शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

विद्याधाम प्रशालेतील ४१ विद्यार्थ्यांना विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 00:20 IST

कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील विद्याधाम प्रशालेतील ४१ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून देण्यात येणारी खिचडी खालल्यानंतर काही मुलांना मळमळ व उलट्या सुरू झाल्या.

कान्हूर मेसाई - कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील विद्याधाम प्रशालेतील ४१ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून देण्यात येणारी खिचडी खालल्यानंतर काही मुलांना मळमळ व उलट्या सुरू झाल्या. ही घटना शनिवारी (दि. २२) रोजी घडली. ३७ विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर ऋतुजा अशोक खैर,े अश्विनी भगवंत जगदाळे, पायल सुरेश ननवरे, अजिंक्य संदीप दळे (सर्व रा.कान्हूर मेसाई) या चार जणांना मंचर येथे रुग्णालयात दाखल केले. तसेच ३७ विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.याबाबत मिळालेली माहिती अशी, की विद्याधाम हायस्कूलमधील सुमारे तीनशे सत्तर विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेतून खाद्य वाटप करण्यात येते. शनिवारी नेहमीप्रमाणे शालेय पोषण आहार योजनेतून विद्यार्थ्यांना मुगाची खिचडी सकाळी ९.४५ वाजता वाटप करण्यात आली. सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्यानंतर मळमळ होत असल्याची तक्रार शिक्षकांकडे केली. प्राचार्य एम. एन. माने यांनी तातडीने खिचडी वाटप थांबविले. काही विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी व पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. सुमारे ४१ विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना कान्हूर मेसाई येथील बाबाजी लंघे यांचच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. ४१पैकी ३७ विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक असल्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले. तत्पूर्वी शिरूर येथील शासकीय रुग्णालयातील डॉ. शिंदे यांना फोन करताच त्यांनी व कवठे येमाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर नामदेव पाणगे, डॉ. चव्हाण हे कान्हूरमेसाई येथे तातडीने दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांवर उपचार केले. चार विद्यार्थ्यांना अधिक त्रास जाणवू लागल्याने त्यांना मंचर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.संबंधित शाळेची माहिती कळताच गट शिक्षण अधिकारी बी. एन. कळमकर, शालेय पोषण आहार अधीक्षक अंकुश शहागटवार व संभाजी पवार यांनी ताबडतोब शाळेत येऊन विद्यार्थ्यांची चौकशी केली. या वेळी शिरूर पंचायत समितीचे सभापती विश्वासआबा कोहकडे यांनीपाहणी केली.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाPuneपुणे