शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

८०० गावांत बसविणार वीज पडू नये म्हणून अटकाव यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:08 IST

- पुणे जिल्ह्यात तीन वर्षांत ७ लोकांचा वीज पडून मृत्यू लोकमत न्यूज नेटवर्क सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : दर ...

- पुणे जिल्ह्यात तीन वर्षांत ७ लोकांचा वीज पडून मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : दर वर्षी माॅन्सूनपूर्व पावसात जिल्ह्यात वीज पडण्याच्या अनेक घटना घडतात. यात पुणे जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ७ लोकांचा वीज पडून मृत्यू झाला. तर काही ठिकाणी मोठी वित्तहानीदेखील झाली आहे. या पार्श्वभूमीवरच पुणे जिल्ह्यात तब्बल ८०० गावांमध्ये वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या वीज अटकाव यंत्रणेच्या पायलट प्रोजेक्टमध्ये चंद्रपूर आणि पुणे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.

वीज पडणे ही नैसर्गिक घटना असली तरी दर वर्षी यामुळे मुनष्य, पशु आणि वित्त हानी होत असते. जगभरात तसेच भारतातसुद्धा वीज पडल्यामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण जास्त आहे. एका सर्वेक्षणानुसार दरवर्षी सुमारे २५०० व्यक्तींचा मृत्यू वीज पडल्यामुळे होत असतो. त्यामुळे वीज पडणे या घटनेला गांभीर्याने घेतले पाहिजे जेणेकरून मनुष्य, पशु आणि वित्त हानीचे प्रमाण कमी करता येईल. ग्रामीण भागात वीज पडून होणारे मृत्यूचे प्रमाण हे शहरी भागापेक्षा जास्त आहे. माॅन्सून सक्रिय होण्याच्या एक महिना अगोदर अवकाळी आणि पूर्वमौसमी पावसाच्या काळात विजा कोसळण्याचे प्रकार सर्वाधिक घडतात. पाऊस पडण्याच्या आधी आकाशात ढग जमतात आणि काही मिनिटात गडगडाटी वादळासह विजा चमकतात आणि मोठ्या आवाजासह कुठेतरी पडतात. याच कालावधीत शिवारात मशागतीची तयारी सुरू असते, त्यावेळी शेतात कामे करीत असलेल्या शेतकऱ्यांचा, शेत मजुरांचा आणि जनावरांचा वीज पडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना नियमित घडत असतात. वीजपडीमुळे होणारी मनुष्य हानी टाळण्यासाठी राज्य शासनाने सर्वाधिक धोका असलेल्या गावांमध्ये वीज अटकाव यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील चंद्रपूर आणि पुणे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यात एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल ८०० गावांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

------

वीज पडल्याने झालेले मृत्यू

वर्ष मनुष्यबळी जनावरांचा मृत्यू

2019 2 -

2020 1 -

2021 4 -

-------

जिल्ह्यात २८ लाखांची नुकसान भरपाई

पुणे जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत वीज पडून ७ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. वीज पडून मृत्यूमुखी पडणा-या व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासनाकडून ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते. जिल्ह्यात आतापर्यंत सर्व कुटुंबीयांना ही नुकसान भरपाई देण्यात आली असून, आतापर्यंत २८ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

--------

वीज कडाडत असताना ही घ्या काळजी (आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक सूचना)

- विद्युत उपकरणे चालू करून वापरू नका. जसे की हेअर ड्रायर, विद्युत टुथब्रश किंवा विद्युत रेझर, जर वीज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली, तर तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो.

- वादळात टेलिफोनचा वापर टाळा, वीज टेलिफोनच्या घरावरील तारांमधून वाहू शकते.

- बाहेर असताना धातूच्या वस्तूंचा वापर टाळा.

- अर्धवट अवस्थेत बांधकाम झालेल्या इमारतीचा आसरा घेऊ नका.

- जर तुम्हाला विद्युत भारीत वाटत असेल, तुमचे केस उभे असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील, तर तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता आहे. त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा.

-------

जिल्ह्यात ८०० गावांत वीज अटकाव यंत्रणा बसविण्याचे काम सुरू

राज्य शासनाने यंदा प्रायोगिक तत्त्वावर चंद्रपूर आणि पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात वीज पडण्याचा सर्वाधिक धोका असरेल्या गावात वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात ८०० गावांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार असून, याबाबत काम सुरू असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली.