शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पाणी अक्षय राहण्यासाठी प्रार्थना करणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 15:59 IST

प्रत्येकजण सोने-चांदीची पूजा करतो. पण त्यापेक्षा पाणी अनमोल आहे. त्याचे पूजन व्हावे आणि ही चळवळ वाढावी हीच इच्छा आहे. पाणी पूजन ही आपली परंपरा आहे, पण सध्या पाण्याकडे दुर्लक्ष केले जाते.

ठळक मुद्दे हा उपक्रम निश्चितच समाजाला दिशा देणारा

पुणे :अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक यादिवशी आपण देवघरांत सोने,चांदी ,हिरे यांचे पूजन करण्यात येते. ते अक्षय रहावे म्हणून प्रार्थना केली जाते. त्यापेक्षाही महत्वाचे आणि अनमोल जर काही आपल्या जीवनात असेल तर ते आहे पाणी. हे पाणी प्रदूषण मुक्त, जिवंत आणि अक्षय रहावे म्हणून भरल्या घटाचे पूजन आणि प्रार्थना या अक्षयतृतीयेच्या निमित्त पर्यावरणप्रेमी करणार आहे.पर्यावरणप्रेमींनी अक्षयतृतीया निमित्त पाण्याचे पूजन करून ते अक्षय राहण्यासाठी प्रार्थना करणार आहे. या मुहूर्तावर पाण्याने भरलेले घट दान करण्याची परंपरा आहे. त्यानिमित्त आपण जल समृद्ध देश घडवण्यासाठी प्रयत्न आणि प्रार्थना करू हे जल दान निश्चित अक्षय राहील.    तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या तिथीस महत्त्व येण्याचे कारण म्हणजे हा काहींच्या मते कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभदिन आहे. कालविभागाचा कोणताही प्रारंभदिन भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो म्हणून अशा तिथीस स्नान, दान इत्यादी धर्मकृत्ये सांगितली जातात. या दिवशी विष्णूची पूजा, होम, दान करावे असे शास्त्र सांगते.उन्हापासून संरक्षण करणा-या छत्री, पादत्राणे अशा वस्तू दान करण्याची पध्दत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे इत्यादीही करतात.परंतु, पर्यावरण प्रेमींचा हा उपक्रम इतरांनीही करावा असा आहे. याबाबत पर्यावरणप्रेमी गणेश कलापुरे म्हणाले, पाणी हे जीवन असून ते अक्षय राहिले तरच आपण जिवंत राहू. पाण्याचे पूजन करून ते अक्षय राहण्यासाठी प्रार्थना करणार आहे. दरवर्षी मंदिरात जाऊन पाण्याचा घट दान करतो. त्याचे पूजन करतो. मी हा उपक्रम घरी राबवतो. कारण पाणी हे अक्षय रहावे, हा त्यामागील हेतू आहे. प्रत्येकजण सोने-चांदीची पूजा करतो. पण त्यापेक्षा पाणी अनमोल आहे. त्याचे पूजन व्हावे आणि ही चळवळ वाढावी हीच इच्छा आहे. पाणी पूजन ही आपली परंपरा आहे, पण सध्या पाण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की, त्यांनी देखील हा उपक्रम राबवावा. त्यांचा हा उपक्रम निश्चितच समाजाला दिशा देणारा ठरणारा आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी