माउलींच्या स्वागतासाठी नियोजन आराखडा तयार
By Admin | Updated: June 9, 2015 05:33 IST2015-06-09T05:33:13+5:302015-06-09T05:33:13+5:30
लाखो भाविक-भक्त व यात्रेकरूंना मूलभूत नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आळंदी नगर परिषदेच्या वतीने नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे.

माउलींच्या स्वागतासाठी नियोजन आराखडा तयार
आळंदी : संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचा प्रस्थान ९ जुलै रोजी रात्री ९ वाजता सोहळा होणार आहे. त्यानिमित्त आळंदीत येणाऱ्या लाखो भाविक-भक्त व यात्रेकरूंना मूलभूत नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आळंदी नगर परिषदेच्या वतीने नियोजन आराखडा तयार करण्यात आला असून, पालखी सोहळ्याच्या व्यवस्थेसाठी न. प. प्रशासन सज्ज झाले आहे.
यात्रा नियोजनासाठी नियंत्रण कक्ष, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य व स्वच्छता विभाग, पाणीपुरवठा विभाग, अतिक्रमण विभाग, वसुली विभाग, विद्युत विभाग, संरक्षण विभाग असे विभागनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. त्या त्या पथकासाठी नियुक्त कर्मचारी त्या त्या विभागाचे काम व जबाबदारी स्वतंत्रपणे सांभाळणार आहेत. नियंत्रण कक्षासाठी चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. यात्रा काळात नियुक्त सर्व विभागाची समन्वय राखण्याची भूमिका बजावण्यात येणार आहे. याच विभागामार्फत सर्व विभागाच्या कामकाजाची माहिती ठेवणे, यात्रेसंबंधी पत्रव्यवहार करणे, वारकऱ्यांकडून आलेल्या तक्रारी व सूचनांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांना माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत खेड तालुका हद्दीमध्ये इंद्रायणीच्या घाटावर आपत्ती व्यवस्थापनाची उभारणी करण्यात येणार आहे, तर हवेली तालुक्याच्या हद्दीमध्ये ‘वाय’ जंक्शनला आपत्ती व्यवस्थापनाची उभारणी करण्यात येणार आहे. या कक्षात विविध सूचनांचे फलक लावण्यात येणार असून, भाविकांना सूचना देण्यासाठी स्पीकरची सोय करण्यात येणार
आहे. (वार्ताहर)
४सुरक्षेसाठी ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची व्यवस्था. ४पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध व्हावा, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे यासाठी आळंदी व दिघी पोलिसांकडे संपर्क. ४अन्न, औषध-भेसळ प्रतिबंधक प्रशासनाने अन्नपदार्थ विक्रेत्यांना ‘ना हरकत’ देताना न.प.ची ‘ना हरकत’ घ्यावी. ४पाटबंधारे विभागाने इंद्रायणी पात्रात पुरसे पाणी सोडावे. ४महसूल विभागाने यात्राकाळात रॉकेल, स्वस्त धान्य व गॅस पुरवठ्याची सोय करावी. ४शहरात वारकऱ्यांसाठी पुरेशा शौचालयांची सोय करण्यात आली असून, नागरिक व वारकऱ्यांसाठी ही शौचालये मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी पैसे मागणी केल्यास संपर्क साधावा.