शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

भाजपकडून दहशतीचे, आमिषाचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 23:42 IST

पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप : आश्वासनांचा हिशेब जनता विचारेल

पुणे : भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत दहशतीचे आणि आमिषाचे राजकारण केले जात आहे. साम, दाम, दंड, भेद यावर भाजपचे सुरू असलेले राजकारण दुर्दैवी आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच ज्यांनी प्रसंगी तुरूंगवास सोसून भाजप पक्षाला सत्ता मिळवून दिली, त्यापैकी भाजपचा एकाही कार्यकर्ता किंवा संघाची विचारधारा असणाऱ्या व्यक्तीला भाजपने निवडणुकीसाठी उमेदवारी दिली नाही. अनेक उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांतून आयात केले आहेत. भाजपला याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहत आहेत, असेही चव्हाण यांनी नमूद केले.

कॉँग्रेस पक्षाचे पुण्याचे लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण, आमदार विश्वजित कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रवीण गायकवाड, संगीता तिवारी आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, भाजपकडून व्यक्तिकेंद्रीत राजकारण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्याच प्रचारसभेत मिळालेला प्रतिसाद पाहता मोदी लाट पूर्णपणे ओसरली आहे. मागील निवडणुकीत मोदींनी दिलेली आश्वासने किती पूर्ण झाली, त्याचे आकलन लोकांनी केलेले आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, असे लोक भाजपला विचारत आहेत.काँग्रेसने प्रकाशित केलेला जाहीरनामा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे. या जाहीरनाम्यातील मुद्यांसह शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच राफेलमधील घोटाळा या मुद्द्यांवर काँग्रेसतर्फे प्रचार केलाजाणार आहे.गोळीबाराचा मुद्दा केवळ आरोपापुरताचच्मावळ येथील शेतकरी गोळीबाराषियी ते म्हणाले, या प्रकारच्या घटनांबाबतचे आदेश कधीही राजकीय स्तरावर दिले जात नाहीत. स्थानिक परिस्थिती पाहून तेथील प्रमुख पोलीस अधिकारी यावर निर्णय घेत असतात. परंतु, या घटनेची सर्व चौकशी व इतर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.त्यामुळे हा मुद्दा राजकीय आरोप करण्यापुरता उरला आहे.

 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपा