शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

वालचंदनगर उपविभागात थकीत १२०० कृषी पंपाचा विद्युत पुरवठा केला खंडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 12:59 IST

येथील वालचंदनगर उपविभागात लासूर्णे, भिगवण, वालचंदनगर, तावशी व शेळगाव असे सहा सेक्शन येतात. या मधील सुमारे १२०० कृषी पंपाचा विद्युत पुरवठा थकबाकीमुळे महावितरणने खंडित केला आहे

लासुर्णे (पुणे): वालचंदनगर उपविभागातील सहा सेक्शनमधील सुमारे १२०० कृषी पंपाचा विद्युत पुरवठा थकबाकीमुळे महावितरणने खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे हाता तोंडाला आलेली पिके वाया जाणार आहेत. आगोदरच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच महावितरण कंपनीने 'शॉक' दिल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.

येथील वालचंदनगर उपविभागात लासूर्णे, भिगवण, वालचंदनगर, तावशी व शेळगाव असे सहा सेक्शन येतात. या मधील सुमारे १२०० कृषी पंपाचा विद्युत पुरवठा थकबाकीमुळे महावितरणने खंडित केला आहे. वीजपुरवठा खंडित केल्याने पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. या भागात शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय केला जातो. तसेच या भागात जनावरांची संख्या आधिक आहे. महावितरणच्या या कारवाईमुळे या भागातील पशुपालन व्यवसाय कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.

नितीन माने या शेतकऱ्याने ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की, अगोदरच शेतकरी अडचणीत आहे. यात आणखी महावितरणने कृषी पंप बंद करून शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. यामुळे जनावरांचा ओला चारा जळून जाणार आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. तसेच शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय जो केला जातो तो देखील कोलमडणार आहे.

शरद जोशी विचार मंच प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी सांगितले की, महावितरण कंपनीने घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून न्यायालयाच्या विरोधात घेतलेला आहे. कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यास बारामती, पुणे व मुंबईचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला आहे.

उपविभागात १०६ कोटी थकबाकी आहे. कृषी योजनेतील माफ करुन भरावायाची थकबाकी व सप्टेंबर २०२० ते सप्टेंबर २०२१ च्या चालू बिलातील रक्कम भरुन महावितरणला सहकार्य करावे.

-एम. व्ही. सुळ (वालचंदनगर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता)

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीelectricityवीजmahavitaranमहावितरण