शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

पुलं आनंदवनचे ब्रँडअँबेसेडर : डॉ. विकास आमटे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 20:52 IST

बाबा आमटे आणि पुलंचे गुरूबंधुचे नाते होते. ज्या काळात आमच्या कुष्ठरूग्णांनी बनवलेले कपडे वापरण्यास समाज कचरत होता, त्या काळात स्वतः पुलंनी हे कपडे वापरून समाजाची मानसिकता बदलण्याचे काम केले

ठळक मुद्देपुलोत्सवात डॉ. विकास आमटे यांना कृतज्ञता सन्मान प्रदानपुलं आनंदवनचे ब्रँडअँबेसेडर : डॉ. विकास आमटे  

पुणे : बाबा आमटे आणि पुलंचे गुरूबंधुचे नाते होते. ज्या काळात आमच्या कुष्ठरूग्णांनी बनवलेले कपडे वापरण्यास समाज कचरत होता, त्या काळात स्वतः पुलंनी हे कपडे वापरून समाजाची मानसिकता बदलण्याचे काम केले.  पुलं हे खऱ्या अर्थाने आनंदवनाचे ब्रँड अॅम्बॅसिडर होते अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी पु.ल. देशपांडे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. 

                'पु. ल. परिवार’ आणि 'आशय सांस्कृतिक’च्या वतीने आयोजित पुलोत्सवात आज ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांना  बालगंदर्व रंगमंदिरात ज्येष्ठ समाजसेवक आणि लेखक डाॅ. अनिल अवचट यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रूपये पंचवीस हजार असे या सन्मानाचे स्वरूप आहे.  यावेळी व्यासपीठावर आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, स्क्वेअर वनचे नयनीश देशपांडे, पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार, काॅसमाॅस बॅंकेंचे अध्यक्ष मिलिंद काळे, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते.   

            यावेळी बोलताना  आमटे म्हणाले की, पुलंमुळे साहित्य, संगीत, कला अशा विविध क्षेत्रातील मंडळी आनंदवनात येऊ लागली. खऱ्या अर्थाने आमचे त्यांच्याशी रक्ताचे नाते होते. त्यांच्यामुळे वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, विश्राम बेडेकर, तीर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्राचार्य राम शेवाळकर अशा अनेक दिग्गजांचे आनंदवनसोबत ऋणणानुबंध जुळले.  या मंडळींमुळे आनंदवनाचे काम सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यास खूप मोठा हातभार लागला. 

              डॉ. अनिल अवचट म्हणाले की, आमटे कुटुंबियांचे समाजकार्य म्हणजे घराणेशाही नसून समाजकार्याचा तो वारसा आहे. स्वतः बाबा वकील आणि त्यांची मुले डॉक्टर असताना त्यांनी पैशाच्या मागे न धावता केलेले काम सलाम करण्यासारखे आहे. आम्ही मुक्तांगणचे काम मध्यवर्ती ठिकाणी केले मात्र असं जंगलात जाऊन काम करणे अतिशय अवघड आहे. पैशाला देव मानणाऱ्या जगात अशी माणसेजैविक अपघात असल्यासारखी वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव यांनी केले. तर आशय सांस्कृतिकचे सतीश जकातदार यांनी आभार मानले. 

आनंदवन आणि पुलं'चे किस्से 

या कार्यक्रमात बोलताना आमटे यांनी पुलंच्या हजरजबाबीपणाचे किस्सेही सांगितले. मंत्र्यांच्या हस्ते कोनशिला करण्याचा विषय निघाल्यावर पुलंनी तात्काळ उच्चारलेल्या 'मंत्र्यांच्या हस्ते  कानशिला समारोह साजरा करण्याचे दिवस आहेत, कोनशीला नाही' वाक्याची आठवण सांगितली. सर्वत्र फुले तोडण्यास मनाई आहे असे लिहिले जात असताना पुलंनी सुचवल्याप्रमाणे ''आनंदवनात फुले तोडली जात नाही' असा फलक आजही आनंदवनात असल्याचे सांगितले. 

 

 

        

 

 

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिक