शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

पुणे : जिल्ह्यात रोज ११ अपघात; ४ मृत्यू, मागील वर्षभरात ४ हजार अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 06:29 IST

मागील वर्षभरात दररोज सरासरी अकरा अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. मागील वर्षात जिल्ह्यात सुमारे चार हजार अपघात झाले असून...

पुणे : जिल्ह्यात मागील वर्षभरात दररोज सरासरी अकरा अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. मागील वर्षात जिल्ह्यात सुमारे चार हजार अपघात झाले असून त्यात १३९८ जणांचा बळी गेला आहे. २०१६ या वर्षाच्या तुलनेत अपघातांमध्ये काहीशी वाढ झाली असली तरी मृतांचा आकडा किंचित घटल्याचे दिसते.प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मागील तीन वर्षांची अपघातांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीवरून तीन वर्षांत अपघातांमध्ये सातत्य असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मात्र, मृतांचा आकडा कमी झाल्याचे सकारात्मक चित्रही आहे. २०१५ मध्ये पुणे शहर व ग्रामीण भागात अनुक्रमे १४४३ आणि २६३५ असे एकूण ४०७८ एवढे अपघात झाले होते. त्यामध्ये १५४३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. २०१६ मध्ये अपघातांचे प्रमाण काहीसे कमी झाले. पण २०१७ मध्ये त्यातुलनेत वाढ झाली असून सुमारे चार हजार अपघात झाले आहेत. असे असले तरी मृतांचा आकडा घटल्याचे दिसते.पुणे शहरापेक्षा ग्रामीण भागात अपघातांची संख्या अधिक आहे. मागील वर्षी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये मिळून सुमारे दीड हजार अपघात झाले. त्यात ३७३ जणांचा बळी गेला, तर ग्रामीण भागात सुमारे अडीच हजार अपघातांत १ हजार २५ जणांना आपला जीव गमवावा लागला. मागील तीन वर्षांत एकूण ११ हजार ७९० अपघात झाले असून त्यात ४ हजार ४१२ जणांचा मृत्यू झाला, तर ९ हजार ५८२ लोक जखमी झाले.जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अपघातांची आकडेवारी मांडण्यात आली. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या वेळी खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, आमदार भीमराव तापकीर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, वाहतूक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, महामार्ग पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, विनोद सगरे, अनिल वळीव, आनंद पाटील आदी उपस्थित होते. बैठकीत रस्ते अपघात कमी करण्यासाठी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.कृती आराखडा : ट्रफिक पार्क उभारण्याची सूचनाशिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैठकीत प्रत्येक तालुक्यात ट्रॅफिक पार्क उभारण्याची सूचना केली. तसेच स्वतंत्र रस्ता सुरक्षा पथकाची निर्मिती, अपघात कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे, अपघातप्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण, महाविद्यालय व शाळास्तरावर रस्ता सुरक्षा स्वयंसेवकांचे जाळे निर्माण करण्याबाबत त्यांना सूचना केल्या.द्रुतगती महामार्गावरून जाणाºया दुचाकी वाहनांवर कारवाई, तसेच मार्गाच्या जोन्ही बाजूने संरक्षक जाळी लावण्याची सूचना शिरोळे यांनी केली. तसेच त्यांनी खासदार निधीतून आरटीओ ५० लाख रुपयांचा निधी दिला. त्यातून रोलर ब्रेक टेस्टिंग यंत्रणा खरेदी करण्यात येणार असून लहान परिवहन वाहनांचेयोग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे करण्यात येणार आहे. महामार्गावरील बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ड्रोन तंत्राचा वापर करण्याबाबत साबळे यांनी सुचविले.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे