शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
2
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
3
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
4
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
5
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
7
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
8
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
9
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
10
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
11
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
12
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
13
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
14
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
15
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
16
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
17
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
18
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
19
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
20
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?

आईच्या अस्थी विसर्जन न करता शेतातच ठेवून केले वृक्षारोपण; जुन्नर तालुक्यातील आदर्श उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 12:31 IST

आईच्या नावाने हे रोप वाढविण्याचा आणि निसर्ग संवर्धन करण्याचा संकल्प..

ठळक मुद्देकुटुंबात वारीची परंपरा जपलेली असल्याने सर्वांनी वृक्षारोपण करण्यासाठी घेतला पुढाकार

पुणे : मृत्यू झाल्यानंतर नदीत अस्थिविसर्जन केले जाते. परंतु एका कुटुंबाने नदीत अस्थिविसर्जन न करता स्वत:च्या शेतातच जमिनीत ठेवून त्यावर वृक्षारोपण केले आहे. आईच्या नावाने हे रोप वाढविण्याचा आणि निसर्ग संवर्धन करण्याचा संकल्प या कुटुंबाने केला आहे. जुन्नर तालुक्यातील वडगाव सहानी या गावातील थोरात कुटुंबाने हा उपक्रम राबविला आहे.

सध्या कोरोनाने पालखी पायी सोहळा रद्द झाला आहे. उलट घरोघरी रोप लावून यंदाची वारी हरित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यापासून प्रेरणा घेऊन थोरात कुटुंबीयांनी अस्थिविसर्जन न करता वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. नकुबाई वामनराव थोरात यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबातील नंदाशेठ, विजय या मुलांनी आणि शोभा सविता थोरात या सूनांनी नदीत अस्थिविसर्जन न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबात वारीची परंपरा जपलेली असल्याने सर्वांनी वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घेतला.पालखी सोहळ्यात  पर्यावरण  वारीची परंपरा सुरू करणारे ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांनी यंदा गुळवेल लावण्याचे आवाहन केले आहे. त्यानूसार आईच्या स्मरणार्थ आंब्याचे झाड लावले असून, गुळवेल, पिंपळ, पेरू, जांभळी, लिंबू, सीताफळ ही रोपं देखील लावली आहेत. ही सर्व झाडं औषधी आहेत. झाड लावताना निसर्ग संरक्षणाचा पाठ वाबळे महाराज यांनी म्हटला.=====================निसर्गपाठ बोलून वृक्षारोपण''रूप पाहता लोचनी, पर्यावरण ठेवू मनीत्वा विठ्ठल बरवा, झाडे लावा झाडे जगवाबहुत सुकृताची जोडी, धरा सेंद्रीय खताची आवडीसर्व सुखाचे आगर, बनवू आमराई सुंदर !''हा निसर्गपाठ या प्रसंगी म्हणण्यात आला आणि वृक्षारोपण करण्यात आले.  ===============स्मृती जपण्यासाठी उपक्रमनदीत अस्थिविसर्जन केल्यानंतर प्रदूषण होते. पण या उपक्रमाने एक चांगला आदर्श लोकांसमोर ठेवण्यात आला आहे. एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या स्मृती जपण्यासाठी वृक्षारोपण करणे मनाला दिलासा देणारे आहे. कारण रोप जसे वाढेल तसे त्या सळसळणाºया पानांतून ती व्यक्तीच आपल्याशी संवाद साधतेय अशी भावना मनी येईल. हा आनंद अविस्मरणीय ठरेल. पिढ्यान पिढ्या हा वृक्ष त्या व्यक्तीची आठवण म्हणून बहरत जाईल. ही खरी श्रद्धांजली ठरणार आहे, असे प्रबोधनकार ज्ञानेश्वरमहाराज वाबळे यांनी सांगितले.==============

टॅग्स :Junnarजुन्नरenvironmentपर्यावरणDeathमृत्यूPandharpur Wariपंढरपूर वारी