शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण रोखण्याचा ‘आराखडा’ तयार!, रासायनिक सांडपाणी पूर्ण प्रक्रिया करून वनविभागाला देण्याची तयारी पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:10 IST

कुरकुंभ रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून पाणी पूर्ण प्रक्रिया करूनच वनविभागाच्या हद्दीत सोडून वनविभागाला नव्याने आॅक्सिजन प्लँट उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील रासायनिक प्रदूषणाच्याबाबतीत जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कुरकुंभ रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून पाणी पूर्ण प्रक्रिया करूनच वनविभागाच्या हद्दीत सोडून वनविभागाला नव्याने आॅक्सिजन प्लँट उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कुरकुंभ येथील पाण्याच्यासंदर्भात घेण्यात आलेला अ‍ॅक्शन प्लॅन जवळपास तयार झाला असून यावर युद्धपातळीवर काम करण्यात येत असल्याची माहिती या संबंधित अधिकाºयांनी दिली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कुरकुंभ येथील रासायनिक प्रदूषणाच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी गांभीर्याने पावले उचलण्याची गरज असल्याची सांगत सांडपाण्याला पूर्ण प्रक्रिया न करता उघड्यावर सोडणाºया कंपन्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यांनी अगदी अल्पावधीत या सर्व प्रकारांवर निर्णय देऊन कित्येक वर्षांपासून जाणूनबुजून खितपत पडलेल्या विषयाला निकाली काढल्याने कुरकुंभ येथील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी राव यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र व प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून या सर्व घटनेचा लेखाजोखा मागितला आहे.याबाबत लवकर उपाययोजना करून माहिती मागितली आहे. त्यानुसार कुरकुंभ येथे जोमात काम सुरू असून येणाºया अगदी दोन दिवसांत या प्रक्रिया पूर्णत्वाकडे जाऊन प्रक्रिया केलेले सांडपाणी वनविभागाला सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.गेली दहा वर्षांत वनविभागाच्या जागेत पाणी सोडण्याची यंत्रणा बंद पडली होती. त्यामुळे या आदेशानुसार यावर तत्काळ काम सुरू करण्यात आले असून याची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे येणाºया काही दिवसांतच याचे काम पूर्ण करून पाण्याची विल्हेवाट लागणार आहे. महाराष्ट्र विकास मंडळाच्या अधिकाºयांनीदेखील याबाबत दुजोरा दिला असल्याने आता लवकरच पुढील प्रक्रिया पूर्ण होताना दिसणार असल्याची चिन्हे आहेत.>कुरकुंभ येथील जनतेने प्रथमच जनआक्रोश आंदोलन करीत या सर्व जबाबदार प्रशासनाला जाब विचारला होता. ग्रामस्थांच्या या लढ्याचे प्रथमच पडसाद उमटून सर्व प्रशासन खडबडून जागे झाले आहे.याचाच परिणाम म्हणूनच या लढ्याला यश प्राप्त झाले व शासनदरबारी याची योग्य दखल घेतली गेली. परिणामी मोठ्या स्वरूपात कुरकुंभ येथील रासायनिक पाण्याचे प्रदूषण थांबले आहे.>उग्र वासातून मुक्तीकुरकुंभ येथील ओढ्यातून मोठ्या स्वरुपात वाहत येणारे रासायनिक सांडपाणी अगदी कुरकुंभच्या मुख्य चौकात बारामतीकडे जाणाºया मार्गावरील पुलाखाली जमा होत होते. परिणामी या सर्व ठिकाणी उग्र वास व दुर्गंधी पसरली होती. या ओढ्याच्या कडेलाच दर गुरुवारी आठवडेबाजार भरत असल्याने हजारो नागरिक या दुर्गंधीने त्रस्त होते. तसेच यालाच लागून प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने त्यालादेखील याचा दुष्परिणाम भोगावा लागत होता. मात्र सामूहिक सांडपाणी प्रक्रिया बंद असल्याने तो उग्र वास जवळपास बंद झाला असून नागरिकांनी व या ओढ्याने दोन दशकातून पहिल्यांदा या प्रदूषणातून मुक्ती मिळवली असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.>कंपन्यांची झाडाझडतीजिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांनी प्रथमच मोठ्या स्वरुपात याची गंभीर दखल घेऊन सर्व कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे. विविध अधिकारी या ठिकाणी येऊन कंपन्यांची पाण्याबाबत माहिती गोळा करीत आहेत.अशा प्रकारची मोठी कारवाई प्रथमच या ठिकाणी होत असल्याचे काही कंपन्यांच्या अधिकाºयांनी सांगितले आहे. त्यामुळे अगदी थोड्या काळातच सदोष कंपन्या समोर येणार असून या सर्वांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

टॅग्स :Puneपुणे