शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

पंतप्रधान मोदी यांनी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 20:19 IST

भ्रष्टाचार कमी झाल्याने समाज सुखी जीवन जगत आहे आणि त्यासाठी लागणारे धाडस फक्त मोदी यांच्या निर्णय शक्तीमध्ये आहे असे मत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी व्यक्त केले. 

पुणे : नुकतेच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जागतिक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर एक कोटी ४५ लाख कोटींची करसवलत जाहीर केली आहे. यामुळे हा पैसा अर्थचक्रात उपलब्ध होवून नागरिकांची क्रयशक्ती वाढणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहेत. भ्रष्टाचार कमी झाल्याने समाज सुखी जीवन जगत आहे आणि त्यासाठी लागणारे धाडस फक्त मोदी यांच्या निर्णय शक्तीमध्ये आहे असे मत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी व्यक्त केले. 

पुण्यात आयोजित भाजपच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय संघटनमंत्री व्हि.सतिश, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार बाळा भेगडे, खासदार गिरीश बापट, संजय पाटील, अमर साबळे, यांच्यासह पुणे भाजपच्या अध्यक्ष माधुरी मिसाळ, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष लक्ष्मण जगताप, जिल्हाअध्यक्ष गणेश भेगडे आदी मान्यवर  उपस्थित होते.  

पुढे ते म्हणाले की, मूळचे पश्‍चिम पाकिस्तानातील असलेले इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग हे पंतप्रधान तर लालकृष्ण आडवाणी हे देशाचे उपपंतप्रधान बनू शकले, परंतू कलम ३७० मुळे जम्मू- कश्मिरमधील मुळच्या गुज्जर, बकरवाल समाजाला आरक्षणाअभावी विधानसभा, लोकसभेत प्रतिनिधीत्व करता येत नव्हते. हे कलम हटविल्याने आता जम्मू कश्मिरच्या विधानसभेत आणि संसदेत या समाजाचे प्रतिनिधी दिसतील. कश्मिरच्या महिलांना बाहेरील राज्यात लग्न केल्यानंतरही मालमत्तेत अधिकार मिळणार आहे. आतापर्यंत देशातील बहुतांश कायदे तेथे लागू होत नव्हते, ते यापुढे लागू होतील. तीन तलाक बील मंजूर केल्याने मुस्लिम महिलांना न्याय मिळाला आहे.पाच वर्षापुर्वी महाराष्ट्राचे राजकारण भ्रष्टाचाराने बरबटलेले होते. घराणेशाही, सत्तेतून पैसा यामुळे भ्रष्टाचार बोकाळला होता. सरकार स्थिर नसल्याने राज्याची पिछेहाट झाली होती. परंतू फडणवीस यांच्या नेतृत्वाने शेती, शिक्षण, आरोग्य, परकिय गुंतवणुकीत राज्याला वरच्या स्थानावर आणले आहे.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस