शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

महिला सुरक्षिततेबाबत पोलीस सजग

By admin | Updated: May 5, 2017 02:55 IST

आयटी अभियंता रसिला राजू ओपी, अंतरा दास या तरुणींच्या खुनाच्या घटनेनंतर हिंजवडी आयटी परिसरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी

पिंपरी : आयटी अभियंता रसिला राजू ओपी, अंतरा दास या तरुणींच्या खुनाच्या घटनेनंतर हिंजवडी आयटी परिसरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या. संकटात सापडलेल्या मुलींना तत्काळ मदतीसाठी पोलिसांनी बडीकॉप सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर पोलीस खात्याने उपलब्ध करून दिलेली ‘प्रतिसाद अ‍ॅप’ ही सेवाही उपयोगात येऊ लागली आहे. लोकमत प्रतिनिधींनी गुरुवारी दुपारी हिंजवडी आयटी परिसरात ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. त्या वेळी अवघ्या दहा मिनिटांच्या आत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीजवळ लोकमत महिला प्रतिनिधीने दुपारी ३ वा. मोबाईलमधील प्रतिसाद अ‍ॅपचा वापर करून दुचाकीवरून आलेले काही तरुण छेडछाड करत असल्याची तक्रार नोंदवली. तीन वाजता अ‍ॅपवरून तक्रार दाखल होताच, दुसऱ्या मिनिटाला पोलिसांचा प्रतिनिधीच्या मोबाईलवर कॉल आला. ‘‘तुम्ही कोठे आहात हे नेमके ठिकाण सांगा, जवळपासची खूण सांगा, तुम्हाला मदत दिली जाईल,’’असे त्यांनी सांगितले. लोकमत प्रतिनिधीने त्यांना जवळपासची खूण सांगितली. एका बांधकाम प्रकल्पाचे साईट आॅफिस आहे, त्याच्या समोर रस्त्यावर थांबल्याचे सांगितले. ठीक आहे, असे म्हणून पोलिसांनी फोन ठेवला. त्यानंतर आवघ्या आठ मिनिटांत पोलिसांची व्हॅन त्या ठिकाणी हजर झाली. पोलीस ठाण्यातून पुन्हा फोन आला. व्हॅन पोहोचली का ? अशी त्यांनी चौकशी केली. पोलीस कॉन्स्टेबल सुदर्शन बर्डे, गस्तीवरील पोलीस कर्मचारी जब्बार सय्यद, कमांडो विजय भिसे, अनिल पानसकर त्या व्हॅनमधून खाली उतरले. त्यांनी लोकमत महिला प्रतिनिधी आणि अन्य एका तरुणीकडे चौकशी केली. तुम्हाला त्रास देणारे दुचाकीवरील तरुण कोठे गेले? दुचाकीचा क्रमांक तुम्ही सांगू शकता का? कोणत्या दिशेने ते तरुण निघून गेले, अशी विचारणा त्यांनी केली. अडीच किलोमीटर अंतर तरीही पोलीस वेळेवर प्रतिसाद अ‍ॅपवरून तक्रार नोंदविल्यानंतर लोकमतच्या महिला प्रतिनिधी , तसेच एसएनबीपी महाविद्यालयाची विद्यार्थिनी या दोघी इन्फोसिस कंपनीजवळ रस्त्यावर थांबल्या. त्यांनी मोबाईल अ‍ॅपवरून तरुण छेडछाड करीत असल्याची तक्रार नोंदविली. हिंजवडी पोलीस ठाणे ते इन्फोसिस फेज टू हे अंतर दोन ते अडीच किलोमीटरपेक्षा अधिक आहे. पोलीस ठाणे ते हे अंतर कापण्यासाठी पोलिसांना वेळ लागेल. तातडीने पोलीस येऊ शकतील का? अशी शंका त्यांच्या मनात आली असतानाच, काही मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हे आश्चर्यकारक वाटले. रजेवर असूनही कर्तव्य बजावलेस्टिंग आॅपरेशनसाठी गेलेल्या लोकमत महिला प्रतिनिधींना प्रतिसाद अ‍ॅपवरील तक्रारीनंतर पोलिसांचे कॉल आले. तुमच्या मदतीसाठी पोलीस पाठवले आहेत, ते पाहोचले का, अशी आस्थेने विचारणा झाली. पोलीस व्हॅन घटनास्थळी पोहोचली. पोलीस