शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पालखी सोहळ्यानंतर पुण्यात पाणी कपातीची शक्यता, धरणांतील पाणीसाठी तळाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 09:40 IST

खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठविले होते...

पुणे : जून महिना संपण्यास काही दिवस बाकी राहिले असतानाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पामध्ये म्हणजे चारही धरणामध्ये केवळ ३.५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला दररोज ०.०५ टीएमसी म्हणजे १४७० एमएलडी पाणी लागले. याप्रमाणे दर महिन्याला १.५० टीएमसी पाण्याचा वापर शहरासाठी होतो. महिना अखेरीस संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांची पालखी पुणे जिल्ह्यातून जाणार असल्याचे त्यासाठी अर्धा टीएमसी पाणी कॅनॉलमधून सोडावे लागते. त्यामुळे पालखी सोहळा पुण्यातून मार्गस्थ झाल्यानंतर पाणी कपातीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठविले होते. पुण्याकडे व धरण क्षेत्रात अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही, चारीही धरणात मिळून केवळ ३.५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. जून महिना संपत आला तरीही पुणे शहरासह खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाला सुरुवात झालेली नाही. दैनंदिन पाणी पुरवठ्यात महापालिका कपात न करता गळतीचे प्रमाण कमी करून पाणी बचत करण्यावर प्रशासनाने भर दिला. यासाठी पर्वती जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, लष्कर जलकेंद्रात गळती थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, शहरात होणाऱ्या असमान पाणी पुरवठ्यामुळे अनेक भागात कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे.

तसेच महिना अखेरीस संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांची पालखी पुणे जिल्ह्यातून जाणार असल्याचे त्यासाठी अर्धा टीएमसी पाणी कॅनॉलमधून सोडावे लागते. धरणातील पाणी कमी झाल्याने पाणी पुरवठ्याच्या नियोजनासंदर्भात महापालिका आयुक्तांसोबत पालखी सोहळा पुण्यात येण्यापूर्वी चर्चा केली जाईल. पालखी पुण्यातून बाहेर गेल्यानंतर पाणी कपातीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.

पाऊस पडला नाही तर पाणी कपात टळणार

जून महिना संपत आला तरीही पुणे शहरासह खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे धरणात पाणीसाठा जमा झालेला नाही. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्यानंतर पालिकेला पाणी कपात करावी लागणार नाही.

टॅग्स :Waterपाणीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022