शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

बारामती तालुक्यात खरिपाची तयारी पूर्ण

By admin | Updated: May 31, 2017 01:53 IST

बारामती तालुक्याला आता खरिप हंगामाचे वेध लागले आहेत. मागील वर्षी खरिप हंगामात बारामती तालुक्यात सुमारे ९८ टक्के क्षेत्रावर

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : बारामती तालुक्याला आता खरिप हंगामाचे वेध लागले आहेत. मागील वर्षी खरिप हंगामात बारामती तालुक्यात सुमारे ९८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. सलग पाच वर्षे दुष्काळाचे तोंड पाहिलेल्या जिरायती भागासाठी खरिप हंगाम महत्त्वाचा मानला जातो. तालुका कृषी विभाग व पंचायत समितीने खरिप हंगामाचे नियोजन केले आहे. बारामती तालुका मुख्यत्वे रब्बी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र जिरायती भागातील शेतकरी मोठ्याप्रमाणात पावसाच्या भरवशावर खरिपाची पिके घेत असतात. मागील वर्षी खरिप हंगामात १३ हजार ३०१ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. खरिपामध्ये तालुक्यात मुख्यत्वे बाजरी, मका, सोयाबिन, तूर, सुर्यफुल आदी विविध प्रकारच्या पिकांची लागवडी होतात. बाजरीची तालुक्यात सर्वात जास्त सरासरी ९ हजार ५४३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याखालोखाल मका, इतर तृणधान्ये, कडधान्य आणि तेलबियांच्या लागवडी होत असतात. जिरायती भागाला पावसाने सुरुवातीच्या काळात चांगला हात दिला तर येथील हंगाम यशस्वी होतो. मात्र मागील पाच वर्षांपासून जिरायती भागावर पावसाची अवकृपा राहिली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मागील पाचही खरिप हंगाम वाया गेले आहेत. मान्सून देशात दाखल होत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी देखील पावसासाठी आतुर झाला आहे. खरीप हंगामासाठी शेतकरी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगात पूर्ण होत आहेत. शेतजमिनी नांगरून पेरणीसाठी तयार झाल्या आहेत. यावेळी तरी खरिपात चांगला पाऊस पडावा यासाठी शेतकरी प्रार्थना करीत आहे. खरीप हंगामासाठी कृषी विभागानेही तयारी पूर्ण केली आहे. खते, बी-बियाणांचा पुरेसा साठा केला आहे, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ५१८ टन बियाणांची मागणी खरिप हंगासाठी १७ हजार ७९० टन खते तर १ हजार २४ क्विंटल बियाणांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. खतामध्ये युरीया ७ हजार ७८० टन एवढा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. त्याखालोखाल एसएसपी, एमओपी यांच्यासह इतर रासायनिक खते उपलब्ध करण्यात आली आहेत. तर संयुक्त खतांचा ६ हजार ९७० टन खते उपलब्ध करण्यात आली आहेत. यंदा खत विक्रीतील काळाबाजार रोखण्यासाठी ई-पॉस मशीनचा वापर करण्यात येणार आहे. तालुक्यासाठी संकरित बाजरी, सुधारित बाजरी, मका, भूईमुग, सूर्यफूल, सोयाबिन, तूर, मूग, उडीद, ढेंचा, ताग आदी बियाणांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. तर यंदा महाबीजकडून तालुक्यासाठी ५१८ मेट्रिक टन बियाणांची मागणी करण्यात आली होती, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. बियाणांचे नमुने ठेवा...हंगामामध्ये अनेक बोगस कंपन्या निकृष्ट प्रतीचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारत असतात. त्यामुळे मेहनत घेऊनही हंगामात पिके हातची गेल्याची उदाहरणे अनेक वेळा दिसून आली आहेत. त्यामुळे खरेदी केलेल्या बियाणांच्या पावत्या, बिले शेतकऱ्यांनी जपून ठेवावीत. तसेच आपण पेरत असलेल्या बियाणांमधील नमुने शिल्लक ठेवावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.