शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

बाजारातून प्लॅस्टिक पिशव्या हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 1:54 AM

प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरासंदर्भात उद्या (शनिवार) पासून कडक अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.

पुणे : प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरासंदर्भात उद्या (शनिवार) पासून कडक अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह ग्राहकांकडे प्लॅस्टिक पिशव्या सापडल्यास पाच हजार रुपये दंड वसुलीचा इशारा महापालिकेकडून देण्यात आल्याने सर्वांनी चांगलाच धसका घेतला आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्यांबदल्यात व्यापाऱ्यांसह हॉटेल व्यावसायिकांनी कागदी-कापडी; तसेच सिल्व्हर फॉईलच्या पिशव्यांचा पर्याय निवडल्याचे ‘लोकमत’ पाहणीमध्ये दिसून आले आहे.प्लॅस्टिक बंदी लागू करण्यापूर्वी पालिकेकडून शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई केली जात होती. बंदी जाहीर केलेल्या तारखेपासून पुढील तीन महिने प्लॅस्टिक न वापरण्यासंबंधी लोकांमध्ये जनजागृती करून दंडात्मक कारवाई करण्याचे सूतोवाच महापालिकेने केले होते. त्यानुसार पालिकेने वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली. या जनजागृतीसाठी देण्यात आलेल्या मुदतीचा कालावधी २३ जून रोजी संपुष्टात येत असल्याने ही प्लॅस्टिक विरोधी कारवाई तीव्र केली जाणार आहे. यामध्ये उत्पादक, विक्रेते यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे; तसेच सर्वसामान्य नागरिक प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करताना आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करून पाच हजार रुपये दंड घेतला जाणार आहे.किराणा माल दुकानदारांनी कागदी पिशव्या, तर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी कापडी पिशव्यांचा पर्याय निवडला आहे. हॉटेलमधून प्लॅस्टिकच्या डब्यांमधून देण्यात येणाºया पार्सलची जागा सिल्व्हर फॉईल पिशव्यांनी घेतली आहे. मॉलमध्ये ग्राहकांना कागदी पिशव्या दिल्या जात असून, त्या पिशव्यांवर ८ ते १२ रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत; मात्र कागदी पिशव्यांच्या वापराबाबत काही किरकोळ व्यापाºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, या कागदी पिशव्या विकत घेण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्यांपेक्षाही जास्त किंमत मोजावी लागत आहे. तांदूळ, गहू कागदी पिशव्यांमध्ये द्यायचे कसे, असा प्रश्न किराणा माल दुकानदारांना भेडसावत आहे. १ किलो डाळ पिशव्यांमध्ये दिली, तर ती पिशवी फाटत असल्याने नवीनच डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे २ किलोच्या पिशवीमध्ये १ किलोचा माल द्यावा लागणार असल्याचे काही दुकानदारांनी सांगितले.दरम्यान, महाराष्ट्र प्लॅस्टिक मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशनने प्लॅस्टिक बंदीला विरोध दर्शवून राज्यातील ५० हजार व्यापाºयांनी या विरोधात बंदचा नारा दिला आहे. फेडरेशन आॅफ असोसिएशन इन महाराष्ट्र या संघटनेच्या शिष्टमंडळाची शासनाच्या बुधवारी रात्री तज्ज्ञ समितीसमवेत बैठक झाली. त्यामध्ये फेडरेशनने आपली बाजू मांडली. चर्चेमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा अधिक पिशव्या बंदीमधून वगळण्यात आल्या आहेत. मात्र त्या पिशव्यांवर मॅन्यूफॅक्चररचे नाव, पत्ता आणि पुनर्वापराचे चिन्ह असणे बंधनकारक करण्यात आले आहे.व्यापाºयांकडे असलेल्या पिशव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. २३ जूनची मुदतही वाढविण्यात आली असल्याचे महाराष्ट्र प्लॅस्टिक मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश गांधी यांनी सांगितले.>कशावर आहे बंदी?प्लॅस्टिकच्या पिशव्यांसह थर्माकोल, प्लॅस्टिक पासून तयार केलेल्या ताट, कप, वाट्या, चमचे, भांडे, हॉटेलमध्ये अन्न पदार्थांच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येत असलेल्या वस्तूंचा बंदीमध्ये समावेश आहे.प्लॅस्टिक पिशव्या बंद झाल्यामुळे गहू, तांदूळ कशात द्यायचे, हा प्रश्न आमच्यापुढे उभा ठाकला आहे. आम्ही कागदी पिशव्यांचा पर्याय निवडला आहे, मात्र त्या पिशव्या विकत घेण्यासाठी अधिक किंमत मोजावी लागत आहे. या प्लॅस्टिक बंदीमुळे व्यवसायावर परिणाम होत आहे.- महेश चौधरी,किराणा माल दुकानदार