शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अंधाराचा फायदा घेत 'उजनी'मध्ये बेसुमार वाळूउपसा; कालठण ते कांदलगाव हा पट्टा केंद्रबिंदू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 10:23 IST

- फायबर बोटी व तेवढ्याच सक्शन बोटीद्वारे उपसा, नावे समजूनही गुन्हे दाखल न होण्याचे गौडबंगाल

- शैलेश काटे

इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. कालठण ते कांदलगाव हा पट्टा बेकायदा वाळू उपशाचे केंद्रबिंदू ठरला आहे. दररोज किमान ५० फायबर बोटी व तेवढ्याच सक्शन बोटींच्या साहाय्याने रात्रीच्या वेळी वाळू उपसा केला जातो. हजारो रुपयांचा व्यवहार पार पडतो. महसूल व पोलिस यंत्रणा मात्र बेवारस बोटी फोडण्याची कारवाई करते. शासनदरबारी त्याची नोंद होते की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. वाळू चोरांची नावे नोंदवल्याचे दिसत नाही.इंदापूर तालुक्याला भिगवण ते तरटगाव असा ३५ किलोमीटर अंतराचा उजनी धरण पाणलोट क्षेत्राचा प्रदीर्घ पट्टा लाभलेला आहे. भीमा नदीची वाळू कसदार व बांधकामासाठी चांगल्या दर्जाची समजली जाते. त्यामुळे तिला चांगली मागणी आहे. शासनाच्या अनास्थेमुळे नदी स्वच्छ होत नाही. त्यामुळे उजनी धरण व भीमेच्या पात्रात भरपूर गाळ व त्याच प्रमाणात वाळूसाठा लपलेला आहे. हे काळे कसदार सोने चोरणाऱ्यांच्या मोठमोठ्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. स्थानिक टोळ्यांना परजिल्ह्यातील टोळ्यांची कुमक मिळाली आहे.सध्या कांदलगाव, महादेवनगर, शहा, माळवाडी, अजोती, सुगाव, गंगावळण, शिरसोडी, पडस्थळ, कालठण गावांच्या हद्दीतील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. दररोज सायंकाळी पाचवाजल्यानंतर किमान ५० फायबर व तेवढ्याच सक्शन बोटींद्वारे वाळू उपसा सुरू होतो. प्रत्येक गावामधून असंख्य ट्रक भरून वाळू उचलली जाते. सध्या वाळू उपसा करणाऱ्यांनी शहा गाव व त्याभोवतीचा परिसर यावर लक्ष केंद्रित केले आहे. वाळू चोरांना हा परिसर, काढलेल्या वाळूचा साठा करून ठेवण्यासाठी सुरक्षित व वाहतुकीसाठी सोपा वाटतो. याखेरीज या गावामधील कथित प्रतिष्ठितांचे हातही या वाळूच्या धंद्यात गुंतले आहेत.वाळू उपशावर महसूल व पोलिस यंत्रणेची कारवाई हा एक विनोदाचा भाग होऊन बसला आहे. जेवढ्या प्रमाणात वाळू उपशासाठी बोटींचा वापर केला जातो त्याच्या एक टक्काही बोटी महसूल व पोलिस यंत्रणेच्या पथकास सापडत नाहीत. पाठलाग करून पकडलेल्या बोटी नंतर कशा बेवारस ठरतात. त्यामध्ये वाळू कशी काय नसते. त्या बोटी कोणाच्या असतात, त्यांची नाते का पुढे येत नाहीत. गुन्हे का दाखल होत नाहीत, हे गौडबंगाल कधीच कळत नाही.वाळू चोरांची स्थानिक मच्छिमारांवर दादागिरीपाणलोट क्षेत्रात मासेमारी हा आणखी एक मोठा व्यवसाय आहे. रीतसर चालणारा हा व्यवसाय वाळू उपशामुळे संकटात सापडला आहे. मासेमारीसाठी वापरात येणारी जाळी वाळू उपसा करणाऱ्या बोटी व इंजिनच्या पाठीमागे लावलेल्या पंख्यामुळे तुटतात.मासे सापडणे जिकिरीचे होते. मस्तवाल वाळूचोरांना जाब विचारणे म्हणजे आपला जीव संकटात टाकणे हे मच्छिमारांना माहिती आहे. त्यांची दहशत व दादागिरीस सामोरे जाण्यापेक्षा गप्प बसणे सोयीचे अशी भूमिका मच्छिमारांना घ्यावी लागत आहे.चोरीनंतर शासकीय यंत्रणा सज्जप्रशासकीय यंत्रणेतील अनेक जणांचे वाळू चोरांशी संबंध आहेत. वाळू चोरांच्या अदृश्य साथीदारांनी अगदी तहसीलदारांच्या निवासस्थानापासून ते पोलिस वसाहतीतील 'त्या' विशिष्ट खोलीपर्यंत पाळत ठेवलेली असते. कर्तव्यावर 'अर्थ'पूर्ण हात फिरला की चोर चोरी करायला मोकळे असतात. चोरी झाल्यानंतर कर्तव्य पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज होत असते, असा प्रकार इकडे घडतो. तो जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत वाळूच्या धंद्याला मरण नाही, असे अवैध वाळू व्यावसायिक छातीठोकपणे सांगत असतात.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड