शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

 कोरेगाव भीमा मुद्यावरून पुण्यात राजकारण पेटले :काँग्रेसची भाजपवर विखारी टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:10 IST

कोरेगाव भीमा मुद्दावरून पुण्यात चांगलेच राजकारण पेटले असून बुधवारी भाजपचे खासदार माजी प्रदीप रावत यांनी सत्यशोधन समितीच्या अहवालावर शहर काँग्रेसतर्फे पत्रक काढून टीका करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे कोरेगाव भीमा मुद्द्यावरून पुण्यात राजकीय युद्धाला सुरुवात सरकारचे अपयश झाकण्यासाठी पोलिसांवर आरोप, काँग्रेसची भाजपवर टीका 

 

पुणे :  कोरेगाव भीमा मुद्दावरून पुण्यात चांगलेच राजकारण पेटले असून बुधवारी भाजपचे खासदार माजी प्रदीप रावत यांनी सत्यशोधन समितीच्या अहवालावर शहर काँग्रेसतर्फे पत्रक काढून टीका करण्यात आली आहे. भाजप सरकारने स्वतःचे अपयश झाकण्यासाठी पोलिसांवर खापर फोडले असल्याची टीका शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे. 

    भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी सत्यशोधन समितीने कोरेगाव भीमा येथे  १ जानेवारी २०१८रोजी झालेल्या तयार केलेला अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात  हा माओवादी विचारांच्या संघटना,खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी गट याचा पूर्वनियोजित कट होता,यात आंबेडकरी व हिंदुत्ववादी गटाचा  यामध्ये काहीही संबंध नाही असा निष्कर्ष मांडण्यात आला. त्यावेळी रावत यांनी बोलताना पोलिसच या हिंसाचाराला जबाबदार असून वढू येथून तीन किलोमीटर भगवे झेंडे घेऊन कोरेगांव भीमाकडे जाणार्‍या जमावाला पोलिसांनी वेळीच रोखून जमावातील लोकांना इतर ठिकाणी हालविले असते तर कोरेगांव भीमा येथील हिंसाचार टळला असता असे सांगितले. परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पुणे ग्रामीण पोलिस आधिक्षक आणि शहर पोलिस आयुक्तांनी याप्रकरणामध्ये राज्य शासनाची दिशाभूल केली आहे, असा आरोप ही त्यांनी केला होता.

      या आरोपाला पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने उत्तर देण्यात  असून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक हे अल्पसंख्यांक समाजचे असल्यामुळे त्यांच्यावर जाणूनबुजून खापर फोडले जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. आपल्या पक्षाच्या सरकारचे अपयश झाकण्यासाठी  जजाणून बुजून भाजपचे खासदार त्यांना बदनाम करत आहेत व जनतेची दिशाभूल करण्यासाठी नक्षलवाद्यांनी ही दंगल घडवून आणली असा आरोप करत आहेत  असेही काँग्रेसच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या हिंसाचारात मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री भेटले नसून पालकमंत्रीही गिरीश बापटही ही परिस्थिती हाताळण्यास अयशस्वी ठरल्याचेही यात म्हटले आहे. थेट सत्ताधारी भाजपवर काँग्रेसने केलेल्या आरोपामुळे आता हा विषय अधिक संवेदनशील बनत चालला असून शुक्रवारपर्यंत इतर राजकीय पक्षही त्यात उडी मारण्याची शक्यता आहे. 

 

 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणBhima-koregaonभीमा-कोरेगाव