शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

आईच्या अस्थी विसर्जन न करता शेतातच ठेवून केले वृक्षारोपण; जुन्नर तालुक्यातील आदर्श उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 12:31 IST

आईच्या नावाने हे रोप वाढविण्याचा आणि निसर्ग संवर्धन करण्याचा संकल्प..

ठळक मुद्देकुटुंबात वारीची परंपरा जपलेली असल्याने सर्वांनी वृक्षारोपण करण्यासाठी घेतला पुढाकार

पुणे : मृत्यू झाल्यानंतर नदीत अस्थिविसर्जन केले जाते. परंतु एका कुटुंबाने नदीत अस्थिविसर्जन न करता स्वत:च्या शेतातच जमिनीत ठेवून त्यावर वृक्षारोपण केले आहे. आईच्या नावाने हे रोप वाढविण्याचा आणि निसर्ग संवर्धन करण्याचा संकल्प या कुटुंबाने केला आहे. जुन्नर तालुक्यातील वडगाव सहानी या गावातील थोरात कुटुंबाने हा उपक्रम राबविला आहे.

सध्या कोरोनाने पालखी पायी सोहळा रद्द झाला आहे. उलट घरोघरी रोप लावून यंदाची वारी हरित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यापासून प्रेरणा घेऊन थोरात कुटुंबीयांनी अस्थिविसर्जन न करता वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. नकुबाई वामनराव थोरात यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबातील नंदाशेठ, विजय या मुलांनी आणि शोभा सविता थोरात या सूनांनी नदीत अस्थिविसर्जन न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबात वारीची परंपरा जपलेली असल्याने सर्वांनी वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घेतला.पालखी सोहळ्यात  पर्यावरण  वारीची परंपरा सुरू करणारे ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांनी यंदा गुळवेल लावण्याचे आवाहन केले आहे. त्यानूसार आईच्या स्मरणार्थ आंब्याचे झाड लावले असून, गुळवेल, पिंपळ, पेरू, जांभळी, लिंबू, सीताफळ ही रोपं देखील लावली आहेत. ही सर्व झाडं औषधी आहेत. झाड लावताना निसर्ग संरक्षणाचा पाठ वाबळे महाराज यांनी म्हटला.=====================निसर्गपाठ बोलून वृक्षारोपण''रूप पाहता लोचनी, पर्यावरण ठेवू मनीत्वा विठ्ठल बरवा, झाडे लावा झाडे जगवाबहुत सुकृताची जोडी, धरा सेंद्रीय खताची आवडीसर्व सुखाचे आगर, बनवू आमराई सुंदर !''हा निसर्गपाठ या प्रसंगी म्हणण्यात आला आणि वृक्षारोपण करण्यात आले.  ===============स्मृती जपण्यासाठी उपक्रमनदीत अस्थिविसर्जन केल्यानंतर प्रदूषण होते. पण या उपक्रमाने एक चांगला आदर्श लोकांसमोर ठेवण्यात आला आहे. एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या स्मृती जपण्यासाठी वृक्षारोपण करणे मनाला दिलासा देणारे आहे. कारण रोप जसे वाढेल तसे त्या सळसळणाºया पानांतून ती व्यक्तीच आपल्याशी संवाद साधतेय अशी भावना मनी येईल. हा आनंद अविस्मरणीय ठरेल. पिढ्यान पिढ्या हा वृक्ष त्या व्यक्तीची आठवण म्हणून बहरत जाईल. ही खरी श्रद्धांजली ठरणार आहे, असे प्रबोधनकार ज्ञानेश्वरमहाराज वाबळे यांनी सांगितले.==============

टॅग्स :Junnarजुन्नरenvironmentपर्यावरणDeathमृत्यूPandharpur Wariपंढरपूर वारी