शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Nitin Gadkari: पुणे - बंगळुरू महामार्ग हाेणार चाैदा पदरी; नितीन गडकरी यांची घोषणा

By प्रशांत बिडवे | Updated: September 15, 2024 19:04 IST

मुंबई ते बंगळुरू चाैदा पदरी द्रुतगती महामार्ग तयार केला जाणार असून कामाचे कंत्राटही निघाले आहे, हा महामार्ग पुण्याच्या रिंगराेडला जाेडला जाणार

पुणे : मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गामुळे पुढील पन्नास वर्षे वाहतुकीला काही अडचण निर्माण हाेणार नाही असे आपण म्हणायचाे, मात्र अद्यापही वाहतुक काेंडीचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे अटल सेतूवरून बाहेर पडताच मुंबई ते बंगळुरू चाैदा पदरी द्रुतगती महामार्ग तयार केला जाणार असून कामाचे कंत्राटही निघाले आहे. हा महामार्ग पुण्याच्या रिंगराेडला जाेडला जाणार असून पुढील सहा महिन्यांत कामाला सुरूवात हाेईल अशी घाेषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्यामुळे पुणे- मुंबई प्रवास आणखी वेगवान हाेणार आहे.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने अभियंता दिनी आयाेजित 'सीओईपी अभिमान पुरस्कार' प्रदान साेहळ्यात गडकरी बाेलत हाेते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कुलगुरू प्रा. सुनिल भिरूड, नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते, मानद सचिव डॉ. सुजीत परदेशी उपस्थित हाेते. यंदाचा सीओईपी जीवनगाैरव पुरस्कार ज्येष्ठ उद्याेगपती पी.एन. भगवती यांच्या वतीने लाेहिया यांनी स्विकारला. तसेच अभिनेता वैभव तत्ववादी, राज्याच्या पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव प्रविण दराडे, सिक्कीमचे कॅबिनेट मंत्री राजू बसनेत, ‘जे.पी माॅर्गन चेस’ च्या सीईओ माेनिका पानपालिया आणि टेस्ला माेटर्सचे वरिष्ठ संचालक ऋषिकेश सगर यांना सीओईपी अभिमान पुरस्काराने गाैरविण्यात आले.गडकरी म्हणाले, समाजाच्या गरजांवर आधारित संशाेधन करणे आणि त्यातून निर्माण हाेणारी सेवा, वस्तू, उत्पादन सर्वसामान्यांना परवडणारे असले पाहिजे. रोजगाराची निर्मिती करणारे आणि निर्यात वाढविणारे तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात आपल्याला अवलंबावे लागणार आहे.

स्मार्ट सिटी नव्हे तर स्मार्ट व्हिलेज गरजेचे

कृषी अर्थव्यवस्थेकडे दूर्लक्ष केल्यामुळे शहरातील लाेकसंख्येत भर पडत आहे. स्मार्ट सिटी नाही तर स्मार्ट व्हिलेज झाले पाहिजेत. त्यासाठी कृषी क्षेत्राला पाणी, जंगल, जमीन आणि प्राणी यावर आधारित नवीन तंत्रज्ञानांची जाेड द्यावी लागेल. देशातील ६५ टक्के लाेकसंख्या कृषि अर्थव्यवस्थेवर आधारित आहे. गाव, गरीब, मजूर आणि शेतकरी हा समृद्ध हाेत नाही ताे पर्यंत आपल्याला आत्मनिर्भर भारत म्हणता येणार नाही. शेतकरी हा आता केवळ अन्नादाता राहिलेला नसून ताे उर्जादाता झाला आहे. ग्रामीण भागात राेजगार निर्मिती झाली तर कशाला लाेक शहरात येतील ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

मी असेपर्यंत विनावाहक कार देशात येणार नाही

समाजाचा विकास आणि गरिबांचे जीवन बदलणारे तंत्रज्ञान पाहिजे. मी जाे पर्यंत आहे ताेवर विनावाहक कार देशात येणार नाही. हे संशाेधन चांगले आहे की वाईट यावरून मला काही देणे घेणे नाही. देशातील २२ लाख लाेकांना राेजगार मिळाला असल्याचेही गडकरी म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीMumbaiमुंबईhighwayमहामार्गMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार