शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

राजकारण्यांना खुर्चीची काळजी : दत्तात्रय शेकटकर : ‘जय जवान, जय किसान’ पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:27 PM

देशभक्तीला राष्ट्रशक्तीचे कवच असावे लागते आणि राष्ट्रशक्तीला देशभक्तीचे अंत:करण असावे लागते, असे मत निवृत्त मेजर जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘संवाद कलाकारांचा, संवेदना शेतकऱ्यांची’ या संमेलनाच्या समारोपदेशाला जवान आणि शेतकरी तारून नेऊ शकतात : पी. डी. पाटील

पुणे : राजकारण्यांना देशाची नव्हे, तर खुर्चीची काळजी असते. त्यामुळे देशावर येणाऱ्या संकटांपेक्षा, शत्रूच्या हल्ल्यापेक्षा उद्या आपली खुर्ची वाचणार का, हा प्रश्न त्यांना भेडसावत असतो. देशभक्तीला राष्ट्रशक्तीचे कवच असावे लागते आणि राष्ट्रशक्तीला देशभक्तीचे अंत:करण असावे लागते, असे मत निवृत्त मेजर जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी व्यक्त केले.संवाद, पुणे आणि डॉ. डी. वाय. पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संवाद कलाकारांचा, संवेदना शेतकऱ्यांची’ या संमेलनाच्या समारोपप्रसंगी निवृत्त मेजर जनरल दत्तात्रय शेकटकर यांना ‘जय जवान, जय किसान’ पुरस्कार, तर बारामती येथील स्वाती शिंगाडे यांना कृषिकन्या पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिग्दर्शक भाऊराव खराडे यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आणि श्यामची आई फाउंडशेनचे अध्यक्ष भारत देसडला यांच्या हस्ते गौैरवण्यात आले. या वेळी सचिन इटकर, सुनील महाजन, निकिता मोघे आदी उपस्थित होते.शेकटकर म्हणाले, ‘एकोणिसावे शतक सत्तेचे तर विसावे शतक पैैशांचे होते. एकविसावे शतक बुद्धिमत्तेचे आहे. ज्याच्याकडे बुद्धिमत्ता असेल, तो देशावर राज्य करेल. जग भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. त्यामुळे ‘जय जवान, जय किसान’प्रमाणेच आता ‘जय ज्ञान, जय विज्ञान’चा नारा द्यावा लागेल. ‘बळी तो कान पिळी’ या न्यायाप्रमाणे क्षमता वाढली की योग्यता वाढते. क्षमता आणि योग्यता वाढली की इरादे बुलंद होतात. भविष्यात पाकिस्तानला अमेरिकेचा त्रास भोगावा लागणार आहे. दहशतवादी जन्माला येत नाहीत, ते तयार केले जातात. भविष्यात मुलांवर योग्य संस्कार झाल्यासच या पिढीला चांगले वळण लागेल. घरातील स्त्री सुरक्षित असेल तर राष्ट्रही सुरक्षित राहील.’संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले.

पी. डी. पाटील म्हणाले, ‘देशाला जवान आणि शेतकरी तारून नेऊ शकतात. त्यांच्या अफाट कार्याची दखल आपण घ्यायला हवी. त्यांचे आयुष्य खूप खडतर असते. बरेचदा सैैन्याला जनतेच्या विरोधात उभे राहावे लागते. अशा वेळी, त्यांना होणारा त्रास शब्दांत सांगणे अशक्य आहे. समाजाने त्यांचा आदर केला पाहिजे.’भारत कृषिप्रधान देश असून येथे शेतीला दुय्यम स्थान दिले जाते. शेतकरी आत्महत्या करत राहिला तर कृषीच्या पदव्यांचा काय उपयोग? तळागाळातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान अवगत नसते. त्यामुळे सुशिक्षित पिढी शेतीकडे वळली पाहिजे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास आत्महत्या कमी होतील. शेतकरी जगला तर जग जगेल.

टॅग्स :d y patil universityडी. वाय. पाटील विद्यापीठPuneपुणे