शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

प्लास्टिक बंदीची कारवाई आवरा, पुण्यातील व्यापा-यांचे पालकमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 20:26 IST

नामांकित कंपन्यांकडून पॅकिंग केलेल्या वेफर्स आणि इतर पदार्थांची प्लास्टिक पिशव्यात विक्री केली तर कोणतीही कारवाई होत नाही.परंतु....

ठळक मुद्देकोणत्या प्लास्टिकवर कारवाई केली जाईल; यासंदर्भातील नियमावली जाहीर करावी, अशी मागणी कपडे व काही दिवसांनंतर खराब होणारे अन्न पदार्थ प्लास्टिक पिशवीतून इतर राज्यातून महाराष्ट्रात दाखल

पुणे: प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी पालिका प्रशासनाकडून केली जाणारी कारवाई चूकीची असल्याचा आरोप पुण्यातील व्यापा-यांनी केला. तसेच कोणत्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर कारवाई करावी किंवा करू नये याबाबत स्पष्टता नसल्याने सोमवारी व्यापा-यांनी पालिकेसमोर आंदोलन केले. दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल,असे बापट यांनी सांगितले. पुणे महानगरपालिकेतर्फे प्लास्टिक बंदीच्या कारवाईस सुरूवात करण्यात आली.शहरातील विविध ठिकाणच्या व्यापा-यांवर कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपये दंड वसूल केला. शहरातील काही खाद्य पदार्थ उद्योजकांनी तयार केलेले पदार्थ स्वत:च्या ब्रॅण्डच्या नावाचा उल्लेख असलेल्या पिशवीत विक्रीसाठी ठेवले तरीही त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.परंतु,नामांकित कंपन्यांकडून पॅकिंग केलेल्या वेफर्स आणि इतर पदार्थांची प्लास्टिक पिशव्यात विक्री केली तर कोणतीही कारवाई होत नाही. तसेच मुंबई व पुण्यात वेगवेगळ्या पध्दतीने कारवाई केली जात आहे.त्यामुळे कोणत्या प्लास्टिकवर कारवाई केली जाईल; यासंदर्भातील नियमावली जाहीर करावी, अशी मागणी पुण्यातील व्यापा-यांनी केली. ग्राहक पेठेचे सुर्यकांत पाठक यांच्या शिष्टमंडळाने बापट यांनी भेट घेवून अडचणी मांडल्या. बापट म्हणाले, प्लास्टिक बंदीबाबत न्यायालयाने आदेश दिले असून राज्य शासनाने त्यानुसार नियमावली तयार करून कारवाई सुरू केली आहे. प्लास्टिकमुळे होणारा पर्यावरणाचा -हास विचारात घेवूनच प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बंदीचा निर्णय घेण्यापूर्वी शासनाकडून सुमारे नऊ महिन्यांचा अवधी दिला होता.सुरूवातीच्या काळात काही अडचणी येऊ शकतात.कोणालाजी त्रास देण्याची शसानाची भूमिका नाही. त्यामुळे येत्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. दरम्यान,प्लास्टिक बंदीमुळे घरगुती पदार्थ तयार करून उपजिविका करणारे लहान उद्योजक,महिला बचत गट,मिठाई,चिवडा यांची विक्री करणारे व्यापारी अडचणीत सापडले आहेत.त्यामुळे शासनाने याबाबत लक्ष घालावे,अशी मागणी व्यापा-यांनी बापट यांच्याकडे केली.

---------------------

सर्व व्यापा-यांनी प्लास्टिक बंदीचे स्वागत केले असून पहिल्या दिवसापासून प्लास्टिक कॅरीबॅग बंद केल्या आहेत. मात्र, कपडे किंवा काही दिवसांनंतर खराब होणारे अन्न पदार्थ प्लास्टिक पिशवीतून इतर राज्यातून महाराष्ट्रात दाखल होतो. परंतु, पालिकेकडून अशा पिशव्यांवरही कारवाई केली जात आहे.त्यामुळे नाईलाजास्तव व्यापा-यांना संप करावा लागला आहे.शासनाने कारवाई संदर्भातील नियमांबाबत जागृती करावी,अशी अपेक्षा व्यापा-यांनी व्यक्त केली.त्यावर पालिका प्रशासनाला जागृती करण्याच्या सुचना दिल्या जातील,असे बापट यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेPlastic banप्लॅस्टिक बंदीgirish bapatगिरीष बापटbusinessव्यवसायPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका