंचच्या चर्चासत्रात व्यक्त केले.

पुणे: वाहतुक, प्रदुषण, कचरा आणि आरोग्या सारख्या सुविधांमध्ये पुणे शहरासारखी वाईट स्थिती इतर कोणाचीही नसेल, असे असताना पुणे शहराला जगण्यासाठी देशात सर्वोत्कृष्ट शहराचा दर्जा देण्यात आला आहे. हा जो कोणी सर्व्हे केला नक्की कोणाच्या फायद्यासाठी व कुणाच्या सांगण्यावरून केला हा मोठा संशोधनाचा विषय आहे. परंतु हा प्रकार म्हणजे नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रकार असल्याचे मत सजग नागरिक मंचच्या चर्चासत्रात सर्वसामान्य पुणेकरांनी व्यक्त केले.

    सजग नागरिक मंचच्या मासिक चर्चासत्रात ‘पुणे शहर सर्वोत्कृष्ट शहर जाणवतेय का?’ या विषयावर नागरिकांचा खुला संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, कार्यकारी विश्वस्त जुगल राठी यांच्यासह अनेक अभ्यासू सामाजिक  कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यावेळी वेलणकर यांनी सांगितले की, वाहतुक, प्रदुषण, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य अशा विविध २५ मुद्द्यांवर सर्व्हे करून पुणे शहर जगण्यासाठी देशात सर्वोत्कृष्ट शहर असल्याचे नुकतेच जाहीर केले. देशातील १११ शहरामध्ये केलेल्या सर्व्हेमध्ये पुणे प्रथम क्रमांकाचे शहर असल्याचे म्हटले ही अत्यंत केविलवाणी बाब आहे. प्रदुषण आणि घनकचरा मध्ये पुण्यासारखी वाईट स्थिती इतर कोणत्याही शहराची नसेल असे त्यांनी सांगितले. तर जुगल राठी यांनी सध्या पुणे शहरात पदाचा-यांची परिस्थिती प्रचंड केविलवाणी आहे, कोट्यवधी रुपये खर्च करुन फुटपाथ बांधण्यात आले पण त्यावर चालण्यासाठी जागा नसते, सायकल ट्रॅकची स्थिती तिच, सलग एक किलो मिटर सायकल चालू शकतो असा एकही ट्रॅक नाही, अनेक सायकल ट्रॅक गायब झालेत, तर सर्वाजनिक वाहतुक आणि वाहतुक कोंडीची समस्या यावर न बोललेच बर असे असताना या सर्व्हेक्षणामध्ये पुणे शहराला ५ पैकी ४.२ इतके गुण मिळतात हे हस्यास्पदच असल्याचे राठी यांनी येथे सांगितले. 

    तर कच-यामध्ये काम करणा-या जर्नल जठार यांनी २४ तासात खत करणारे शहरात सुरु झालेले ११ प्रकल्प हा एक अद्भूत प्रकारच म्हणावे लागेल. प्रकल्प सुरु करताना देण्यात येणारी टिपींग फी हा मोठा भ्रष्टाचाराचा प्रकार आहे. शहरातील सध्याची कच-याची भयानक स्थिती लक्षात घेता यामध्ये देखील पुण्याला ९२ टक्के गुण कसे मिळाले हा मोठा प्रश्नच असल्याचे त्यांनी सांगितले. हीच परिस्थिती आरोग्याच्या सुविधाचा आहे. शहरात सर्वाजनिक आरोग्याची परिस्थिती प्रचंड गंभीर आहे. त्यामुळे पुणे शहराला सर्वात्कृष्ट शहर म्हणून जाहीर करणे म्हणजे पुणेकरांना मुर्ख बनविण्याचाच प्रकार असल्याचे मत येथे व्यक्त करण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीSajag Nagrik Manchसजग नागरिक मंचnewsबातम्या