शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

सत्ता तुमची, निर्णय तुम्ही घेणार अन् म्हणे विरोधकांनो भूमिका घ्या; शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 06:12 IST

सत्ताधाऱ्यांच्या विधानांमुळेच राज्यात वाद वाढला, असा आरोपही त्यांनी केला. पुणे येथील एका कार्यक्रमानंतर आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.

पुणे : आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांनी मत मांडावं, असा त्यांचा (सरकारचा) आग्रह आहे. राज्यकर्ते हे, निर्णय द्यायचा अधिकार यांचा, सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी आणि मग निर्णय घ्यावा, ही भूमिका समंजसपणाची नव्हती, शहाणपणाची नव्हती, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना फटकारले.

सत्ताधाऱ्यांच्या विधानांमुळेच राज्यात वाद वाढला, असा आरोपही त्यांनी केला. पुणे येथील एका कार्यक्रमानंतर आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी शरद पवार यांची भेट घेतली हाेती. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता पवार म्हणाले, अलीकडील भुजबळांची दोन भाषणं छान झाली. त्याआधी ते बीडला गेले. बारामतीतही त्यांनी चांगलं भाषण केलं. दोन्ही भाषणांत माझ्याबद्दल आस्था आणि कौतुक व्यक्त केलं. त्यानंतर ते मला भेटायला आले. भुजबळ मला म्हणाले, ‘झालं गेलं सोडून द्या, मार्ग काढावा लागेल. नाहीतर महाराष्ट्रात वाद वाढतील.’ पण, स्पष्ट सांगायचं म्हणजे या लोकांनी जी विधाने केली ती वाद वाढायला मदत करणारी होती. मार्ग काढायचा असेल तर राज्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे.

जरांगेंना काय कमिटमेंट केली ते सांगा

या सर्व गोष्टीत सरकारतर्फे चर्चेला मुख्यमंत्री शिंदे होते. छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस, अजित पवार होते. इतरही हाेते. या लोकांनी काय निर्णय घेतला माहीत नव्हते. आम्हाला बाजूला ठेवून यांनी निर्णय घेतले. आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवार यांची गरज आहे, असं ‘मार्गदर्शन’ भुजबळांनी केलं, असेही पवार म्हणाले. मी सांगितलं की, प्रश्न सोडवायचा असेल तर जरांगेंना काय कमिटमेंट केली आहे, कोणत्या गोष्टीची पूर्तता केली व करणार आहात, ते सांगा. ओबीसींना त्यांच्या हिताची काही कमिटमेंट केली असेल तर तीही माहिती द्या. त्यातून काही चांगलं निघत असेल तर तुमची धोरणं दुरुस्त करून, बाकीच्या गोष्टी विसरून पुढे जाऊ, असंही पवार यांनी म्हणाले.

महिन्याने जागे झाले

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आषाढीनिमित्तच्या पोस्टबद्दल पवार म्हणाले, राज ठाकरे ८-१० दिवसांनी, महिन्याने, दोन महिन्यांनी कधी जागे झाले तर असं बोलतात. ते अशाच विषयावर टिप्पणी करतात, ज्याची दखल वाचक घेतात, ज्यामुळे उद्याच्या पेपरात बातमी होईल, असे म्हणत पवारांनी फिरकी घेतली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस