शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

सोशल मीडियावरून पसरली जातेय राजकीय व्यंगांची हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 14:50 IST

चांद्रयान २ सारखी महाशिवआघाडीची अवस्था, शेवटच्या क्षणी इटलीच्या लँडरशी संपर्क तुटला’

ठळक मुद्देगमतीशीर म्हणींची चर्चा जनतेकडून राजकीय पक्ष आणि नेत्यांवर तोंडसुख..

तेजस टवलारकर पुणे : ‘आम्ही कसेबसे पंक्तीत घुसलो आणि बुंदी संपली, मी काय म्हणतोय, मुख्यमंत्र्यांची खुर्ची काढून सतरंजी टाका आणि सगळे बसा, मंदिरात गेलो आणि भंडाराच संपला, बाहेर आलो तर चप्पल चोरीला गेली, चांद्रयान २ सारखी महाशिवआघाडीची अवस्था, शेवटच्या क्षणी इटलीच्या लँडरशी संपर्क तुटला’ सध्या सुरू असलेल्या राज्याचा राजकारणावरून या प्रकारच्या गमतीशीर म्हणींची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.सध्या राज्याच्या राजकारणात रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. रोज नवनवीन चर्चा आणि बातम्या समोर येत आहेत. सर्वत्र राजकारणावरच चर्चा रंगत असल्याचे दिसून येते. याच राजकीय स्थितीवरून सोशल मीडियावर चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. त्यातून रोजच  नवनवीन म्हणींचा उदय होत असून जनतेकडून राजकीय पक्ष आणि नेत्यांवर तोंडसुख घेतले जात आहे.   राज्याच्या सत्तास्थापनेवरून सर्वच पक्षांत खलबते सुरू आहेत. फेसबुक, व्हॉट्स्अ‍ॅप गु्रपवर राजकीय नेत्यांची खिल्ली उडवली जात आहे. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आपल्या सोयीचे व्हिडीओ, फोटो, म्हणी, व्यंगचित्रे, मेसेज मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत. यातून आपला पक्ष इतर पक्षांपेक्षा कसा वेगळा आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न  कार्यकर्ते करीत आहेत. अनेक विनोदी मेसेज फिरत असले तरी त्यातून राजकारणाची प्रतिमा किती खालावलेली आहे, हे या मेसेजवरून दिसून येते. याचबरोबर व्यंगचित्रकारांच्या माध्यमातून सध्याची राजकीय स्थिती दाखवली जात आहे..............ाुने व्हिडिओ शेअर करण्यावर भर राज्याच्या राजकारणाची समीकरणे पूर्णपणे बदललेली आहेत. अनेक वर्षे एकामेकांच्या विरोधात बोलणारे एकत्र येण्याच्या मार्गवर आहेत. यावरूनच  पूर्वी ऐकामेकांवर केलेले आरोप प्रत्यारोपांचे व्हिडीओ दाखवून आता कशी भूमिका बदलली, हे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. प्रसिद्धीच्या झोतात आणले तोच सोशल मीडिया आता डोकेदुखी ठरत आहे. ..............राष्ट्रपती राजवटीवर विनोदी मेसेज व्हायरलकोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेली सदस्यसंख्या जुळवता आली नाही; त्यामुळे  राज्यात राष्ट्रपती राजवट लागली आहे. त्यावरूनसुद्धा विनोदी मेसेज व्हायरल होत आहेत.  ‘राष्ट्रपती राजवटीत लग्न करायला चालते का? राष्ट्रपती राजवटीतही सूर्य पूर्वेकडूनच उगवला.’ या प्रकारचे विनोदी मेसेज व्हायरल होत आहेत......व्यंगचित्रांनी घातली भर सोशल मीडियावर व्यंगचित्रांच्या माध्यमातून सद्य:स्थिती दाखवली जात आहे. रोज नवनवीन व्यंगचित्र्े प्रसिद्ध केली जात आहेत. यातून मनोरंजनाबरोबरच हास्यसुद्धा निर्माण होत आहे. सर्वच माध्यमांवर व्यंगचित्रे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSocial Mediaसोशल मीडिया