शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पाणी अक्षय राहण्यासाठी प्रार्थना करणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 15:59 IST

प्रत्येकजण सोने-चांदीची पूजा करतो. पण त्यापेक्षा पाणी अनमोल आहे. त्याचे पूजन व्हावे आणि ही चळवळ वाढावी हीच इच्छा आहे. पाणी पूजन ही आपली परंपरा आहे, पण सध्या पाण्याकडे दुर्लक्ष केले जाते.

ठळक मुद्दे हा उपक्रम निश्चितच समाजाला दिशा देणारा

पुणे :अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक यादिवशी आपण देवघरांत सोने,चांदी ,हिरे यांचे पूजन करण्यात येते. ते अक्षय रहावे म्हणून प्रार्थना केली जाते. त्यापेक्षाही महत्वाचे आणि अनमोल जर काही आपल्या जीवनात असेल तर ते आहे पाणी. हे पाणी प्रदूषण मुक्त, जिवंत आणि अक्षय रहावे म्हणून भरल्या घटाचे पूजन आणि प्रार्थना या अक्षयतृतीयेच्या निमित्त पर्यावरणप्रेमी करणार आहे.पर्यावरणप्रेमींनी अक्षयतृतीया निमित्त पाण्याचे पूजन करून ते अक्षय राहण्यासाठी प्रार्थना करणार आहे. या मुहूर्तावर पाण्याने भरलेले घट दान करण्याची परंपरा आहे. त्यानिमित्त आपण जल समृद्ध देश घडवण्यासाठी प्रयत्न आणि प्रार्थना करू हे जल दान निश्चित अक्षय राहील.    तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या तिथीस महत्त्व येण्याचे कारण म्हणजे हा काहींच्या मते कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभदिन आहे. कालविभागाचा कोणताही प्रारंभदिन भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो म्हणून अशा तिथीस स्नान, दान इत्यादी धर्मकृत्ये सांगितली जातात. या दिवशी विष्णूची पूजा, होम, दान करावे असे शास्त्र सांगते.उन्हापासून संरक्षण करणा-या छत्री, पादत्राणे अशा वस्तू दान करण्याची पध्दत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे इत्यादीही करतात.परंतु, पर्यावरण प्रेमींचा हा उपक्रम इतरांनीही करावा असा आहे. याबाबत पर्यावरणप्रेमी गणेश कलापुरे म्हणाले, पाणी हे जीवन असून ते अक्षय राहिले तरच आपण जिवंत राहू. पाण्याचे पूजन करून ते अक्षय राहण्यासाठी प्रार्थना करणार आहे. दरवर्षी मंदिरात जाऊन पाण्याचा घट दान करतो. त्याचे पूजन करतो. मी हा उपक्रम घरी राबवतो. कारण पाणी हे अक्षय रहावे, हा त्यामागील हेतू आहे. प्रत्येकजण सोने-चांदीची पूजा करतो. पण त्यापेक्षा पाणी अनमोल आहे. त्याचे पूजन व्हावे आणि ही चळवळ वाढावी हीच इच्छा आहे. पाणी पूजन ही आपली परंपरा आहे, पण सध्या पाण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की, त्यांनी देखील हा उपक्रम राबवावा. त्यांचा हा उपक्रम निश्चितच समाजाला दिशा देणारा ठरणारा आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी