शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

उजनीला प्रदूषणाचा विळखा पाण्याचा रंग  हिरवा, परिसरात दुर्गंधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 20:55 IST

उजनी धरणातील पाण्याच्या प्रदूषणाचे शुक्लकाष्ट संपता संपत नसून, त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने धरण पूर्ण भरले आहे.

योगेश कणसेपुणे : उजनी धरणातील पाण्याच्या प्रदूषणाचे शुक्लकाष्ट संपता संपत नसून, त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने धरण पूर्ण भरले आहे. मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा रंग प्रदूषणामुळे हिरवा झाला आहे. या पाण्याला दुर्गंधी येत असून त्याचा त्रास जलाशयाच्या किनारी राहणाºयांना गावांना सहन करावा लागत आहे.धरणाच्या जलाशयातील संपूर्ण पाण्यावर हिरव्यागार रंगाचे जणू आच्छादनच झाले आहे. या परिणाम  जलाशयात चालणाºया मासेमारीवर झाला आहे. पाण्यात अंग भिजल्यानंतर अंगाला खाज सुटत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे असून सध्या मासळी बाजारभाव तेजीत असताना जाळ्यात मासेही कमी सापडत असल्याने मच्छीमारही हवालदिल झाले आहेत.उजनी जलाशयावर हक्काचा पाहुणचार झोडण्यासाठी दर वर्षी न चुकता येणारे रोहित, चित्रबलाक या वर्षी आॅक्टोबर महिना संपून नोव्हेंबर उजाडला, तरी अद्यापही उजनीकडे फिरकले नाहीत. उजनी जलाशयातील वाढत्या प्रदूषणाने परदेशी स्थलांतरित पक्षी कायमची पाठ फिरवण्याचा धोका जलाशायाच्या प्रदूषणामुळे निर्माण झाला आहे.      उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांतील उजनी धरणामुळे विस्थापित झालेल्या अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांचे जलोद्भव असून दूषित झालेल्या पाण्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उजनी जलाशयातील पाण्याचा वापर हा मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी होतो. वारंवार असे दूषित पाणी पिकांना दिल्याने शेतमालासह शेतजमिनीच्या पोतावर त्याचा दूरगामी परिणाम होत आहे. दूषित पाण्यामुळे शेतजमिनी क्षारपड होऊ लागल्या आहेत. ४० वर्षांपूर्वी  उजनी धरणात पाणी अडविण्यास सुरुवात झाल्यावर काही वर्षे जलाशयालगत राहणारे लोक व मच्छीमार पिण्यासाठी वापरत असत. मात्र, आता उजनी जलाशयाचे पाणी प्रदूषणाने हातात घेण्याच्याही लायकीचे राहिले नसल्याचे अनुमान जलतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.        गतवर्षी दुष्काळात उजनी धरणाच्या इतिहासात प्रथमच पाणीपातळी एकदमच खालावली. ११० टीएमसी इतकी क्षमता असलेल्या धरणात केवळ उणे ३९ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला होता. या पावसाळ्यात उजनी धरण शंभर टक्के भरले. आजही पाण्याचा साठा शंभर टक्के आहे. पंचाहत्तर टक्के पाणी उजनीत नव्याने आले; शिवाय ५० टीएमसीहून अधिक पाणी अतिरिक्त झाल्याने वाहून गेले, तरीही उजनीतील  पाणी आज हिरवा तवंग पसरून कमालीचे प्रदूषित झाले आहे.       या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील भीमा नदीच्या खोºयात मोठे औद्योगिकीकरण झाले. अनेक मोठ्या शहरांच्या सांडपाण्याचे विसर्जन या पाणलोट क्षेत्रातील नद्यांत होत आहे. या मैलामिश्रित सांडपाण्याबरोबरच औद्योगिक कंपन्यांचीही टाकाऊ रसायने पर्यायाने उजनीच्या पाण्यात मिसळत आहेत. या प्रदूषणाने उजनी धरणाच्या पाण्यात आढळणाºया जैवसाखळीतील महत्त्वाच्या अनेक पाणवनस्पती नामशेष झाल्या आहेत. याचा मोठा फटका पाण्यातील जलचरांना बसला असून गोड्या पाण्यात पूर्वी आढळणाºया माशांच्या जाती नामशेष झाल्या आहेत. आज अपवादाने एखादादुसरा माशाची जात आढळून येते. त्याचे सापडण्याचे प्रमाणही अत्यंत कमी असून, घाण पाण्यात जो सर्वाधिक ‘तिलापी’ मासा ज्याचे प्रचलित नाव चिलापी आहे, तो उजनीत मोठ्या प्रमाणात आहे. एकूणच उजनी धरणाच्या पाण्यातील वाढत्या घातक प्रदूषणाने उजनीतील जैववैविध्यावर दूरगामी परिणाम झाला आहे. यामुळे अनेक जाती-प्रजातींचे पक्षी उजनी धरणाच्या जलाशयाकडे पाठ फिरवू लागले आहेत.

टॅग्स :Ujine Damउजनी धरणpollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषण