शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

पालखी महामार्गावरील दौंडज खिंड ते निरा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:10 IST

वाल्हे. वाल्हे.- पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरील दौंडज खिंड ते निरा या २० किलोमीटरच्या रस्त्यावरील दौंडज खिंड, दौंडज, वाल्हे, कामठवाडी, ...

वाल्हे.

वाल्हे.- पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरील दौंडज खिंड ते निरा या २० किलोमीटरच्या रस्त्यावरील दौंडज खिंड, दौंडज, वाल्हे, कामठवाडी, पिसुर्टी, जेऊर फाटा, पिंपरे आदी गावांमधून जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरुन जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, त्यामधून काही वेळा अपघात घडले आहेत. दरम्यान या पालखी महामार्गाची त्वरित डागडुजी करावी, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग पुणे यांनी फुरसुंगी पासून, दिवे घाट , सासवड, जेजुरी येथील खड्डे बुजवले. मात्र, सर्वाधिक धोकादायक खड्डे दौंडज खिंड ते निरा येथील अरुंद रस्त्यावर आहेत. मात्र संबंधित प्रशासनाने, याच मार्गावरील खड्डे बुजवले नाहीत. पिसुर्टी फाटा ते लोणंद या मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असून, पिसुर्टी फाटा ते दौंडज खिंड या अरुंद रस्त्यावरील खड्डे मात्र संबंधित प्रशासनाने बुजवले नाहीत.

साखर कारखाने सुरू झाले असल्याने, याच महामार्गावरून, पुरंदर तालुक्यातील जवळपास सर्वच ऊस वाहनांना याच खड्डेमय मार्गावरुन प्रवास करावा लागत असून, खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नांमध्ये ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर- ट्रॉली उलटून उपघात झाले आहेत.

पुणे- पंढरपूर पालखी महामार्ग रूंदीकरणाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार असल्याची चर्चा वाल्हे परिसरामध्ये आहे. माञ प्रत्यक्षात जेव्हा पालखी महामार्ग रूंदीकरणाचे काम संबंधित विभागाने कधीही सुरू करूद्यात, त्या आगोदर या महामार्गावरील खड्डे आगोदर बुजवून साईड पट्टीच पूर्ण भरून घ्यावी. अशी मागणी येथील ग्रामस्थ, प्रवाशी करत आहेत.

मागील काही वर्षांत शासनाने दिवे घाट ते जेजुरी औद्योगिक वसाहत या पालखी महामार्गावरील चौपदरीकरण सुरू केले होते; मात्र अजूनही ते काम पूर्ण झाले नाही. तसेच जेजुरी औद्योगिक वसाहतीच्या पुढील रस्ता जेजुरी खिंड ते नीरा या रस्ताचे रुंदीकरण अद्यापपर्यंत केले गेले नाही. काही ठिकाणी तर दोन गाड्या रस्त्यावरही बसत नसल्याने या रस्त्यावर अनेक अपघात होत असतात. या महामार्गावरून सातारा, कोल्हापूर, सांगली, बंगलोर आदी अनेक मोठ्या रस्त्यांना जोडणारा हा रस्ता असल्याने अनेक अवजड वाहने या मार्गावरुन ये जा करत असतात. तसेच या मार्गाने अनेक तीर्थक्षेञांना जाता येते. यामध्ये, जेजुरी, मोरगाव, आळंदी, देहू, पंढरपूर, शिखर शिंगणापूर आदी मोठ्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा महामार्ग आहे. तसेच जेजुरी, नीरा, लोणंद या ठिकाणावरील औद्योगिक वसाहतीमध्ये दररोज अनेक महिला तसेच पुरुष कामगार याच रस्त्याने जात असतात. या महामार्गावरील सध्याची वाहतूक परिस्थिती पाहिली तर या मार्गावरील पडलेले खड्डे तसेच अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेली साईडपट्टी भरून घेणे आवश्यक आहे.

काही दिवसा पासून या महामार्गा वरिल खड्डे बूजावण्याचे काम चालू आहे.मात्र ठेकेदाराने काही कारनस्थव ते काम मध्येच थांबवले आहे.पण राहिलेले काम लवकरात लवकर चालू करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

श्रुती नाईक.सहायक अभियंता श्रेणी 1 रास्ट्रीय महामार्ग विभाग पुणे .