शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

वाळू व्यवसायाच्या वादातून खुनाचे कटकारस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:56 IST

दौंड तालुक्यातील देलवडी येथे काही दिवसांपूर्वी वाळू व्यवसायाच्या वादातून एक खून झाला होता. या खूनाचे कट पुण्यातील एका हॉटेलमध्ये रचला गेला असल्याची माहिती अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना मिळाली आहे.

यवत : दौंड तालुक्यातील देलवडी येथे काही दिवसांपूर्वी वाळू व्यवसायाच्या वादातून एक खून झाला होता. या खूनाचे कट पुण्यातील एका हॉटेलमध्ये रचला गेला असल्याची माहिती अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी या खून प्रकरणात लावलेल्या कलमांमध्ये कट रचण्याचे कलम वाढविले असून यात आणखी एक आरोपी वाढला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

स्वप्नील उर्फ पिंटू ज्ञानदेव शेलार (वय - ३०) याचा दगडाने ठेचून व धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी यवत पोलिसांनी काही तासातच तपासाची जोरदार चक्रे फिरवत सोमनाथ विष्णू शेलार, विशाल उर्फ बाबू मेमाणे , रणजित उर्फ बाबू वांझरे , बबलू विश्वास डेंगळे व अनिल उर्फ सुनील शितोळे यांना अटक केली होती. पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळू व्यावसायच्या वादातून यापूर्वी राहू येथे दुहेरी खून घडला होता. दिवसा ढवळ्या दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या प्रकरणातील दोन आरोपी संतोष संपत जगताप व समीर संपत जगताप यांचा देलवडी येथे युवकाच्या खुनात सहभाग असल्याचे फिर्यादीत नमूद होते. ते दोघे अजूनही फरार आहे. पुढील तपास दौंड पोलीस करत आहे.या सर्व आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. यवत पोलिसांनी काही तासातच खुनाचा तपास लावून पाच आरोपींना अटक केली होती. तर फिर्यार्दी नमूद केलेले आरोपी असलेले चौघे आरोपी फरारी झाले होते.

टॅग्स :sandवाळूCrimeगुन्हाPuneपुणे