शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

पीएमपीच्या निलंबित २९ कर्मचाऱ्यांना ‘माफी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 07:18 IST

बेशिस्त वर्तन, निष्काळजीपणा, गैरहजेरी अशा विविध कारणांमुळे निलंबित करण्यात आलेल्या २९ कर्मचाºयांना चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला

पुणे : बेशिस्त वर्तन, निष्काळजीपणा, गैरहजेरी अशा विविध कारणांमुळे निलंबित करण्यात आलेल्या २९ कर्मचाºयांना चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे. पूर्वीचे चांगले वर्तन लक्षात घेऊन तसेच सध्याची कर्मचाºयांची गरज पाहून या कर्मचाºयांना निलंबनातून माफी मिळाली आहे.‘पीएमपी’ प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच दोन अधिकाºयांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. निलंबन काळात नुसतेच वेतन देण्यापेक्षा त्यांचे निलंबन रद्द केल्यास कामकाज होईल, असा दावा करीत प्रशासनाने त्यांचे निलंबन रद्द केले. हाच नियम आता इतर कर्मचाºयांनाही लागू करण्यास सुरुवात झाली आहे. मागील वर्षभरात अनेक कर्मचाºयांचे विविध कारणांसाठी निलंबन करण्यात आले. त्यामध्ये अपघात, बेशिस्त वर्तन, गैरहजेरी, उद्धट वर्तन, निष्काळजीपणा, कामचुकारपणा, तिकीट रकमेत तफावत अशा विविध कारणांचा समावेश आहे.पीएमपीकडे ६२ कर्मचाºयांच्या निलंबनाची प्रकरणे होती. चौकशी विभागाकडून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच या विभागात चौकशीची इतरही अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याअनुषंगाने कर्मचाºयांच्या विविध प्रकरणांचा वेगाने निपटारा करण्यासाठी प्रशासनाने नुकतीच सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमली आहे. ही कामे मार्गी लावण्याबरोबरच समितीकडे निलंबित कर्मचाºयांना पुन्हा सेवेत घेण्याबाबतही काम देण्यात आले आहे.समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये एकूण निलंबित कर्मचारी व त्यांचे यापूर्वीचे वर्तन यावर चर्चा करून ३१ कर्मचाºयांचे निलंबन रद्द करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर चार-पाच दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत २९ कर्मचाºयांचे निलंबन रद्द करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या कर्मचाºयांवरील आरोप किरकोळ स्वरूपाचे असल्याने त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. परंतु त्यांची सेवेत आल्यानंतरही चौकशी सुरूच राहणार आहे.समितीने २९ कर्मचाºयांचे निलंबन रद्द करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. या कर्मचाºयांवर किरकोळ स्वरूपाचे आरोप आहेत. लवकरच त्यांचे निलंबन रद्दचे आदेश काढले जातील. - सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी