शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाने मिळेल परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:10 IST

अभ्यास व सरावाला सुरुवात केली तरीसुद्धा आपण चांगल्या गुणांनी यशस्वी होऊ शकतो. सध्या शिक्षकांबरोबर पालक आणि विद्यार्थीसुद्धा स्मार्ट ...

अभ्यास व सरावाला सुरुवात केली तरीसुद्धा आपण चांगल्या गुणांनी यशस्वी होऊ शकतो. सध्या शिक्षकांबरोबर पालक आणि विद्यार्थीसुद्धा स्मार्ट झाले आहेत. अभ्यासक्रमसुद्धा स्मार्ट आहे. त्यामुळे अभ्याससुद्धा स्मार्ट करा आणि येणाऱ्या परीक्षेत चांगले यश मिळवा. सध्या सर्वत्र वेगवेगळ्या अफवांचे पेव फुटले आहे. रोज नवीन अफवा पसरत आहेत. तर खोट्या अफवांवर पटकन विश्वास न ठेवता, त्यातील सत्य काय आहे ते जाणून घ्या. परीक्षा ऑफलाईन पध्दतीने होणार आहे, हे खरं आहे. परीक्षा ऑनलाईन होणार या अफवेवर विश्वास ठेवू नका.

अशी करा परीक्षेची पूर्वतयारी...

कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्याने शाळा बंद होत्या परिणामी विद्यार्थ्यांच्या मनावर परीक्षेचे दडपण येऊ नये म्हणून शासनाने प्रत्येक विषयाचा २५% अभ्यासक्रम कमी केला आहे. प्रत्येक विषयाचा नेमका कोणता घटक वगळलेला आहे, ते व्यवस्थित समजून घ्या. जुन्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडविण्याचा सराव करा. प्रत्येक विषयाच्या किमान पाच तरी प्रश्नपत्रिका सोडवा. सराव करत रहा. सरावाने आपणास परीक्षेला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास येईल. परीक्षेची भीती दूर होऊन नक्की यशस्वी व्हाल.

अफवांवर ठेवू नका विश्वास...

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत होती. मात्र, राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता विद्यार्थ्यांनी अभ्यास व सरावात सातत्य ठेवावे.

असे करा परीक्षेचे नियोजन...

दहावी व बारावी परीक्षेचे वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या वेळापत्रकानुसार अभ्यासाचे नियोजन करा. आपल्या हातात उरलेले दिवस उपयोगात आणा. आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक आपणच तयार करा. कोणत्या विषयाला किती दिवस द्यायचे ते ठरवा. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास कसा होईल हे पहा. मनावर कुठलाही ताण तणाव घेऊ नका. परीक्षेची भीती बाळगू नका. बोर्डाची ही परीक्षा म्हणजे अंतिम परीक्षा नाही. पालकांनीसुद्धा सतर्क राहणे आवश्यक आहे. विनाकारण आपल्या पाल्याला तणाव येईल, असे वातावरण घरात निर्माण करू नका. घरातील वातावरण प्रसन्न ठेवा. आपल्या पाल्याच्या यशात आपला आनंद आहे, हे लक्षात ठेवा. आज पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश नक्कीच मिळेल.

- सुधाताई सुळे-अजबे, शिक्षिका व समुपदेशक