शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

शिवणेमध्ये देशमुख नगरची समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST

महानगरपालिकेच्या वतीने कचरा उचलण्यात येत असला तरी नागरिक रहदारीच्या जागी रोजच कचरा टाकत आहेत आणि तो न टाकण्यासाठी काहीच ...

महानगरपालिकेच्या वतीने कचरा उचलण्यात येत असला तरी नागरिक रहदारीच्या जागी रोजच कचरा टाकत आहेत आणि तो न टाकण्यासाठी काहीच प्रतिबंध केले जात नाहीत. कचरा उचलल्यानंतर त्यावर औषध फवारणी केली जात नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात डास देखील वाढले आहेत.

रात्रीच्या वेळी लोक इथे कचरा आणून टाकतात तसेच सकाळी लवकर कामाला जाणारा कर्मचारी वर्ग देखील इथेच कचरा फेकत असल्यामुळे कचऱ्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे.

कचऱ्यामुळे रस्त्याचा मोठा भाग देखील व्यापला जात आहे. तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

इथे कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.

जवळच राहत असलेले सचिनदादा देशमुख यांना संपर्क केला असता, ते म्हणाले की प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करूनदेखील प्रशासन दुर्लक्ष करत आहे. कचरा उचलला जात असला तरी तो तेथे न टाकण्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

ग्रामपंचायत असताना येथे कचरा न टाकावा यासाठी कर्मचारी तैनात करून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जात होती त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होते.