शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

काव्य म्हणजे कवीच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब : अश्विनी धोंगडे; पुण्यात पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 12:58 IST

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित कवीच्या काव्यसंग्रहाला सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कार दिला जातो. यंदा धोंगडे यांच्या हस्ते कवी माधव हुंडेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देकविता म्हणजे त्या कवीचे शब्दांतून समोर आलेले जणू काही एक रूपच : अश्विनी धोंगडेधोंगडे यांच्या हस्ते कवी माधव हुंडेकर यांना सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कार प्रदान

पुणे : कवी जगत असताना त्याच्या जगण्यातून जे विचार, भावना व्यक्त होत असतात त्या तो कवितेमधून सादर करतो. कवी जोपर्यंत त्याचे स्वत:चे सत्त्व कवितेत मांडत नाही, तोपर्यंत त्याची कविता पूर्ण होत नाही. कवितेमध्ये त्या कवीचे समग्र व्यक्तिमत्त्वच प्रतिबिंबित होत असते. कविता म्हणजे त्या कवीचे शब्दांतून समोर आलेले जणू काही एक रूपच असते, असे मत साहित्यिका अश्विनी धोंगडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित कवीच्या काव्यसंग्रहाला सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कार दिला जातो. यंदा धोंगडे यांच्या हस्ते कवी माधव हुंडेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माधव हुंडेकर यांच्या ‘दायभाग’ कवितासंग्रहाची निवड करण्यात आली. या वेळी कविता निवड समितीच्या सदस्या डॉ. वर्षा तोडमल, मीरा शिंदे, सुहासिनी यांच्या कन्या डॉ. रूपा आडगावकार, डॉ. अलका चिडगोपकर, मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे, बण्डा जोशी आदी उपस्थित होते.धोंगडे म्हणाल्या, ‘‘जो कवी असतो, त्याच्यावर समाजातील घटना व घडामोडींचा परिणाम होत असतो. या घटना त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होतो आणि तो भाग कविता म्हणून बाहेर पडतो. त्या कवितेमध्ये वैचारिक व बौद्धिकता जाणवते. त्यामुळे प्रत्येक कवीने समाजात घडणाºया घटनांचा जाणीवपूर्वक विचार करावा.’’माधव हुंडेकर म्हणाले, ‘‘मी ज्या भावनेतून कविता लिहिल्या, त्या जनांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी ठरलो. मला अनेकांनी विचारले, की तुम्ही कविता कधी लिहिता? तर मी कविता लिहीत नाही ती एखादा आशय आणि आकृतिबंध घेऊन येते. आपल्याला आलेले अनुभव ही कवितेच्या बाबतीत श्रीमंती असते. म्हणून माझी कुठली कविता वादाला जाऊन चिकटत नाही.’’वर्षा तोडमल म्हणाल्या, ‘‘दायभाग ही कविता संग्रहाच्या रूपात सागळ्यांसमोर आली आहे. हे वेगळेपण आहे. कविता हा प्राचीन प्रकार आहे. त्यातून कुठलीही भावना व्यक्त करता येते.’’या संग्रहाची कुठलीही कविता वाचताना त्यातून कमी शब्दांचा वापर आणि उत्तम आशय दिसून येतो. तसेच कवितेमधून स्वत:चा स्वर जाणण्याची वृत्ती दिसून येते. प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. बण्डा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले.

टॅग्स :Maharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषदMilind Joshiमिलिंद जोशीSunitaraje Pawarसुनिताराजे पवारPuneपुणे