शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

विनयभंगाची घटना घडल्यास तातडीने द्या तक्रार ; क्षणार्धात पाेहचतील पाेलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 14:33 IST

विनयभंगाची तक्रार देण्यास गेलेल्या तरुणीच्या तक्रारीकडे पाेलीस कशापद्धतीने हाताळतात याचे लाेकमतने केलेले स्टिंग ऑपरेशन

सुषमा नेहरकर-शिंदे / प्रज्ञा केळकर सिंग

पुणे : विनयभंग ओळखीच्यांकडून झाला, तरच त्याची तक्रार घ्यायची. अनोळखी व्यक्तीकडून विनयभंग होत असल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेची तक्रार घेण्यास पोलीस अनुत्सुक असल्याचा अनुभव ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आला आहे. हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशातील महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात शिक्षण, नोकरी व कामासाठी घराबाहेर पडलेल्या  मुली, महिलांना अनेक लहानमोठ्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी स्टिंग ऑपरेशन केले. बसस्टॉपवर मुली, महिला यांना अनोळखी पुरुषांकाडून होणारा त्रास व त्यानंतर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर येणारा अनुभव काय असतो, याचा शोध घेण्यात आला.  

मध्यवस्तीतील एका पोलीस चौकीत गेल्यानंतर तेथे उपस्थित महिला पोलिसाने ‘काय काम आहे?’ विचारले. त्यांना काय  प्रसंग घडला ते  सविस्तर सांगितले. या महिला पोलिसानेदेखील नाव, गाव, पत्ता माहीत नसलेल्या व्यक्तींच्या विरोधात तक्रार करून काहीच उपयोग नाही. तक्रार दिली तर त्याचा शोध लागेपर्यंत तुलाच सारखं पोलीस चौकीत यावं लागेल, असे सांगितले. त्यापेक्षा पुढच्या वेळी तो माणूस दिसला, की त्वरित १०० नंबरवर फोन करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर चौकातील उपस्थित वरिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांनीदेखील निनावी व्यक्तींच्या विरोधामध्ये तक्रार देऊन उपयोग नाही, असे सांगत त्याला खरेच अद्दल घडविण्यासाठी पुन्हा दिसल्यावर थेट १०० नंबर आणि १०९३ नंबरच फोन करण्याचा सल्ला दिला.  पोलीस मदतीसाठी तयार असतात. परंतु, विनयभंगाची तक्रार दाखल करून घेऊन तपासाचे घोंगडे मागे लावून घेण्याची मानसिकता नसल्याचेच दिसून आले आहे. मात्र, एखाद्या अनोळखीकडून भविष्यात काही विपरित प्रसंग घडण्याची वाट पाहायची का? हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित  झाला आहे. पहिला प्रसंगतरुणी  :  नमस्कर मॅडम, मी सिंहगड रोडला राहते. मी एका प्रोजेक्टच्या कामासाठी आठवड्यातून तीन-चार वेळा शनिवार पेठेत येते. पण गेल्या काही महिन्यांपासून बसस्टॉपवर एक माणूस सतत विचित्र नजरेने पाहत असतो. आजही असाच पाहत असताना मी त्याला हटकले. तर मलाच म्हणाला, ‘तुला पाहून घेईन.’ मी थोडी घाबरलेच आणि ‘पोलिसांकडे तक्रार करेन’ म्हटले तर ‘तुला काय करायच ते कर. तुला पाहून घेतो,’ असे म्हणून निघून गेला. म्हणून मी तक्रार करायला आले आहे. माझ्याकडेच नाही तर बस्टस्टॉपवरील इतर मुली व महिलांनादेखील त्या माणसाचा त्रास होतो.

पोलीस कर्मचारी : तक्रार  कुणाविषयी घेणार त्याचे नाव माहिती आहे का? पत्ता? काहीच माहीत नाही; मग तक्रार देऊन काय उपयोग? त्यापेक्षा पुढच्या वेळी तो दिसला, की त्याला कळणार नाही, असे पाहून १०० नंबर अथवा १०९३वर फोन कर. मार्शलचे पोलिस त्वरित येऊन त्याला पकडतील. रस्त्यावरच पोलिसांनी पकडल्यावर व मार खात पोलीस चौकीत आणल्यावर त्याला चांगली अद्दल घडेल.....

तरुणी : सर मी कालपरवा पेपरमध्ये वाचले होते, की अशा लोकांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार देता येते. 

पोलीस कर्मचारी : तू काय शिकते?

तरुणी : सर मी एमए करते.

