शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

वीजदरवाढीच्या याचिकेवर नियामक आयोग, महावितरणकडून ग्राहक अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:13 IST

महावितरणने नोव्हेंबर २०२४ मध्ये पुढील पाच वर्षांसाठीच्या बहुवार्षिक वीजदरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे दाखल केला होता.

पुणे : महावितरणच्या दरवाढ प्रस्तावाला फेटाळल्यानंतर त्याच आदेशाला राज्य वीज नियामक आयोगाने स्थगिती दिली. मात्र, आता त्याच निर्णयाबाबत महावितरणने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेबाबत महावितरणने ग्राहकांना अंधारात ठेवले असले तरी आयोगानेही सुनावणी घेऊन केवळ निर्णय देणे शिल्लक ठेवले आहे. या निर्णयातून पुन्हा दरवाढ सोसावी लागेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. यातून आयोगाचा कारभार किती अपारदर्शक आणि ग्राहकविरोधी आहे, हेच यातून सिद्ध होते, असा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे.महावितरणने नोव्हेंबर २०२४ मध्ये पुढील पाच वर्षांसाठीच्या बहुवार्षिक वीजदरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे दाखल केला होता. त्यावर आयोगाने राज्यभरातील ग्राहकांना म्हणणे मांडण्यासाठी चार महिन्यांची संधी दिली. त्यानंतर २८ मार्चला ८२७ पानी आदेश दिला. त्यात आयोगाने महावितरणचा ४८ हजार ६६ कोटींचा तुटीचा प्रस्ताव फेटाळला, तसेच महावितरणकडे ४४ हजार ४८० कोटी रुपये जास्तीचे शिल्लक राहणार असल्याचे दाखवून २०२५-२६ मध्ये १० टक्के वीजदरकपात करण्याचा निर्णय दिला. तर २०२९-३० पर्यंत दरकपात १६ टक्क्यांपर्यंत करण्याचे आदेश दिले. यामध्ये आयोगाने २०२५-२६ मध्ये सर्व प्रकारांतील दर ५ ते १५ टक्क्यांनी कमी केले.मात्र, या वीजदर कपातीमुळे महावितरण दिवाळखोरीत निघेल, अशी हाकाटी सुरू करण्यात आली. त्यानंतर आयोगाने लगेचच आपणच दिलेल्या वीजदर कपातीच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यानंतर महावितरणने एप्रिलअखेर गाजावाजा न करता पुनर्विचार याचिका आयोगाकडे सादर केली. या याचिकेत नेमके काय म्हणणे मांडले आहे, ते संकेतस्थळावर टाकण्याची तसदी महावितरणने घेतली नाही. त्याचप्रमाणे नियमांनुसार आयोगानेही या याचिकेबाबत जाहीर केले नाही. तसेच या याचिकेवर फक्त महावितरणचे म्हणणे ऐकून घेऊन ग्राहकांना या प्रस्तावाबाबतच पूर्ण अंधारात ठेवून त्यावरील निर्णय आयोग लवकरच देणार आहे. यातून आयोगाचा कारभार अपारदर्शक आणि ग्राहकविरोधी आहे हेच यातून सिद्ध होते असा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे.

आता एकदाचा वीज नियामक आयोग महावितरणमध्ये विलीन करून टाकावा. म्हणजे निकाल देण्याची ढोंगबाजी करण्याची गरज उरणार नाही. - विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmahavitaranमहावितरण