शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

‘प्लेसमेंट’ विद्यार्थी आणि शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:13 IST

औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळाकडे काही विशेष कौशल्य असल्याशिवाय त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होत नाही. त्यामुळे महाविद्यालयीन कार्यकालातच विद्यार्थ्यांनी अधिकाधिक कौशल्य ...

औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळाकडे काही विशेष कौशल्य असल्याशिवाय त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होत नाही. त्यामुळे महाविद्यालयीन कार्यकालातच विद्यार्थ्यांनी अधिकाधिक कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना भिंतीबाहेरील कृतियुक्त शिक्षण देणे ही आजच्या काळाची गरज आहे. क्षेत्रभेटी, अचानक उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करण्याचे कौशल्य, एकत्रितपणे काम करण्याची मानसिकता, शारीरिक व बौद्धक क्षमतांचा विकास अशा अनेक विषयांतील अध्ययन, अध्यापन तंत्राचा वापर करणे म्हणजेच शिक्षणाचे संक्रमण आहे.

या नव्या तंत्रज्ञानाचा संबंध आपल्या शिक्षणाशी जोडला तरच शैक्षणिक व वैचारिक संक्रमण घडेल. आजचे शिक्षण खऱ्या अर्थाने प्रयोगशील होऊ पाहात आहे. या प्रक्रियेत सर्व शिक्षकांना फार मोठी जबाबदारी पार पाडावयाची आहे. या प्रक्रियेमध्ये शिक्षकाची भूमिका ही आता बदलू लागली आहे. या संक्रमणाच्या युगात केवळ विद्यार्थ्यांच्या विकासाच्या मार्गातील मार्गदर्शक व सहायक बनायला हवे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्यांच्यामध्ये विवेक व मूल्यांचा संस्कार करण्यामध्ये महत्वाचा सहभाग हवा. यातून शिक्षणाचे योग्य संक्रमण होईल.

--------------

स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्व विकासाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून त्यावरून नोकरीसाठी निवड होण्याची शक्यता वाढली आहे. शिवाय दैनंदिन व्यवहारांमध्ये स्वत:ला इतरांच्या तुलनेत सरस ठेवण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाची निकड जाणवू लागली आहे. त्यामुळे काय करावे आणि काय करू नये, अशा मानसिक तणावातून सध्याचा तरुण वर्ग जात आहे. त्यामुळे प्लेसमेंटच्या दृष्टिकोनातून काही गोष्टींकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

स्वत:ला जाणून घ्या

स्वत:मधील चांगल्या आणि वाईट गोष्टींची एक यादी तयार करा. त्यानंतर त्यातील चांगल्या गोष्टी प्रत्येक आठवड्याला वाढवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर वाईट गोष्टींवर मात करीत एक प्रभावी, तजेलदार व्यक्तिमत्त्व घडवा. तुमच्या वागण्या-बोलण्यात सकारात्मकता आणा. तुमच्या वागण्या-बोलण्यातून सकारात्मक भाव समोरच्या व्यक्तीवर प्रतित व्हायला हवा. तुम्ही नकारात्मक असाल, किंवा काही कारणांनी नाराज असाल तर समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव पडणार नाही.

स्वत:चे मत असू द्या

कोणताही प्रसंग असो तुम्हाला मत असणे अत्यंत आवश्यक आहे. मत नसलेल्या व्यक्तीला सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्थान नाही. एकदा इतरांना समजले, की तुम्हाला मत नाही तर ते तुम्हाला गृहित धरू लागतात. यात तुमचे नुकसान होते.

नवीन लोकांना भेटा

असे म्हटले जाते, की दररोज तुम्ही एक माणूस जोडला पाहिजे. जर हे शक्य नसेल तर एका आठवड्यात किमान एक माणूस जोडण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन गोष्टी समजतात. तुमच्या ज्ञानात भर पडते.

वाचन करा, नवीन छंड जोपासा

वाचन करणारा व्यक्ती ज्ञानी समजला जातो. कारण दररोज त्याच्या ज्ञानात भर पडत असते. नवनवीन गोष्टी तो आत्मसात करत असतो. त्यामुळे तुमचा समजूतदारपणा अधिक फुलतो. आणखी लोक तुमच्याशी जोडले जातात. तसेच नवीन छंद जोपासायचा प्रयत्न करा.

चांगला श्रोता व्हा

समोरचा व्यक्ती काय सांगतोय, हे तुम्ही लक्ष देऊन ऐकायला हवे. जसे तुम्ही चांगला वक्ता असावेत तसेच चांगला श्रोता असणेही महत्त्वाचे आहे. अन्यथा समोरचे व्यक्ती तुम्हाला ऐकून ऐकून कंटाळतात आणि तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतात.

इतरांचा आदर राखा

देशात आदर या शब्दाला प्रचंड महत्त्व आहे. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला आदर दिला. सन्मान दाखवला, तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी झळाळी मिळते. त्याच्या मनातील तुमचे स्थान अधिक बळकट होते. त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होतो.

देहबोलीवर भर देणे गरजेचे

समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना, बोलताना अगदी सहज राहा. तुमच्या देहबोलीवर भर द्या. त्यातून तुम्ही प्रभावी संभाषण साधू शकता. आपले मुद्दे पटवून देऊ शकता. भाषण करतानाही देहबोलीला खूप महत्त्व आहे.

आत्मपरीक्षण करा

प्रत्येकाने स्वत:चे आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातून तुमच्या चांगल्या-वाईट बाबी समोर येत असतात. तुम्ही खरंच चुकताय की बरोबर आहात, हे तुम्हाला समजून येते. तुम्ही मार्गक्रमण करीत असलेला मार्ग योग्य की दुसरा मार्ग पकडायला हवा, हेही समजते.

आत्मविश्वास बाळगा

प्रत्येकाकडे आत्मविश्वास असायलाच हवा. आपल्या गुणांची आपल्याला पारख हवीच. पण अतिआत्मविश्वास बाळगू नका. त्यात तुमचे नुकसान असते. पण स्वत:ला दुर्लक्षितही करू नका. अन्यथा तुमच्यात क्षमता असतानाही तुम्ही स्पर्धेच्या बाहेर फेकले जाता. सर्वोत्तम राहण्याची क्षमता असतानाही मागच्या रांगेत उभे राहता.

-------------

- डॉ. संदीप मेश्राम, सहयोगी प्राध्यापक व माजी अधिष्ठाता कॉर्पोरेट रिलेशन्स, सीओईपी