शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नियोजनाने मिळेल परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:10 IST

अभ्यास व सरावाला सुरुवात केली तरीसुद्धा आपण चांगल्या गुणांनी यशस्वी होऊ शकतो. सध्या शिक्षकांबरोबर पालक आणि विद्यार्थीसुद्धा स्मार्ट ...

अभ्यास व सरावाला सुरुवात केली तरीसुद्धा आपण चांगल्या गुणांनी यशस्वी होऊ शकतो. सध्या शिक्षकांबरोबर पालक आणि विद्यार्थीसुद्धा स्मार्ट झाले आहेत. अभ्यासक्रमसुद्धा स्मार्ट आहे. त्यामुळे अभ्याससुद्धा स्मार्ट करा आणि येणाऱ्या परीक्षेत चांगले यश मिळवा. सध्या सर्वत्र वेगवेगळ्या अफवांचे पेव फुटले आहे. रोज नवीन अफवा पसरत आहेत. तर खोट्या अफवांवर पटकन विश्वास न ठेवता, त्यातील सत्य काय आहे ते जाणून घ्या. परीक्षा ऑफलाईन पध्दतीने होणार आहे, हे खरं आहे. परीक्षा ऑनलाईन होणार या अफवेवर विश्वास ठेवू नका.

अशी करा परीक्षेची पूर्वतयारी...

कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्याने शाळा बंद होत्या परिणामी विद्यार्थ्यांच्या मनावर परीक्षेचे दडपण येऊ नये म्हणून शासनाने प्रत्येक विषयाचा २५% अभ्यासक्रम कमी केला आहे. प्रत्येक विषयाचा नेमका कोणता घटक वगळलेला आहे, ते व्यवस्थित समजून घ्या. जुन्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडविण्याचा सराव करा. प्रत्येक विषयाच्या किमान पाच तरी प्रश्नपत्रिका सोडवा. सराव करत रहा. सरावाने आपणास परीक्षेला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास येईल. परीक्षेची भीती दूर होऊन नक्की यशस्वी व्हाल.

अफवांवर ठेवू नका विश्वास...

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत होती. मात्र, राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता विद्यार्थ्यांनी अभ्यास व सरावात सातत्य ठेवावे.

असे करा परीक्षेचे नियोजन...

दहावी व बारावी परीक्षेचे वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या वेळापत्रकानुसार अभ्यासाचे नियोजन करा. आपल्या हातात उरलेले दिवस उपयोगात आणा. आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक आपणच तयार करा. कोणत्या विषयाला किती दिवस द्यायचे ते ठरवा. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास कसा होईल हे पहा. मनावर कुठलाही ताण तणाव घेऊ नका. परीक्षेची भीती बाळगू नका. बोर्डाची ही परीक्षा म्हणजे अंतिम परीक्षा नाही. पालकांनीसुद्धा सतर्क राहणे आवश्यक आहे. विनाकारण आपल्या पाल्याला तणाव येईल, असे वातावरण घरात निर्माण करू नका. घरातील वातावरण प्रसन्न ठेवा. आपल्या पाल्याच्या यशात आपला आनंद आहे, हे लक्षात ठेवा. आज पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश नक्कीच मिळेल.

- सुधाताई सुळे-अजबे, शिक्षिका व समुपदेशक