शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

खाजगी क्लासेसवाल्यांनी विद्यार्थ्यांना बनवले कैदी; मनुष्यबळ विकास मंत्र्यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 16:24 IST

कोचिंग क्लासेसवाले विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या मार्गावर नेण्याऐवजी परीक्षार्थी बनवून कैदी बनवत असल्याची टीका प्रकाश जावडेकर यांनी ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१८’च्या उद्घाटनप्रसंगी केली.

ठळक मुद्देतरूणाईने विचार करण्यास प्रवृत्त व्हावे, यासाठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन उपक्रम यंदा हार्डवेअरच्या क्षेत्रातील संशोधनावर या स्पर्धेत देण्यात आला भर

पुणे : सध्या कोचिंग क्लासेसचे पेव मोठ्या प्रमाणात फुटले आहे. ८ वी पासूनच जेईई वगैरेचे क्लास विद्यार्थी लावू लागले आहेत. त्यातून क्लासेसवाले विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या मार्गावर नेण्याऐवजी परीक्षार्थी बनवून कैदी बनवत असल्याची जोरदार टीका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी केली.सीओईपी कॉलेजमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१८’ स्पर्धेचे उद्घाटन प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त सचिव सुब्रम्हण्यम, एआयसीटीचे चेअरमन अनिल सहस्त्रबुध्दे, सीओईपीचे संचालक बी. बी. आहुजा, अभय जेरे यावेळी उपस्थित होते. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले.   प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘‘देशातील तरूणाईने विचार करण्यास प्रवृत्त होऊन नवनवीन शोध लावावेत यासाठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसमोर काही समस्या ठेवल्या जाणार आहेत. त्या समस्या त्यांनी तंत्रज्ञानाच्या व शोधाच्या माध्यमातून सोडवायच्या आहेत. यासाठी विद्यार्थी विविध प्रयोग करतील, त्या समस्येवर इतर देशांनी काय सोल्युशन काढले आहे याचा धांडोळा घेतील, त्याबाबत नवीन अपडेट काय घडले आहेत याची माहिती घेतील. आपपासात चर्चा करतील. त्यातून ते त्या समस्यांचे समाधान शोधून काढतील. त्यातून त्यांचे खरं शिक्षण घडणार आहे. ही शिक्षणाच्या दुहेरी पध्दतीतून त्यांना खूप काही शिकायला मिळणार आहे. सध्या विद्यार्थ्यांची प्रतिभेला संधी मिळवून देणे खूप आवश्यक बनले आहे. अलीकडच्या काळात कोचिंग क्लासवाल्यांनी इयत्ता ८ वी पासून विद्यार्थ्यांना कैदी बनवून टाकण्यास सुरूवात केली आहे.’’स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला फुलविण्याची संधी त्यांना प्राप्त होणार आहे. मागील हॅकेथॉन स्पर्धेचे अत्यंत चांगले निकाल मिळाले आहेत. विविध ५२ प्रकारच्या समस्यांचे विद्यार्थ्यांनी समाधान शोधले आहे. संबंधित मंत्रालय, तंत्रज्ञान विभाग यांच्याकडे ते सोपविण्यात आले असून त्यावर आणखी काम करण्यात येत आहे. तार्किक प्रक्रियेतूनच शोधाचा उगम होतो. ही आनंदाची प्रक्रिया आहे. यातूनच विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.अनिल सहस्त्रबुध्दे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांमुळे समस्या उभ्या राहिल्याचे आपल्याला अनेकदा बातम्यांमधून वाचायला मिळते, मात्र हॅकेथॉन स्पर्धेमुळे विद्यार्थी देशासमोरच्या समस्यांवर समाधान शोधून काढत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. यंदा हार्डवेअरच्या क्षेत्रातील संशोधनावर या स्पर्धेत भर देण्यात आला आहे.’’अभय जेरे, सुब्रम्हण्यम यांनीही यावेळी विचार मांडले.  

टॅग्स :Studentविद्यार्थी