वेळीच दाखल झाले. एवढे झाल्यानंतरही पुढे एक तास वरिष्ठ पोलीस अधिकारी याबद्दल चौकशी करीत होते. ज्यांनी तक्रार नोंदवली त्या तरुणींना मदत मिळाली का, याची खातरजमा करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी फोन करीत होते. विशेष म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पवार हे रजेवर होते. रजेवर असूनही त्यांनी या घटनेबाबत तत्परता दाखवली. त्यांनी लोकमत प्रतिनिधीला वारंवार फोन करून तक्रारीची माहिती घेतली. पोलिसांची व्हॅन येऊन गेल्यानंतर एक तासाने पुन्हा पोलीस अधिकारी सीताराम शिंदे यांनी तुम्हाला आमची मदत मिळाली का, याची चौकशी करण्यासाठी फोन केला. लोकमत प्रतिनिधींना पोलिसांची तत्परता जाणवली. ‘अ‍ॅप’बद्दल महिला अनभिज्ञ पोलिसांनी प्रतिसाद अ‍ॅप सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संकटात सापडलेल्या महिलांना तातडीने पोलिसांकडून मदत मिळावी, या उद्देशाने पोलीस खात्याने प्रतिसाद अ‍ॅप सुरू केले. मात्र, महिला आणि तरुणी या अ‍ॅपबद्दल अनभिज्ञ आहेत. जनजागृती नसल्याने असे काही अ‍ॅप आहे, हे महिलांना माहीत नाही. नोकरदार महिला वर्ग तसेच महाविद्यालयीन तरुणी यांना मोबाईलवर अ‍ॅप डाऊनलोड करून देण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. त्यासाठी मार्गदर्शनपर उपक्रम राबवले गेले पाहिजेत, असे महिलावर्गाचे म्हणणे आहे. आयटी सुरक्षेसाठी ‘बडीकॉप’ सुविधातळवडेत आयटी अभियंता अंतरा दास या तरुणीचा खून झाला. पाठोपाठ हिंजवडी आयटी पार्कमध्ये रसिला राजू ओपी या अभियंता तरुणीच्या खुनाची घटना घडली. त्यांनतर पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गंभीर दखल घेऊन महिला सुरक्षितता जनजागृती अभियान राबविले. एवढेच नव्हे तर वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाचे आयोजन करून आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण, तरुणींशी थेट संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तरुणींशी संवाद साधून सुरक्षिततेची दक्षता कशी घ्यावी, याबद्दल सूचना केल्या. कंपनी व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून कंपन्यांनी कोणती खबरदारी घ्यावी याबद्दलच्या सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर ‘बडी कॉप’ सुविधा खास या परिसरासाठी सुरू केली. पोलीस आयुक्तांनी उपाययोजनांकडे जातीने लक्ष दिले असल्यामुळे परिसरातील यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्यामुळे हिंजवडीतील पोलिसांची तत्परता दिसून येऊ लागली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बडिकॉप मोहिमेअंतर्गत महिलांचे व्हॉटसअ‍ॅप ग्रुप तयार केले आहेत. असे आणखी ग्रुप तयार केले जात आहेत. या ग्रुपमध्ये महिला पोलीस अधिकारी तसेच बडीकॉपसाठी काम करणारे पोलीस अधिकारी यांचाही सहभाग घेण्यात येत आहे. महिलांना त्रास देण्याचा काही प्रकार घडल्यास बडीकॉपच्या माध्यमातुन त्याची दखल घेतली जाते. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या पुढाकाराने यासंदर्भात आयटी कंपन्यांमधील तरूणींकरिता मार्गदर्शनपर उपक्रम आयोजित केले जात आहेत.