शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

संमेलनाध्यक्ष विरूध्द महामंडळ अध्यक्ष नवा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 1:43 AM

संमेलनाध्यक्ष निवड मुठभरांच्या हाती : संस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न म्हणजे शिस्तीचा भंग

पुणे : साहित्य महामंडळांच्या सन्माननीय सदस्यांना महामंडळाकडून काही अपेक्षित असल्यास ते महामंडळ अध्यक्षांना रितसर संबंधितांच्या मूळ स्वाक्षरीनिशी कळायला हवे. मात्र, तसे न करता कोणीही विपर्यस्त आणि कपोलकल्पित आरोप करून संस्थेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो संस्थात्मक शिस्तीचा भंग आहे, अशा शब्दांत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या आरोपांना खरमरीत शब्दांत प्रत्युत्तर दिले. घटनात्मक प्रक्रियेचा अवमान करून अशा बाबींची दखल घेतली जाण्याचे प्रयोजनच त्यांनीच संपुष्टात आणले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणुकीऐवजी निवड केली जाईल, अशी घटनादुरुस्ती केल्यानंतर सोमवारी देशमुख यांनी महामंडळाच्या या प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला होता. अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अत्यंत चुकीची आणि अध्यक्षांची सन्मानाने निवड या घटनादुरुस्तीच्या मूळ हेतूला काळिमा फासणारी आहे, असे सांगत संमेलनाध्यक्षाची निवड मूठभर लोकांच्या हाती येणार असल्याबद्दल त्यांनी नाराजी नोंदवली होती. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देशमुख यांच्या आक्षेपावर निशाणा साधला.

‘देशमुख स्वत: घटनादुरुस्ती प्रक्रियेत सहभागी असताना व तिथे आपले मत मांडण्याची त्यांना उपलब्ध संधी घेऊन व त्याला अनुसरून त्यांनी निवडीसाठी महामंडळाकडे नावदेखील पाठवले आहे, असे असताना संस्थात्मक सामूहिक निर्णय प्रक्रियेचा व सामूहिक विवेकाचा असा अवमान करणे अनाकलनीय आहेच; शिवाय ते महामंडळाच्या घटनेचा, घटनात्मक प्रक्रियेचा, प्रक्रियेत सहभागी संस्थांच्या भूमिकांचा अवमान करणारे आहे’, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

देशमुख यांची मूळ स्वाक्षरी असलेले कोणतेही पत्र अथवा प्रस्ताव महामंडळाच्या कार्यालयात आलेला नाही. तसे पत्र अध्यक्षांच्या अवलोकनात अद्याप आलेले नाही. पत्र मिळाल्यावर घटना व नियमानुसार जे यथोचित असेल त्याप्रमाणे विचार केला जाईल. मात्र, तसे काहीही होण्याची वाट न बघता अगोदरच कोणी अकारणच अधीर होत दबाव निर्माण करू पाहत असेल तर तो संस्थात्मक शिस्तीचा भंग, औचित्य, संकेत आणि परंपरा यांचाही भंग ठरतो. महामंडळ सदस्य असणाऱ्या कोणीही असे काहीही करणे अपेक्षित नाही.- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी