शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या निलंबित २९ कर्मचाऱ्यांना ‘माफी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 07:18 IST

बेशिस्त वर्तन, निष्काळजीपणा, गैरहजेरी अशा विविध कारणांमुळे निलंबित करण्यात आलेल्या २९ कर्मचाºयांना चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला

पुणे : बेशिस्त वर्तन, निष्काळजीपणा, गैरहजेरी अशा विविध कारणांमुळे निलंबित करण्यात आलेल्या २९ कर्मचाºयांना चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे. पूर्वीचे चांगले वर्तन लक्षात घेऊन तसेच सध्याची कर्मचाºयांची गरज पाहून या कर्मचाºयांना निलंबनातून माफी मिळाली आहे.‘पीएमपी’ प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच दोन अधिकाºयांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. निलंबन काळात नुसतेच वेतन देण्यापेक्षा त्यांचे निलंबन रद्द केल्यास कामकाज होईल, असा दावा करीत प्रशासनाने त्यांचे निलंबन रद्द केले. हाच नियम आता इतर कर्मचाºयांनाही लागू करण्यास सुरुवात झाली आहे. मागील वर्षभरात अनेक कर्मचाºयांचे विविध कारणांसाठी निलंबन करण्यात आले. त्यामध्ये अपघात, बेशिस्त वर्तन, गैरहजेरी, उद्धट वर्तन, निष्काळजीपणा, कामचुकारपणा, तिकीट रकमेत तफावत अशा विविध कारणांचा समावेश आहे.पीएमपीकडे ६२ कर्मचाºयांच्या निलंबनाची प्रकरणे होती. चौकशी विभागाकडून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच या विभागात चौकशीची इतरही अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याअनुषंगाने कर्मचाºयांच्या विविध प्रकरणांचा वेगाने निपटारा करण्यासाठी प्रशासनाने नुकतीच सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमली आहे. ही कामे मार्गी लावण्याबरोबरच समितीकडे निलंबित कर्मचाºयांना पुन्हा सेवेत घेण्याबाबतही काम देण्यात आले आहे.समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये एकूण निलंबित कर्मचारी व त्यांचे यापूर्वीचे वर्तन यावर चर्चा करून ३१ कर्मचाºयांचे निलंबन रद्द करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर चार-पाच दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत २९ कर्मचाºयांचे निलंबन रद्द करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या कर्मचाºयांवरील आरोप किरकोळ स्वरूपाचे असल्याने त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. परंतु त्यांची सेवेत आल्यानंतरही चौकशी सुरूच राहणार आहे.समितीने २९ कर्मचाºयांचे निलंबन रद्द करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. या कर्मचाºयांवर किरकोळ स्वरूपाचे आरोप आहेत. लवकरच त्यांचे निलंबन रद्दचे आदेश काढले जातील. - सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी