शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Nitin Gadkari: पुणे - बंगळुरू महामार्ग हाेणार चाैदा पदरी; नितीन गडकरी यांची घोषणा

By प्रशांत बिडवे | Updated: September 15, 2024 19:04 IST

मुंबई ते बंगळुरू चाैदा पदरी द्रुतगती महामार्ग तयार केला जाणार असून कामाचे कंत्राटही निघाले आहे, हा महामार्ग पुण्याच्या रिंगराेडला जाेडला जाणार

पुणे : मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गामुळे पुढील पन्नास वर्षे वाहतुकीला काही अडचण निर्माण हाेणार नाही असे आपण म्हणायचाे, मात्र अद्यापही वाहतुक काेंडीचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे अटल सेतूवरून बाहेर पडताच मुंबई ते बंगळुरू चाैदा पदरी द्रुतगती महामार्ग तयार केला जाणार असून कामाचे कंत्राटही निघाले आहे. हा महामार्ग पुण्याच्या रिंगराेडला जाेडला जाणार असून पुढील सहा महिन्यांत कामाला सुरूवात हाेईल अशी घाेषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्यामुळे पुणे- मुंबई प्रवास आणखी वेगवान हाेणार आहे.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने अभियंता दिनी आयाेजित 'सीओईपी अभिमान पुरस्कार' प्रदान साेहळ्यात गडकरी बाेलत हाेते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कुलगुरू प्रा. सुनिल भिरूड, नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते, मानद सचिव डॉ. सुजीत परदेशी उपस्थित हाेते. यंदाचा सीओईपी जीवनगाैरव पुरस्कार ज्येष्ठ उद्याेगपती पी.एन. भगवती यांच्या वतीने लाेहिया यांनी स्विकारला. तसेच अभिनेता वैभव तत्ववादी, राज्याच्या पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव प्रविण दराडे, सिक्कीमचे कॅबिनेट मंत्री राजू बसनेत, ‘जे.पी माॅर्गन चेस’ च्या सीईओ माेनिका पानपालिया आणि टेस्ला माेटर्सचे वरिष्ठ संचालक ऋषिकेश सगर यांना सीओईपी अभिमान पुरस्काराने गाैरविण्यात आले.गडकरी म्हणाले, समाजाच्या गरजांवर आधारित संशाेधन करणे आणि त्यातून निर्माण हाेणारी सेवा, वस्तू, उत्पादन सर्वसामान्यांना परवडणारे असले पाहिजे. रोजगाराची निर्मिती करणारे आणि निर्यात वाढविणारे तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात आपल्याला अवलंबावे लागणार आहे.

स्मार्ट सिटी नव्हे तर स्मार्ट व्हिलेज गरजेचे

कृषी अर्थव्यवस्थेकडे दूर्लक्ष केल्यामुळे शहरातील लाेकसंख्येत भर पडत आहे. स्मार्ट सिटी नाही तर स्मार्ट व्हिलेज झाले पाहिजेत. त्यासाठी कृषी क्षेत्राला पाणी, जंगल, जमीन आणि प्राणी यावर आधारित नवीन तंत्रज्ञानांची जाेड द्यावी लागेल. देशातील ६५ टक्के लाेकसंख्या कृषि अर्थव्यवस्थेवर आधारित आहे. गाव, गरीब, मजूर आणि शेतकरी हा समृद्ध हाेत नाही ताे पर्यंत आपल्याला आत्मनिर्भर भारत म्हणता येणार नाही. शेतकरी हा आता केवळ अन्नादाता राहिलेला नसून ताे उर्जादाता झाला आहे. ग्रामीण भागात राेजगार निर्मिती झाली तर कशाला लाेक शहरात येतील ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

मी असेपर्यंत विनावाहक कार देशात येणार नाही

समाजाचा विकास आणि गरिबांचे जीवन बदलणारे तंत्रज्ञान पाहिजे. मी जाे पर्यंत आहे ताेवर विनावाहक कार देशात येणार नाही. हे संशाेधन चांगले आहे की वाईट यावरून मला काही देणे घेणे नाही. देशातील २२ लाख लाेकांना राेजगार मिळाला असल्याचेही गडकरी म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीMumbaiमुंबईhighwayमहामार्गMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार