शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

पुणे : अपहरण करून ३५ हजार उकळले ; व्यावसायिकाला शहरातून फिरवले, एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 05:04 IST

शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ते त्यांच्या कारखान्यात होते. त्या वेळी त्यांच्या दुकानात सहा ते सात जण आले. ‘तुम्ही वाईट दर्जाचे लोणी विकता, आम्हाला तीन लाख रुपये द्या,’ असे ते म्हणाले.

पुणे : दुकानात येऊन व्यावसायिकाकडे तीन लाख रुपयांची मागणी करून धमकी देऊन सात ते आठ जणांनी अपहरण केले. त्यानंतर कात्रज, धनकवडी भागात फिरवून पुन्हा ५० हजार रुपयांची मागणी केली़ त्यानंतर ३५ हजार रुपये घेऊन कारखान्यात सोडून दिले. याप्रकरणी कारचालकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.रोहन रामचंद्र साळुंखे (वय ३१,रा़ उरुळी कांचन) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, इतर सात जणांवर कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ४१ वर्षांच्या व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. फिर्यादींचा कोंढवा परिसरात लोणी बनविण्याचा कारखाना आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी अपहरण करण्यासाठी वापरलेल्या कारचालकाला अटक केली. इतर सात जणांपैकी काही जण हे त्याच्या ओळखीचे असून त्यांनी आपल्याला एके ठिकाणी जायचे आहे, असे सांगून नेले आणि पुढे हा प्रकार घडला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.वाईट दर्जाचे लोणी विकता... आम्हाला ३ लाख द्याशनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ते त्यांच्या कारखान्यात होते. त्या वेळी त्यांच्या दुकानात सहा ते सात जण आले. ‘तुम्ही वाईट दर्जाचे लोणी विकता, आम्हाला तीन लाख रुपये द्या,’ असे ते म्हणाले. त्याला फिर्यादींनी नकार दिला़ त्यानंतर कारमध्ये साहेब बसले आहेत. आपल्याला कार्यालयाकडे जायचे आहे, असे सांगून कारमध्ये बसवून कात्रज, धनकवडी परिसरात फिरवले. त्या वेळी कारमध्ये असताना त्यांना आपण हे प्रकरण मिटवून घेऊ, त्यासाठी ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे त्यांना सांगितले. फिर्यादींनी कारखान्यात पैसे आहेत, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी कार कारखान्यात नेली. तेथे गेल्यावर त्यांच्याकडून ३५ हजार रुपये घेऊन कारखान्यात सोडून निघून गेले.

टॅग्स :KidnappingअपहरणCrimeगुन्हाPuneपुणे