शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

राजकारणात दांभिकता ठासून भरलेली: विनय सहस्त्रबुध्दे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 19:13 IST

सामाजिक संस्था, संघटनांसह राजकारणातही सध्या नेतृत्वाची पोकळी...

ठळक मुद्देअशोक कुकडे यांना राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार प्रदान

पुणे : सामाजिक कामातील लोकांनीही आखीव-रेखीव असले पाहिजे. केवळ चांगले असून चालत नाही तर चांगले दिसावेही लागते. ‘चारित्र्य’ ही व्यापक संकल्पना आता ‘आऊट ऑफ फॅशन’ झाली असून त्याच्याकडे कालविसंगत संकल्पना असे बघितले जाते. समाजात दांभिकता दिसते. राजकारणात तर ती ठासून भरली आहे. बोलायचे एक आणि करायचे एक, हे लोकांमध्ये रूढ होतेय. हे चित्र बदलायला हवे, अशी अपेक्षा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केली. चारित्र्य प्रतिष्ठानतर्फे लातूर येथील विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक अशोक कुकडे यांना सहस्त्रबुध्दे यांच्या हस्ते रविवारी राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संचेती रुग्णालयाचे संस्थापक डॉ. के. एच. संचेती, पुणे पिपल्स को- ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष जनार्दन रणदिवे, अ‍ॅड. मंगेश गांधी, श्रीधर गायकवाड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश मेहता आदी उपस्थित होते. याप्रसंगी विविध शाळांमधील आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना चारित्र्य उपासक छात्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.नागरिकता सुधारणा कायद्याचा संदर्भ देत सहस्त्रबुध्दे म्हणाले, ‘कागज नही दिखायेंगे’ असे काही क्रांतीकारी म्हणत आहेत. पण समाजात अनुशासनाला महत्व असते. प्रत्येक ठिकाणी कागदपत्रांची गरज भासत असते. देशभक्ती हा रोजच्या जगण्याचा विषय असतो. संस्थाबांधणी म्हणजे केवळ इमारती उभी करणे नव्हे. तर संस्थेचे समाजाशी असलेले परस्परसंबंध, दीर्घपल्याचा विचार, मिशन अशा विविध मुल्यांचा संस्थाबांधणी म्हणून विचार करायला हवा. यापुढे २०० वर्षांनी सांगण्यासारख्या संस्था आज उभ्या राहत आहेत का, हेही विचारात घ्यायला हवे. नेतृत्त्वशास्त्र हा विषय दुर्देवाने केवळ कॉर्पोरेट क्षेत्रात अधिक बोलला जातो. पण आपल्या घरामध्ये नेतृत्व असते. संस्था, संघटनांसह राजकारणातही सध्या नेतृत्वाची पोकळी दिसून येते. त्यामुळे नेतृत्वशास्त्राची सर्वंकष मांडणी हवी. ‘नावापुढे देभ असे लिहून देशभक्त होत नाही. ते वागणे, बोलणे, मानसिकतेतून दिसायला हवे,असे हेडगेवार म्हणत. समाज स्वस्थ कसा होईल, हा प्रश्न आहे. आज अनेक विकृती आहेत. सामाजिक प्रदुषण दुर करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. परस्पर विचारांमध्ये तफावत असली तरी मैत्री असायला हवी. स्वस्थ समाजाची निर्मिती यातूनच होईल’, असा आशावाद कुकडे यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना सन्मानातून प्रोत्साहन मिळत असल्याने असे कार्यक्रम सातत्याने व्हायला हवेत, असे डॉ. संचेती यांनी नमुद केले.

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणSocialसामाजिक