शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

खाजगी क्लासेसवाल्यांनी विद्यार्थ्यांना बनवले कैदी; मनुष्यबळ विकास मंत्र्यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 16:24 IST

कोचिंग क्लासेसवाले विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या मार्गावर नेण्याऐवजी परीक्षार्थी बनवून कैदी बनवत असल्याची टीका प्रकाश जावडेकर यांनी ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१८’च्या उद्घाटनप्रसंगी केली.

ठळक मुद्देतरूणाईने विचार करण्यास प्रवृत्त व्हावे, यासाठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन उपक्रम यंदा हार्डवेअरच्या क्षेत्रातील संशोधनावर या स्पर्धेत देण्यात आला भर

पुणे : सध्या कोचिंग क्लासेसचे पेव मोठ्या प्रमाणात फुटले आहे. ८ वी पासूनच जेईई वगैरेचे क्लास विद्यार्थी लावू लागले आहेत. त्यातून क्लासेसवाले विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या मार्गावर नेण्याऐवजी परीक्षार्थी बनवून कैदी बनवत असल्याची जोरदार टीका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी केली.सीओईपी कॉलेजमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१८’ स्पर्धेचे उद्घाटन प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त सचिव सुब्रम्हण्यम, एआयसीटीचे चेअरमन अनिल सहस्त्रबुध्दे, सीओईपीचे संचालक बी. बी. आहुजा, अभय जेरे यावेळी उपस्थित होते. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले.   प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘‘देशातील तरूणाईने विचार करण्यास प्रवृत्त होऊन नवनवीन शोध लावावेत यासाठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसमोर काही समस्या ठेवल्या जाणार आहेत. त्या समस्या त्यांनी तंत्रज्ञानाच्या व शोधाच्या माध्यमातून सोडवायच्या आहेत. यासाठी विद्यार्थी विविध प्रयोग करतील, त्या समस्येवर इतर देशांनी काय सोल्युशन काढले आहे याचा धांडोळा घेतील, त्याबाबत नवीन अपडेट काय घडले आहेत याची माहिती घेतील. आपपासात चर्चा करतील. त्यातून ते त्या समस्यांचे समाधान शोधून काढतील. त्यातून त्यांचे खरं शिक्षण घडणार आहे. ही शिक्षणाच्या दुहेरी पध्दतीतून त्यांना खूप काही शिकायला मिळणार आहे. सध्या विद्यार्थ्यांची प्रतिभेला संधी मिळवून देणे खूप आवश्यक बनले आहे. अलीकडच्या काळात कोचिंग क्लासवाल्यांनी इयत्ता ८ वी पासून विद्यार्थ्यांना कैदी बनवून टाकण्यास सुरूवात केली आहे.’’स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला फुलविण्याची संधी त्यांना प्राप्त होणार आहे. मागील हॅकेथॉन स्पर्धेचे अत्यंत चांगले निकाल मिळाले आहेत. विविध ५२ प्रकारच्या समस्यांचे विद्यार्थ्यांनी समाधान शोधले आहे. संबंधित मंत्रालय, तंत्रज्ञान विभाग यांच्याकडे ते सोपविण्यात आले असून त्यावर आणखी काम करण्यात येत आहे. तार्किक प्रक्रियेतूनच शोधाचा उगम होतो. ही आनंदाची प्रक्रिया आहे. यातूनच विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.अनिल सहस्त्रबुध्दे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांमुळे समस्या उभ्या राहिल्याचे आपल्याला अनेकदा बातम्यांमधून वाचायला मिळते, मात्र हॅकेथॉन स्पर्धेमुळे विद्यार्थी देशासमोरच्या समस्यांवर समाधान शोधून काढत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. यंदा हार्डवेअरच्या क्षेत्रातील संशोधनावर या स्पर्धेत भर देण्यात आला आहे.’’अभय जेरे, सुब्रम्हण्यम यांनीही यावेळी विचार मांडले.  

टॅग्स :Studentविद्यार्थी