शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

आळंदीच्या इंद्रायणी नदीचे प्रदूषण ११ नाल्यांमुळे, पाच दिवस नदी फेसाळलेलीच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 12:35 PM

महापालिका म्हणते, हे तर आमचे सांडपाणी नाही!...

पिंपरी :इंद्रायणी नदीत उगम ते संगमापर्यंत मोठ्या प्रमाणावर मैला सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे. अकरा नाले थेट नदीत सोडले आहेत. आता पाच दिवस नदी फेसाळूनही आळंदी नगरपालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी यांना कोठून दूषित पाणी मिसळते, हे सापडलेले नाही. त्यामुळे नदीसुधार योजनेच्या गप्पा फार्सच ठरत आहेत.

पुणे जिल्ह्याला धरण आणि नद्यांचे मोठे वैभव आहे. मात्र, नद्यांच्या आरोग्याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत वारंवार पर्यावरणवादी संस्थांनी आवाज उठवूनही त्यांचा आवाज लालफितीच्या कारभारातील प्रशासनापर्यंत पोहोचत नाही.

बुधवारपासून नदी फेसाळलेली

इंद्रायणी नदी आळंदीतील केटीवेअरपासून गावापर्यंत फेसाळलेली आहे. याबाबत नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, पीएमआरडीए आणि नगरपालिकेकडे तक्रार करूनही त्याबाबत दखल घेतली नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ते नाले थेटपणे नदीत!

पर्यावरणवादी संस्थांनी केलेल्या पाहणीनुसार, इंद्रायणी नदीचे प्रदूषण लोणावळ्यापासून सुरू होते. त्याचबरोबर तळेगाव दाभाडे, इंदोरी, देहूगाव या भागातील पाणी प्रक्रिया न करताच नदीत सोडले जात असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे. महापालिका क्षेत्रात एसटीपी प्लांट केले असले, तरी तळवडे, चिखलीतील दोन नाल्यांमधील पाणी थेट नदीत जात आहे. नदीच्या अलीकडे महापालिका आणि पलीकडच्या भागामध्ये चाकण एमआयडीसी, निघोजे, चिंबळी, मोई व आळंदी या गावांचा समावेश आहे. या भागात खासगी कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. नागरीकरणही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यांचे पाणी नदीत सोडले जात आहे. चिंबळी, मोई आणि निघोजेमधील अकरा नाले थेट नदीत सोडले आहेत. त्यामुळे प्रदूषणात भर पडली आहे.

महापालिका म्हणते, हे तर आमचे सांडपाणी नाही!

पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, इंद्रायणी नदीच्या अलीकडच्या भागांमध्ये महापालिका क्षेत्र आहे. नागरिकांची तक्रार झाल्यानंतर संबंधित भागांमध्ये जाऊन पथकाने पाहणी केली. महापालिकेच्या भागातून रसायनमिश्रित पाणी जात नसल्याचे दिसून आले. पलीकडचा भाग पीएमआरडीए, नगरपालिका आणि एमआयडीसीचा आहे. संबंधित प्रशासनाने याबाबत दखल घेणे गरजेचे आहे. प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :indrayaniइंद्रायणीAlandiआळंदी