शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

गणेश विसर्जनासाठी तलाव तयार करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:13 AM

मंचर : गणेशोत्सवामध्ये निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था करणे आणि गणपती विसर्जनासाठी फिरते हौद, कृत्रिम तलाव तयार करणे ही ग्रामपंचायतींची ...

मंचर : गणेशोत्सवामध्ये निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था करणे आणि गणपती विसर्जनासाठी फिरते हौद, कृत्रिम तलाव तयार करणे ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. ग्रामपंचायतींनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जबाबदारी पार पाडल्यास नदी, ओढे, नाल्यांचे जलप्रदूषण रोखले जाईल. अशी भूमिका तारुण्यवेध संघटनेने मांडली आहे.

पर्यावरणपूर्वक उत्सव साजरे करण्यासंबंधी राज्य सरकारने १० वर्षांपूर्वी म्हणजेच ३ मे २०११ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश दिले, पण अद्यापही त्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे तारुण्यवेध संघटनेचे संघटक विशाल विमल, अध्यक्ष विकास पोखरकर, उपाध्यक्ष राहुल पोखरकर, रविराज थोरात यांनी पिंपळगाव ग्रामपंचायतीला या आदेशाचे स्मरणपत्र दिले आहे.

याबाबत विशाल विमल यांनी सांगितले की, विशेषत: घोडनदीत अनेक गावांचे सांडपाणी आणि कारखान्यामधील दूषित पाणी सोडल्याने नदी प्रदूषित झाली आहे. त्यामुळे नदीत मूर्ती विसर्जित करून आणखी प्रदूषण करणे योग्य नाही. मूर्तीमध्ये पारा, शिसे आणि रासायनिक घटकाचे रंग असतात, त्याने अधिक पाणी प्रदूषित होते. काही गावांतील नागरिक नदीचे पाणी पितात. त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे, तसेच या क्षारयुक्त पाण्यामुळे शेतजमिनीवर त्याचा परिणाम होऊन शेतीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे नागरिकांनी हौदात गणपती विसर्जन करावे आणि नदीत निर्माल्य टाकू नये. त्यासाठी ग्रामपंचायतने व्यवस्था निर्माण करावी आणि सरकारच्या आदेशाचे पालन करावे. ग्रामपंचायतने गणपती विसर्जनासाठी फिरत्या हौदांची व्यवस्था करावी. तसेच, ठिकठिकाणी हौद उभारावेत. हौदात विसर्जित झालेल्या मूर्ती आणि निर्माल्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी, असे या आदेशात म्हटले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला पाणी लागले की, त्या दगडासारख्या घट्ट होतात. त्याच्यापासून अधिक प्रदूषण होते. त्यामुळे शाडू अथवा मातीपासून बनविण्यात आलेल्या नैसर्गिक रंगाच्या मूर्तींच्या वापरास ग्रामपंचायतने प्रोत्साहन द्यावे. ग्रामपंचायतने ओला व सुका कचरा आणि निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था उभी करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.