शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

सत्ता तुमची, निर्णय तुम्ही घेणार अन् म्हणे विरोधकांनो भूमिका घ्या; शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 06:12 IST

सत्ताधाऱ्यांच्या विधानांमुळेच राज्यात वाद वाढला, असा आरोपही त्यांनी केला. पुणे येथील एका कार्यक्रमानंतर आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.

पुणे : आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांनी मत मांडावं, असा त्यांचा (सरकारचा) आग्रह आहे. राज्यकर्ते हे, निर्णय द्यायचा अधिकार यांचा, सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी आणि मग निर्णय घ्यावा, ही भूमिका समंजसपणाची नव्हती, शहाणपणाची नव्हती, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना फटकारले.

सत्ताधाऱ्यांच्या विधानांमुळेच राज्यात वाद वाढला, असा आरोपही त्यांनी केला. पुणे येथील एका कार्यक्रमानंतर आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी शरद पवार यांची भेट घेतली हाेती. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता पवार म्हणाले, अलीकडील भुजबळांची दोन भाषणं छान झाली. त्याआधी ते बीडला गेले. बारामतीतही त्यांनी चांगलं भाषण केलं. दोन्ही भाषणांत माझ्याबद्दल आस्था आणि कौतुक व्यक्त केलं. त्यानंतर ते मला भेटायला आले. भुजबळ मला म्हणाले, ‘झालं गेलं सोडून द्या, मार्ग काढावा लागेल. नाहीतर महाराष्ट्रात वाद वाढतील.’ पण, स्पष्ट सांगायचं म्हणजे या लोकांनी जी विधाने केली ती वाद वाढायला मदत करणारी होती. मार्ग काढायचा असेल तर राज्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे.

जरांगेंना काय कमिटमेंट केली ते सांगा

या सर्व गोष्टीत सरकारतर्फे चर्चेला मुख्यमंत्री शिंदे होते. छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस, अजित पवार होते. इतरही हाेते. या लोकांनी काय निर्णय घेतला माहीत नव्हते. आम्हाला बाजूला ठेवून यांनी निर्णय घेतले. आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवार यांची गरज आहे, असं ‘मार्गदर्शन’ भुजबळांनी केलं, असेही पवार म्हणाले. मी सांगितलं की, प्रश्न सोडवायचा असेल तर जरांगेंना काय कमिटमेंट केली आहे, कोणत्या गोष्टीची पूर्तता केली व करणार आहात, ते सांगा. ओबीसींना त्यांच्या हिताची काही कमिटमेंट केली असेल तर तीही माहिती द्या. त्यातून काही चांगलं निघत असेल तर तुमची धोरणं दुरुस्त करून, बाकीच्या गोष्टी विसरून पुढे जाऊ, असंही पवार यांनी म्हणाले.

महिन्याने जागे झाले

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आषाढीनिमित्तच्या पोस्टबद्दल पवार म्हणाले, राज ठाकरे ८-१० दिवसांनी, महिन्याने, दोन महिन्यांनी कधी जागे झाले तर असं बोलतात. ते अशाच विषयावर टिप्पणी करतात, ज्याची दखल वाचक घेतात, ज्यामुळे उद्याच्या पेपरात बातमी होईल, असे म्हणत पवारांनी फिरकी घेतली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस