शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

पंतप्रधान मोदी यांनी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 20:19 IST

भ्रष्टाचार कमी झाल्याने समाज सुखी जीवन जगत आहे आणि त्यासाठी लागणारे धाडस फक्त मोदी यांच्या निर्णय शक्तीमध्ये आहे असे मत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी व्यक्त केले. 

पुणे : नुकतेच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जागतिक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर एक कोटी ४५ लाख कोटींची करसवलत जाहीर केली आहे. यामुळे हा पैसा अर्थचक्रात उपलब्ध होवून नागरिकांची क्रयशक्ती वाढणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहेत. भ्रष्टाचार कमी झाल्याने समाज सुखी जीवन जगत आहे आणि त्यासाठी लागणारे धाडस फक्त मोदी यांच्या निर्णय शक्तीमध्ये आहे असे मत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी व्यक्त केले. 

पुण्यात आयोजित भाजपच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय संघटनमंत्री व्हि.सतिश, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार बाळा भेगडे, खासदार गिरीश बापट, संजय पाटील, अमर साबळे, यांच्यासह पुणे भाजपच्या अध्यक्ष माधुरी मिसाळ, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष लक्ष्मण जगताप, जिल्हाअध्यक्ष गणेश भेगडे आदी मान्यवर  उपस्थित होते.  

पुढे ते म्हणाले की, मूळचे पश्‍चिम पाकिस्तानातील असलेले इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग हे पंतप्रधान तर लालकृष्ण आडवाणी हे देशाचे उपपंतप्रधान बनू शकले, परंतू कलम ३७० मुळे जम्मू- कश्मिरमधील मुळच्या गुज्जर, बकरवाल समाजाला आरक्षणाअभावी विधानसभा, लोकसभेत प्रतिनिधीत्व करता येत नव्हते. हे कलम हटविल्याने आता जम्मू कश्मिरच्या विधानसभेत आणि संसदेत या समाजाचे प्रतिनिधी दिसतील. कश्मिरच्या महिलांना बाहेरील राज्यात लग्न केल्यानंतरही मालमत्तेत अधिकार मिळणार आहे. आतापर्यंत देशातील बहुतांश कायदे तेथे लागू होत नव्हते, ते यापुढे लागू होतील. तीन तलाक बील मंजूर केल्याने मुस्लिम महिलांना न्याय मिळाला आहे.पाच वर्षापुर्वी महाराष्ट्राचे राजकारण भ्रष्टाचाराने बरबटलेले होते. घराणेशाही, सत्तेतून पैसा यामुळे भ्रष्टाचार बोकाळला होता. सरकार स्थिर नसल्याने राज्याची पिछेहाट झाली होती. परंतू फडणवीस यांच्या नेतृत्वाने शेती, शिक्षण, आरोग्य, परकिय गुंतवणुकीत राज्याला वरच्या स्थानावर आणले आहे.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस