शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
3
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
4
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
5
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
6
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
7
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
8
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
9
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
10
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
11
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
12
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
13
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
14
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
15
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
16
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
17
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
18
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
19
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
20
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...

प्रदूषण रोखण्याचा ‘आराखडा’ तयार!, रासायनिक सांडपाणी पूर्ण प्रक्रिया करून वनविभागाला देण्याची तयारी पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:10 IST

कुरकुंभ रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून पाणी पूर्ण प्रक्रिया करूनच वनविभागाच्या हद्दीत सोडून वनविभागाला नव्याने आॅक्सिजन प्लँट उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील रासायनिक प्रदूषणाच्याबाबतीत जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कुरकुंभ रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून पाणी पूर्ण प्रक्रिया करूनच वनविभागाच्या हद्दीत सोडून वनविभागाला नव्याने आॅक्सिजन प्लँट उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कुरकुंभ येथील पाण्याच्यासंदर्भात घेण्यात आलेला अ‍ॅक्शन प्लॅन जवळपास तयार झाला असून यावर युद्धपातळीवर काम करण्यात येत असल्याची माहिती या संबंधित अधिकाºयांनी दिली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कुरकुंभ येथील रासायनिक प्रदूषणाच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी गांभीर्याने पावले उचलण्याची गरज असल्याची सांगत सांडपाण्याला पूर्ण प्रक्रिया न करता उघड्यावर सोडणाºया कंपन्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यांनी अगदी अल्पावधीत या सर्व प्रकारांवर निर्णय देऊन कित्येक वर्षांपासून जाणूनबुजून खितपत पडलेल्या विषयाला निकाली काढल्याने कुरकुंभ येथील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी राव यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र व प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून या सर्व घटनेचा लेखाजोखा मागितला आहे.याबाबत लवकर उपाययोजना करून माहिती मागितली आहे. त्यानुसार कुरकुंभ येथे जोमात काम सुरू असून येणाºया अगदी दोन दिवसांत या प्रक्रिया पूर्णत्वाकडे जाऊन प्रक्रिया केलेले सांडपाणी वनविभागाला सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.गेली दहा वर्षांत वनविभागाच्या जागेत पाणी सोडण्याची यंत्रणा बंद पडली होती. त्यामुळे या आदेशानुसार यावर तत्काळ काम सुरू करण्यात आले असून याची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे येणाºया काही दिवसांतच याचे काम पूर्ण करून पाण्याची विल्हेवाट लागणार आहे. महाराष्ट्र विकास मंडळाच्या अधिकाºयांनीदेखील याबाबत दुजोरा दिला असल्याने आता लवकरच पुढील प्रक्रिया पूर्ण होताना दिसणार असल्याची चिन्हे आहेत.>कुरकुंभ येथील जनतेने प्रथमच जनआक्रोश आंदोलन करीत या सर्व जबाबदार प्रशासनाला जाब विचारला होता. ग्रामस्थांच्या या लढ्याचे प्रथमच पडसाद उमटून सर्व प्रशासन खडबडून जागे झाले आहे.याचाच परिणाम म्हणूनच या लढ्याला यश प्राप्त झाले व शासनदरबारी याची योग्य दखल घेतली गेली. परिणामी मोठ्या स्वरूपात कुरकुंभ येथील रासायनिक पाण्याचे प्रदूषण थांबले आहे.>उग्र वासातून मुक्तीकुरकुंभ येथील ओढ्यातून मोठ्या स्वरुपात वाहत येणारे रासायनिक सांडपाणी अगदी कुरकुंभच्या मुख्य चौकात बारामतीकडे जाणाºया मार्गावरील पुलाखाली जमा होत होते. परिणामी या सर्व ठिकाणी उग्र वास व दुर्गंधी पसरली होती. या ओढ्याच्या कडेलाच दर गुरुवारी आठवडेबाजार भरत असल्याने हजारो नागरिक या दुर्गंधीने त्रस्त होते. तसेच यालाच लागून प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने त्यालादेखील याचा दुष्परिणाम भोगावा लागत होता. मात्र सामूहिक सांडपाणी प्रक्रिया बंद असल्याने तो उग्र वास जवळपास बंद झाला असून नागरिकांनी व या ओढ्याने दोन दशकातून पहिल्यांदा या प्रदूषणातून मुक्ती मिळवली असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.>कंपन्यांची झाडाझडतीजिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांनी प्रथमच मोठ्या स्वरुपात याची गंभीर दखल घेऊन सर्व कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे. विविध अधिकारी या ठिकाणी येऊन कंपन्यांची पाण्याबाबत माहिती गोळा करीत आहेत.अशा प्रकारची मोठी कारवाई प्रथमच या ठिकाणी होत असल्याचे काही कंपन्यांच्या अधिकाºयांनी सांगितले आहे. त्यामुळे अगदी थोड्या काळातच सदोष कंपन्या समोर येणार असून या सर्वांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

टॅग्स :Puneपुणे