शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

कडधान्य, तेलबियाही होणार नियमनमुक्त; शेतकऱ्यांना मिळणार बाजारभावापेक्षा जादा दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 19:06 IST

शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेली तृणधान्ये, कडधान्ये आणि तेलबिया देखील आता नियमनमुक्त करण्यात येणार आहेत. यासाठी येत्या २८ नोव्हेंबर रोजी विशेष बैठक आयाजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देयेत्या २८ नोव्हेंबर रोजी आयाजित करण्यात आली विशेष बैठकया निर्णयानंतर शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा जादा दर मिळण्याचा मार्ग होणार मोकळा

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेली तृणधान्ये, कडधान्ये आणि तेलबिया देखील आता नियमनमुक्त करण्यात येणार आहेत. यासाठी येत्या २८ नोव्हेंबर रोजी विशेष बैठक आयाजित करण्यात आली असून, या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.राज्यातील तृणधान्ये, कडधान्ये तसेच तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा माल कोठेही विक्री करण्याचा मार्ग लवकरच खुला होणार आहे. भाजीपाला नियमनमुक्तीच्या निर्णयानंतर अडत, हमाली, तोलाई आणि बाजार समित्यांचा सेस अशा सगळ्या जाचातून मुक्तता झालेल्या शेतकरी वर्गाकडून कडधान्य, तृणधान्य आणि तेलबियासुद्धा नियमनमुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली होती.त्यादृष्टीने अभ्यास करण्यासाठी कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीची मंगळवार (दि. २१) रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत यावर अंतिम निर्णय होणार होता, मात्र ती बैठक पुढे ढकलण्यात आली आहे़  संबंधित शेतमाल नियमनमुक्त करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असून या निर्णयानंतर शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा जादा दर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहेत.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPuneपुणे