शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

प्लस व्हॅली, अंधारबन ‘बंद’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 15:54 IST

पर्यटकांच्या बेजबाबदारपणा आणि बेशिस्तमुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देपर्यटनाच्या नावाखाली चाललेल्या स्वैराचाराने पर्यावरणाची हानी बेताल वर्तन करणाऱ्यांवर व नियम तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

गोरख माझिरे । भूगाव : पश्चिम घाटातील जैवविविधता व पर्यावरण यांच्या संवर्धनाकरिता वनविभागाने पुढाकार घेतला आहे. याचा भाग म्हणून पश्चिम घाटांतर्गत येणाऱ्या ताम्हिणी वन्यजीव अभयारण्यामधील प्लस व्हॅली आणि सुधागड वन्यजीव अभयारण्य भागातील अंधारबन भागात पर्यावरणाच्या दृष्टीने ठरवून देण्यात आलेल्या अतिसंवेदनशील भागात १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात येणार आहे.   याविषयी अधिक माहिती देताना ताम्हिणी वनपरिक्षेत्र विभागाचे वनअधिकारी अंकिता तरडे म्हणाल्या, पश्चिम घाटातील पर्यटकांच्या बेजबाबदारपणा आणि बेशिस्तमुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. या भागातील महत्त्वाची जैवविविधतादेखील नष्ट झाली आहे. तसेच पर्यटनाच्या नावाखाली चाललेल्या स्वैराचाराने पर्यावरणाची हानी होत असल्याने प्रशासनाने त्यावर कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यापुढील काळात या परिसरात बेताल वर्तन करणाऱ्यांवर व नियम तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.२०१३ च्या राज्य वनविभागाच्या अधिनियमानुसार ताम्हिणी घाटातील अभयारण्याची नोंद आहे. ४९.६२ चौ.कि.मी. एवढे क्षेत्रात विस्तारलेल्या हे अभयारण्य वेगवेगळ्या १२ भागांत विभागले असून पुणे वनविभागात येतात. या अभयारण्यात सस्तन प्राण्यांच्या २५ प्रजाती आहेत. विशेष म्हणजे यात महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’ याचाही समावेश आहे. याबरोबरच बिबट्या, भेकर हे देखील या परिसरात आढळतात. १५० हून अधिक पक्ष्यांच्या जाती आणि फुलपाखरांच्या ७० पेक्षा अधिक प्रजातींचे अस्तित्व आहे. ..............४घनदाट जंगल अशी ओळख असलेल्या अंधारबन हे जंगल ताम्हिणी घाटाच्या मध्यवर्ती भागापासून १३ किमी अंतरावर आहे. पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. येथे सातत्याने हौशी पर्यटकांची वर्दळ सुरू असते. दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान येथील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. काही खासगी ट्रेकर संस्था या ठिकाणी ट्रेकिंगचे आयोजन करतात. साप्ताहिक सुटीच्या दिवशी हजारो पर्यटकांची गर्दी या भागात पाहवयास मिळते. .............पर्यटकाकडून वनविभागाच्यावतीने नमूद केलेल्या कुठल्याही नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. याशिवाय त्यात दोषी आढळल्यास पर्यटक अथवा संबंधित सहल आयोजकाला शिक्षेला सामोरे जावे लागेल. - अंकिता तरडे (वनअधिकारी, ताम्हिणी अभयारण्य)

टॅग्स :Puneपुणेtourismपर्यटन