पोलीस कर्मचारी :  एवढे चांगल शिक्षण घेते. एमपीएसचीचापण अभ्यास करत असशील, तर कायदेदेखील माहित असतील थोडे. विनयभंगाची तक्रार देण्यासाठी त्या माणसाचे नाव माहिती नाही, किमान पत्ता माहीत असता तर थेट उचलून आणले असते.

तरुणी : पण सर मला कसे माहित असेल त्याचा नाव-पत्ता.... आमची ओळख नाही... आणि मलाच नाही तर बसस्टॉपवरील इतर मुली आणि महिलांनादेखील तो असाच त्रास देतो.

पोलीस कर्मचारी :  हो म्हणूनच सांगतो, की तू पुढच्या वेळी १०० नंबरवर फोन कर आणि आपण त्याला जागेवरच पकडून चांगला चोप देऊ.

दुसरा प्रसंग महिला : साहेब तक्रार नोंदवायची होती. मी दररोज सकाळी बसने ऑफिसला येते. ऑफिस-जवळच्या बसस्टॉपवर उतरले, की एक माणूस बसस्टॉपवर बसलेला असतो. वाईट नजरेने पाहतो आणि इशारेही करतो. मी काही दिवस दुर्लक्ष केलं; पण सतत १०-१२ दिवस असं घडतंय.

पोलीस अधिकारी : त्या माणसाला तुम्ही ओळखता का? बसस्टॉपजवळ त्याचं दुकान वगैरे आहे का? वय किती असेल साधारण?

महिला : नाही सर, मी ओळखत नाही त्याला. दुकान वगैरे असेल आजूबाजूला असंही वाटत नाही. कारण, तो बसस्टॉपवरच निवांत बसलेला असतो. साधारण ४८-५० वर्षे वय असेल.

पोलीस : संध्याकाळी असतो का तो तिथं? कधी पाहिलंय का? 

महिला : संध्याकाळी माझा घरी जाण्याचा मार्ग वेगळा आहे. (कामाचे ठिकाण, बसमधून उतरण्याची वेळ वगैरे माहिती घेऊन झाल्यावर)

अधिकारी : तुम्ही माझा नंबर लिहून घ्या. तुमचाही नंबर द्या. उद्याच आमच्या मार्शलला तिथे पाठवतो. दोन फटके मारले, की सरळ होईल. गरज वाटलीच तर तक्रारही दाखल करून टाकू. काळजी करू नका. आपण त्याचा बंदोबस्त करू.

विनयभंगाच्या अज्ञाताविरोधात तक्रारी घ्यायला हव्यात अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी अज्ञात असतात, पोलिसांनी त्यासंबंधित सर्व माहिती गोळा करून तो गुन्हा उघड करायचा असतो़ विनयभंगाच्या प्रकरणात यापूर्वीही अज्ञाताविरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत़ संबंधित संशयिताचे रेखाचित्र तयार करून ज्या ठिकाणी गुन्हा घडला़, त्या ठिकाणी असलेले प्रत्यक्षदर्शी अथवा अन्य साधनांचा वापर करून पोलिसांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत़ पोलिसांकडे आलेल्या तक्रारींचा तपास करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा प्रयत्न असतो़ काही जण जर तक्रार दाखल करून घेत नसतील तर अशा वेळी त्या-त्या ठिकाणच्या वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधावा़ महिलांच्या प्रत्येक तक्रारीची पोलीस गंभीरपणे दखल घेतात़  - अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे

पोलिसांनी दुर्लक्षपणा कमी करण्याची गरजसमाजामध्ये आजही पोलिसांचा धाक आहे. पोलीस म्हटले, की नागरिक घाबरतात. यामुळे नागरिक, महिला अनेक लहानमोठ्या गोष्टींच्या तक्रारी घेऊन पोलिसांकडे जातात; परंतु बहुतेक वेळा पोलीस अशा तक्रारीकडे दुर्लक्ष करतात. यामध्येदेखील एखादी महिला, मुलगी खालच्या वर्गातील असेल तर तिलाच चार शब्द ऐकवून पाठवून देता. परंतु, पोलिसांनी हा आपला दुर्लक्ष करण्याचा संभाव थोडा बाजूला ठेवला, एखादी महिला, मुलगी काय सांगते त्यांच्या मागचा हेतू लक्षात घेऊन कृती केल्यास भविष्यात घडणाºया गंभीर घटनांना आळा बसू शकतो. परंतु तक्रार दाखल करून घेतली, की आपले काम वाढेल यासाठी अनेक वेळा दुर्लक्ष करण्याचे प्रमाण खूप मोठे आहे.- सुप्रिया कोठारी, वकील

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला