शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

सुपा घाटात ट्रकवर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 21:15 IST

चौफुला-मोरगाव रस्त्यावरील सुपा घाट येथे ट्रकला कार आडवी मारुन ट्रकमधील दोघे चालक यांना ट्रकसह पळवून नेत अज्ञात ठिकाणी डांबून ट्रकमधील गव्हाच्या ३१५ गोण्या चोरणा-या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी जेरबंद केले. या टोळीमध्ये ८ दरोडेखोरांचा समावेश असून तिन दिवसांत हा गुन्हा पोलीसांनी उघडकीस आणला आहे. 

केडगाव:  चौफुला-मोरगाव रस्त्यावरील सुपा घाट येथे ट्रकला कार आडवी मारुन ट्रकमधील दोघे चालक यांना ट्रकसह पळवून नेत अज्ञात ठिकाणी डांबून ट्रकमधील गव्हाच्या ३१५ गोण्या चोरणा-या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी जेरबंद केले. या टोळीमध्ये ८ दरोडेखोरांचा समावेश असून तिन दिवसांत हा गुन्हा पोलीसांनी उघडकीस आणला आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.२५)  सकाळी ११ ला  रामप्रसाद राठोड (रा.राजस्थान) हे त्यांच्या ट्रकमधून गव्हाच्या गोण्या गोव्याला  घेवून जात होते. यावेळी केडगाव चौफुला-मोरगाव रस्त्यावर सुपा घाटाच्या पहिल्या वळणावर चोरट्यांनी त्यांच्या ट्रक पुढे मोटार कार आडवी लावली.  आरोपींनी गाडीतून   उतरुन ट्रक चालकास दमदाटी करुन ट्रकमधील दोघांना खाली उतरवत त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला.  तसेच त्यांना कारमध्ये नेत अज्ञात ठिकाणी डांबवून ठेवले.  ट्रक व त्यामधील ३१५ गव्हाची गोणी असा एकूण १६ लाख ९३ हजार रूपयांचा माल चोरुन नेला. ट्रकमधील दोघांना तिस-या दिवशी बारामती येथे निर्जन ठिकाणी सोडून दिले होते. त्याबाबत रामप्रसाद राठोड यांनी गुरूवारी (दि.२८)  यवत पोलीस ठाण्यात  या प्रकरणी तक्रार दिली. या गुन्ह्याचा छडा लावणे हे पोलीसांसमोर एक मोठे आव्हान होते.

पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी हा गुन्हा उघडकीस आणणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करणेबाबत आदेश दिले होते.   गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने यवत पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करण्यात आलेली होती. स्थानिक गुन्हे शाखेकडून वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या पथकाकडून पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यात तपास चालू होता.  खब-यामार्फत चोरटे हे  मांडवे (ता.माळशिरस जि.सोलापूर) येथील सागर अंबादास चव्हाण व त्याच्या साथीदारांनी ट्रक लुटल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी सापळा रचून सागर अंबादास चव्हाण (वय २५, रा.मांडवे ता.माळशिरस जि.सोलापूर), मंगेश उर्फ पप्पू राजेंद्र चव्हाण (वय २६, रा. क-हावाघज ता. बारामती जि.पुण), सुरज लक्ष्मण गाडे (वय २१, रा.सावंतवाडी ता.बारामती जि.पुणे), रेवणनाथ प्रभाकर जाधव (वय २६, रा.विट ता.करमाळा जि.सोलापूर), उमेश मधुकर काळे (वय वय २७,  रा.वाशिम ता.कर्जत जि. अहमदनगर), शेखर सुभाष शिंदे (वय २४, रा.सांगवी ता.बारामती जि.पुणे),  सचिन महादेव गेजगे (वय ३१, रा.मांडवे, ता.माळशिरस जि.सोलापूर), महेश मारुती पेड़कर (वय ३६, रा.फोंडशिरस ता.माळशिरस जि.सोलापूर) या आठ जणांना अकट केली. त्यांची चौकशी केली असता  त्यांनी संगनमताने मिळून ट्रकवर दरोडा टाकून चोरलेल्या गव्हाच्या गोण्या महेश पेड़कर याच्या मध्यस्थीने नातेपुते येथे विकून मोकळा ट्रक हा करमाळा येथे निर्जन ठिकाणी सोडून दिल्याचे सांगितले. आरोपींकडून गन्ह्यात वापरलेली  कार,  जीप तसेच चोरलेला ट्रक व  माल हस्तगत करण्यात आलेला आहे.

 ही कारवाई गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक जीवन माने, सहा.उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, दयानंद लिम्हण, अनिल काळे , रवि कोकरे , महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, प्रविण मोरे, राजू मोमीन, बाळासाहेब खडके यांनी केली.

टॅग्स :RobberyदरोडाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस