शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे एक महिन्यापासून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 19:40 IST

शेतकऱ्यांची तातडीने दुरुस्तीची मागणी

ठळक मुद्देशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने पाणी असून देखील काही पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.

उंडवडी कडेपठार: गेल्या एक महिन्यापासून बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथील गावठाणात शेतीपंपाची थ्री फेज लाईन रोहिञ एक महिन्यापासून जळाल्याने येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ते तातडीने दुरूस्तीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी अनेकदा संबंधितांशी संपर्क करुन माहिती दिली. आज दुरुस्ती होईल, उद्या दुरुस्ती होईल अशी उत्तरे संबधितांकडून शेतक-यांना मिळत आहेत. एक महिना होऊनही जळालेली रोहिञ दुरूस्ती करण्यात आली नाही. या जळालेल्या रोहिञावर जवळपास २२ शेतकऱ्यांचे कनेक्शन असून सध्या शेतीमध्ये मका,कडबा,भूईमुग पिक आहे. तसेच इतर पिके शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने पाणी असून देखील काही पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.

तर काही पिके पूर्णपणे जळुन गेली आहे. त्याच बरोबर गावात पाणी टंचाई असल्यामुळे त्या ठिकाणच्या बोरवेल, विहिरींचे पाणी शेतकऱ्यांनी घरी पिण्यासाठी,जनावरांना पिण्यासाठी तसेच घरी वापरासाठी पाईपलाईनच्या माध्यमातून आणले आहे. एक महिना होऊन देखील महावितरणाने याकडे दुर्लक्ष केल्याने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानाची भरपाई महावितरणाने शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेelectricityवीजPurandarपुरंदरFarmerशेतकरी