शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

PMC Election | सत्तांतर झाल्यास पालिकेची त्रिसदस्यीय प्रभाग रद्द होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 18:55 IST

महापालिकेच्या निवडणुकीचे चित्र बदलण्याची अनेकांना धास्ती...

पुणे : राज्यातील राजकीय घडामोडी पाहता महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजपप्रणीत सरकार येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. असा बदल झाला तर भाजपला अपेक्षित चार सदस्यीय प्रभाग रचना पुन्हा येऊन महापालिकेच्या निवडणुकीचे चित्र बदलण्याची धास्ती अनेकांनी घेतली आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने सन २०१७ च्या निवडणुकीत केलेल्या चार सदस्यीय प्रभाग रचना बदलून शिवसेनेच्या आग्रहाखातर तीन सदस्यीय सदस्य रचना करण्यात आली. यातून महापालिकेतील भाजपचे वर्चस्व संपणार अशी रणनीती रचण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. महाविकास आघाडीच्या माध्यमातून महापालिकेची निवडणूक लढवायची व त्यानुसार जागा वाटप करायचे, असे प्राथमिक चर्चेत ठरलेही होते.

परंतु राज्यातील महाविकास आघाडीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या शिवसेनेतील बंडाळी ही येत्या मंगळवारी कोणते समीकरण समोर ठेवते, यावर महापालिकेच्या निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे. यामध्ये भाजपप्रणीत सरकार आले तर, महापालिकेची प्रभागरचना तीन सदस्यांहून चार सदस्यांची होईल अशी शक्यता अनेक इच्छुक, तसेच भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही शक्यता खूपच कमी असल्याचे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. तीन सदस्यीय प्रभाग रचना व त्यानुसार सर्व नियोजन झाले आहे. मात्र, तरीही यात बदल करून पुन्हा चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली, तर आम्ही त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागू असे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका